sugar cane  saam tv
महाराष्ट्र

Ethanol Production: इथेनाॅल निर्मितीवर केंद्राची बंदी, राज्याला बसणार साडेसहा हजार कोटींचा फटका?

साम टिव्ही ब्युरो

Ethanol Production Ban:

केंद्र सरकारने साखर उद्योगासंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे, या निर्णयामुळे महाराष्ट्र राज्यातील सुमारे 150 इथेनॉल प्रकल्पांना याचा थेट फटका बसणार आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे साखर कारखान्यांबरोबरच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सुमारेसहा हजार पाचशे कोटींचा फटका बसण्याची भीती पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

केंद्र सरकारने ऊसापासून इथेनॉल निर्मिती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील साखर उद्योग आर्थिक अडचण देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यातील 188 साखर कारखान्यांपैकी सुमारे 150 साखर कारखान्यांमध्ये इथेनॉल निर्मिती केली जाते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या प्रकल्पामधून यावर्षी तयार होणाऱ्या सुमारे आठशे कोटी लिटर इथेनॉलचे विविध पेट्रोलियम कंपन्यांची करार देखील झाले आहेत. सध्या या सर्वच साखर कारखान्यांमधून उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती सुरू असतानाच केंद्र सरकारने निर्मितीवर बंदी घातल्याने साखर कारखान्याना मोठा धक्का बसला आहे. (Latest Marathi News)

या वर्षी सुरू आलेल्या साखर हंगामात सुमारे ८० लाख टन साखर निर्मिती होईल. मागील तीन वर्षांच्या तुलनेत यंदा साखर उत्पादन घटणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने ऊसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

इथेनॉल निर्मिती प्लांटमुळेज साखर कारखाने शेतकऱ्यांना अधिकचे दर देऊ शकले. पण आता केंद्र सरकारने नवा निर्णय घेतल्याने साखर कारखानदारी अडचणीत येण्याची भीती असून साडेसहा हजार कोटी रुपयांचा फटका या उद्योगाला बसणार आहे. राज्यातील जे साखर कारखाने थेट उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती करतात ज्यांचे लाँग टर्म नियोजन नाही अशा कारखान्याच्या ऊस दरावर काहीसा परिणाम होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या या निर्णय विरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs BAN: पहिल्याच डावात केलेल्या या 3 चुका टीम इंडियाला महागात पडू शकतात

IND vs BAN, 1st Test: टीम इंडियाचा डाव आटोपला! जडेजाचं शतक थोडक्यात हुकलं, बांगलादेशचा युवा गोलंदाज चमकला

Jalna Accident : जालन्यात एसटी बस आणि ट्रक अपघातात आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारे PHOTO पाहा

Chandrakant Patil News : खडसेंमुळेच राजकारणाचा स्तर खाली घसरलाय; आमदार चंद्रकांत पाटील यांचा आरोप

Metro Ticket Booking: मेट्रोच्या तिकीटासाठी रांगेत उभं राहायची गरज नाही; काही मिनिटात ऑनलाइन तिकीट काढा

SCROLL FOR NEXT