Buldhana News Saam tv
महाराष्ट्र

Water Crisis : नागापूर गावात ऐन पावसाळ्यात पाणी टंचाई; महिलांचा ग्रामपंचायंतीत ठिय्या

Buldhana News : उन्हाळ्यात पाणी टंचाईला सामोरे जाऊन दिवस काढले. किमान पावसाळा सुरु झाल्यानंतर पाण्याची समस्या मिटेल अशी आशा ग्रामस्थांना होती.

संजय जाधव

बुलढाणा : उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागल्यानंतर मेहेकर तालुक्यातील नागापूर येथील ग्रामस्थांना ऐन पावसाळ्यात देखील भिषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात देखील गावातील महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने आज संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. 

उन्हाळ्यात पाणी टंचाईला (Water Crisis) सामोरे जाऊन दिवस काढले. किमान पावसाळा सुरु झाल्यानंतर पाण्याची समस्या मिटेल अशी आशा ग्रामस्थांना होती. मात्र पावसाळा सुरु होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर देखील पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात तरी पाणी मिळणे अपेक्षित होते. मात्र उन्हाळ्यात असलेली परिस्थिती कायम असल्याने वैतागून असंख्य महिलांनी ग्रामपंचायतीमध्ये (Gram Panchayat) ठिय्या आंदोलन केले. नागापूर गाव हे खासदार तथा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या मतदार संघात येत असून नागरिकांना मूलभूत सुविधेसाठी आंदोलन करावे लागत असल्याने चर्चेचा विषय बनला आहे.

जलजीवन मिशनची कामे तरीही टंचाई 

वास्ताविक पाहता नागापूर गावामध्ये जल जीवन मिशनचे कामे झाली आहेत. तरीही ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागत आहे. यामुळे असंख्य महिलानी आज ग्रामपंचायतीत जाऊन पाणी देण्याची मागणी केली आहे. ग्रामपंचायतीचा निष्काळजीपणामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याचे चित्र आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: मोबाइलची सवय सुटावी म्हणून मुलीला आजोळी पाठवलं, मामा अन् त्याच्या मुलानं केला बलात्कार

Maharashtra Live News Update: पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आंदोलन

Mumbai Pune Expressway : मोठी बातमी! पुण्याहून मुंबईला येणार्‍या सर्व एसटी बसेस रद्द, २१ तासांपासून एक्सप्रेस वे ठप्प, प्रवास टाळाच, कारण...

मी जातपात मानत नाही, माळी समाजाचा उल्लेख; अजितदादांनी मृत्यूआधी कॉलवर नाव घेतलेल्या नेत्याने सगळं काही सांगितलं

लोकसभेच्या गेटवर राडा! बघा गद्दार चालले; काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या मंत्र्याला राहुल गांधींनी डिवचले, मंत्री म्हणाले...,

SCROLL FOR NEXT