Chandrapur Latest News Saamtv
महाराष्ट्र

Chandrapur News: लाकडे तोडण्यासाठी जंगलात गेला अन् भयंकर घडलं; वाघाच्या हल्ल्यात इसम ठार

Gangappa Pujari

Chandrapur News:

वाघाच्या हल्ल्यात ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडली. मृत व्यक्ती ही चंद्रपूर शहरालगतच्या जुनोना जंगलात लाकडे तोडण्यासाठी गेले होते. यावेळी वाघाने त्याच्यावर हल्ला केला. ज्यामध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, चंद्रपूर (Chandrapur) शहरालगतच्या जुनोना जंगलात वाघाच्या हल्ल्यात 52 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. मनोहर विक्रम वाणी असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. मनोहर वाणी हे जुनोना बायपास मार्गावरील हनुमाननगर परिसरातील रहिवासी होते. आज सकाळी लाकडे तोडण्यासाठी गेला असताना त्याच्यावर वाघाने हल्ला केला. ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.

नागरिकांना कक्ष क्रमांक 484 मध्ये त्यांचा मृतदेह आढळल्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला. मनोहर चंद्रपूर शहरातील एका नामांकित शाळेत बसचालक होता. घटनेची माहिती मिळताच वनपथक घटनास्थळी पोचले. शव पोस्टमार्टमसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे.

या भागात नागरिकांना फिरण्यासाठी जाण्यास वनविभागाने मज्जाव केला असून वनविभागाद्वारे कॅमेरा ट्रॅप लावून या भागातील वाघाच्या हालचालींची माहिती घेतली जात आहे. दरम्यान, या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. (Latest Marathi News)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : आणखी एक भाजप आमदार तुतारी हाती घेणार ? महत्वाची माहिती आली समोर

Maharashtra Politics: गडकरी समर्थक असल्यामुळे माझ्यावर कारवाई, नागपूरमधील भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ

Maharashtra News Live Updates: विधानसभेसाठी पुण्यात मनसेचे उमेदवार तयार?

Bee Attack : शेतात काम करताना मधमाश्यांचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, पत्नी जखमी

IND vs NZ : भारताची स्थिती 'गंभीर', किवींकडे ३५६ धावांची 'विराट' आघाडी; रोहितसेना पिछाडीवर!

SCROLL FOR NEXT