Raosaheb Danve vs Abdul Sattar Saam TV
महाराष्ट्र

विरोधकांनी माझ्यामागे सिल्लोडचा औरंगजेब लावला; रावसाहेब दानवेंचं खळबळजनक विधान

आज पुन्हा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर टीका केली आहे.

लक्ष्मण सोळुंके

जालना : राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप आणि शिवसेना नेते एकमेकांवर टीकेचा भडीमार करताना दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना (Shivsena) मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्यावर राज्यसभा निवडणुकीवरून टीका केली होती. आता रावसाहेब दानवे यांनी सत्तार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. 'विरोधकांनी टीका करण्यासाठी सिल्लोडचा औरंगजेब माझ्या मागे लावला' असं खळबळजनक विधान केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. (Shivsena Abdul Sattar vs BJP Raosaheb Danve Latest News)

काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा मुलगाच राज्यसभेत आपल्याला मतदान करेल, असा दावा केला होता. त्यानंतर भाजप आमदार संतोष दानवे यांनी सुद्धा राज्यसभेच्या निवडणुकीत सत्तार यांनी भाजपला जशी मदत केली, अशीच मदत ते विधानपरिषद निवडणुकीत भाजपला पुन्हा करतील असा खोचक टोला लगावला होता.

आज पुन्हा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर टीका केली आहे. 'सिल्लोडचा औरंगजेब माझ्या मागे टीका करण्यासाठी भाड्याने लावला, छत्रपतींच्या पाठीमागे औरंगजेब बरा नाही' असा घणाघात रावसाहेब दानवे यांनी नाव न घेता अब्दुल सत्तार यांच्यावर केला आहे. जालन्यात पत्रकारांसोबत बोलतांना दानवे यांनी हा घणाघात केलाय.

दरम्यान, रावसाहेब दानवे यांनी शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यावर देखील नाव न घेता टीका केली आहे. जालना नगर पालिकेला मुख्यमंत्री फडणवीस असताना अंतर्गत पाईप लाईन साठी 129 कोटींचा निधी दिला हा निधी कुठे गेला याचा हिशेब राज्य सरकारने द्यावा अशी मागणीही त्यांनी केली.

अडीच वर्षात रजत सरकारने जालना पालिकेला एक रुपयाचाही निधी दिला नाही. असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. इतकंच नाही तर, विरोधकांमध्ये हिम्मत असेल तर व्यासपीठावर येऊन माझ्यावर टीका करून दाखवावी असं आव्हान देखील दानवे यांनी नाव न घेता खोतकर आणि अब्दुल सत्तार यांना दिलं आहे.

दरम्यान, आज जालन्यात भाजपने महाविकासआघाडी सरकारविरोधात जलआक्रोश मोर्चा काढला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यभरातील भाजप नेते जालन्यात दाखल झाले आहे. औरंगाबादेतील पाणीप्रश्नानंतर आता भाजपने जालना शहरातील पाणी प्रश्नावरचा मुद्दा उपस्थित केला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: पुणे हादरले! दिराकडून भावजयीवर जीवघेणा हल्ला, कोयत्याने सपासप वार

Pre Primary School: नोंदणी अनिवार्य ! पूर्व प्राथमिक शाळांसाठी सरकार आणणार नवा कायदा

केरळमध्ये कमळ फुलवण्यासाठी भाजप लागली कामाला ;महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यावर सोपवली मोठी जबाबदारी

Beed Crime: जमीन-ट्रॅक्टरसाठी नातं विसरला; जन्मदात्यासह बहीण आणि मेहुण्याला लोखंडी पाईपनं बेदम मारहाण

Rahuri By-Election: पवारांच्या नेत्याकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक, राहुरी पोटनिवडणुकीवरून राजकारण तापलं?

SCROLL FOR NEXT