Crime News , Satara , Dandiya, Youth, Police Google
महाराष्ट्र

Satara News : दांडियानंतर मनामती चौकात झाला राडा; गोळीबारप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल

या प्रकारामुळे रहिवासी घाबरले.

साम न्यूज नेटवर्क

Satara Crime News : सातारा शहरातील मंगळवार पेठेत गोळीबार केल्या प्रकरणी पाेलीसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा शाहूपुरी पोलिस ठाण्‍यात दाखल झालेला आहे. या घटनेतील एका अल्‍पवयीन मुलाची पाेलीसांनी (police) चाैकशी केली. गरबा दांडियानंतर (garba dandiya) झालेल्या गेले दाेन दिवस या घटनेची चर्चा राजकीय वर्तुळात देखील माेठ्या प्रमाणात रंगली आहे. (Satara Latest Marathi News)

विजयादशमीच्या आदल्या रात्री दांडिया नंतर झालेल्‍या वादातून काही युवकांनी एकाचा पाठलाग करत मनामती चौकात गोळीबार केला. त्यामुळे परिसरात रात्रभर तणावाचे वातावरण हाेते. पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार आणि दाखल तक्रारीनूसार यश संजय बीडकर हा युवक बुधवारी त्याच्या मित्रांबराेबर दांडिया पाहून घरी जात हाेते. (Breaking Marathi News)

त्याचवेळीस एका ठिकाणी अभिजित भिसे या युवकानं यशचा मित्र सर्वेश महाडिक याच्‍या पायावर टू व्हिलर घातली. त्यातून वाद झाला. त्यानंतर यश हा मित्रासमवेत त्‍याठिकाणाहून निघून गेला. काही वेळाने अमीर शेख, अभिजित भिसे हे त्याच्या मित्रांसह मनामती चौकात आले. तेथे यश बीडकरला पाहून अमीर शेखने पिस्तूल काढत. तुला जिवंत ठेवत नाही असे म्‍हणत शेखने यशच्‍या दिशेने गोळी झाडली. ती त्‍याने चुकवली.

हा प्रकार सुरु असताना तेथे स्थानिक रहिवासी आले. त्यांना देखील शेख याने दम भरत गाेळीबार केला. या प्रकारामुळे रहिवासी घाबरले. दरम्यान या प्रकरणी पाेलिसांनी अमीर शेख (रा. वनवासवाडी), अभिजित भिसे (रा. यश ढाब्‍यामागे, कोंडवे), साहिल सावंत (रा. कोटेश्‍‍वर मंदिराजवळ, शुक्रवार पेठ) , आहत (पूर्ण नाव, पत्ता नाही) , यश सुभाष साळुंखे (रा. मोळाचा ओढा) यांच्यावर गुन्‍हा दाखल केला आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: रडताना डोळ्यांतून अश्रू का बाहेर पडतात? जाणून घ्या कारण

Maharashtra Live News Update: दक्षिण सोलापूर तालुक्यातील भीमेच्या पाणी पातळीत वाढ,भीमा नदीवरील अनेक बंधारे पाण्याखाली

दिवसातून ४ वेळा नारळपाणी प्यायल्याने शरीराला कोणते फायदे होतात?

Shocking: शिक्षिकेकडून विद्यार्थ्याचा लैंगिक छळ, रात्री व्हिडिओ कॉल करायची अन्...; नवी मुंबईत खळबळ

Ganapati Special Train : खुशखबर! कोकणासाठी आणखी ४४ रेल्वे, कधी धावणार, कुठे कुठे थांबणार?

SCROLL FOR NEXT