'केंद्र सरकार ठराविक लोकांसाठी कायदे तयार करत आहे' - बाळासाहेब थोरात गोविंद साळुंके
महाराष्ट्र

'केंद्र सरकार ठराविक लोकांसाठी कायदे तयार करत आहे' - बाळासाहेब थोरात

केंद्र सरकारने तीन शेतकरी कायदे मागे घेतल्याने शेतकरी विजय दिवस संगमनेरच्या तळेगाव येथे फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला.

गोविंद साळुंके

अहमदनगर : केंद्र सरकार ठराविक लोकांसाठी कायदे तयार करण्याचे काम करत असल्याची टीका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. केंद्र सरकारने तीन शेतकरी कायदे मागे घेतल्याने शेतकरी विजय दिवस संगमनेरच्या तळेगाव येथे फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला या वेळी बाळासाहेब थोरात बोलत होते.

आमदार सुधीर तांबे सह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे थोरात म्हणाले आता पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहे. आता अगोदर टाळ्या-थाळ्या वाजवणारे कुठे गेले आहेत? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

हे देखील पहा :

यावेळी बोलताना थोरात यांनी कंगना राणावतवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, आता एक नवीन नटी आली आहे, तिची स्वातंत्र्याबद्दल बोलण्याची लायकी आहे का? कंगणाचे बोलणे चुकीचे असून ती वादग्रस्त बोलते. स्वातंत्र्य मिळण्यासाठी हजारोंचे बळी गेले आहेत. ही बोलते आणि तिला संरक्षण मिळते आणि लगेच पद्मश्री मिळतो.

आज ती स्वातंत्र्यावर बोललीय उद्या राज्यघटनेवर बोलले जे असे वादग्रस्त बोलतात त्यांना लगेच पद्मश्री मिळतो. अश्याच प्रकारचे विधान विक्रम गोखले यांनी केले आहे. आता त्यांनाही पद्मश्री मिळेल, अशी टिपण्णी यावेळी थोरात यांनी अभिनेते विक्रम गोखले यांच्यावर केली आहे.

मात्र, अशाप्रकारचे बोलणे सहज नसते, कोणीतरी यामागे असते. हे आता राज्यघटनेकडे देखील वळतील आणि राज्य घटना बोगस आहे म्हणतील. देश राज्य घटनेप्रमाणेच चालला पाहिजे हे आपण सर्वांनी लक्ष्यात ठेवले पाहिजे. सर्व संत विचाराचा सार डॉ. बाबासाहेबांनी केला अन राज्यघटना तयार केली आहे असं ही थोरात म्हणाले.

शेतकरी आंदोलन आणि कृषी कायद्याविषयी बोलताना थोरात म्हणाले, केंद्र सरकारने या शेतकरी आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. रक्त गोठवणार्‍या थंडीत शेतकर्‍यांवर पाण्याचा मारा केला, रस्त्यावर खिळे ठोकून त्यांना अडविले गेले.

काही शेतकरी बांधवांना गाडीखाली चिरडून मारले गेले, त्याची जबाबदारी मोदी सरकारला टाळता येणार नाही आणि अन्नदात्याची माफी मागावी लागेल. शेतकर्‍यांनी निर्धाराने लढा देऊन कितीही मोठ्या अहंकारी शासनाला झुकवू शकतो, हे दाखवून दिले. शेतकरी एकजुटीचा हा विजय आहे. परंतु शेतकर्‍याला न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष सुरुच राहिल असेही थोरात म्हणाले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: आधी CA, मग IPS, नंतर IAS अधिकारी; माधव अग्रवाल यांचा प्रेरणादायी प्रवास

Maharashtra Live News Update: मातंग समाज पुन्हा आक्रमक,अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उमटणार पडसाद

T20 World Cup 2026: 'या' चुकीमुळे टीम इंडियाच्या हातातून निसटला सामना; पराभवानंतर सूर्यादादा संतापला

Misal Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी झणझणीत मिसळ कशी बनवायची? वाचा सोपी रेसिपी

Acidity Relief Food: पित्ताचा त्रास वाढतोय? सकाळच्या नाश्त्यात घ्या हा १ पदार्थ, अ‍ॅसिडीटी होईल गायब

SCROLL FOR NEXT