१ मे पासून संपूर्ण राज्यात जनगणलेला सुरुवात झाली. ही गणना पहिल्यांदाच वेगळ्या म्हणजेच डिजिटल पद्धतीने होणार आहे. यालाच स्व गणना असं म्हंटलं जात आहे. ही स्व गणना तुम्हाला फक्त १५ मिनिटांत पूर्ण करता येणार आहे. याच मोहिमेत अनेक नागरिकांनी स्व गणनेला सुरुवात केली आहे. महत्वाची बातमी म्हणजे यामध्ये पहिला क्रमांक हा सिंधुदुर्गातील वेंगुर्ला तालुक्यातल्या मूठ गावाने पटकावला आहे.
मूठ गावातल्या सर्व नागरिकांनी स्वगणना प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. मुख्य प्रधान जनगणना अधिकारी निरुपमा जे डांगे यांनी या कामगिरीबद्दल गावकऱ्यांचे आणि प्रशासनाचे कौतुक सुद्धा केले. तसेच राज्यातल्या इतर गावांनीही मूठ गावाचा आदर्श घेत स्वगणना प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी असे आवाहन केले.
मूठ गावाचा एकू ३६ घरं आणि ४३ कुटुंब आहेत. गावाची लोकसंख्या १४४ इतकी आहे. गावातल्या प्रत्येक कुटुंबाने यामध्ये सहभाग घेत अचूक माहिती सादर केली आहे. त्याचमुळे ही मोहीम यशस्वी रित्या पार पडली.
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शना खाली ही मोहीम राबवण्यात आली. तहसीलदार ओंकार ओतारी यांनी सूक्ष्म नियोजन करत मोहिमेची अंमलबजावणी केली होती. त्यांच्यासोबत नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनीही विशेष मेहनत घेतली आहे.
जनगणेनेच्या संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार १६ मे ते १४ जून या काळात जनगणना करणारे अधिकारी राज्यातल्या प्रत्येक घराला भेट देतील. तसेच तुम्ही se.census.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन तुमची माहिती त्यामध्ये देऊ शकता. जनगणना ही २०२७ साठी राज्यातल्या सर्व जिल्हे, तालुके, शहरं, गावं यांच्या प्रशासकीय सीमा १ जानेवारी २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीसाठी प्रशासकीय सीमा गोठवण्यात आल्या. म्हणजेच आता यामध्ये कुठलाही बदल करता येणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.