Radhakrishna Vikhe Patil vs Sharad Pawar saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: शरद पवारांनी लक्ष्मण रेखा आखावी, राजकारणात लक्ष घालण्यापेक्षा...विखेंचा खोचक टोला

Radhakrishna Vikhe Patil vs Sharad Pawar: शरद पवार यांनी लक्ष्मण रेखा आखण्याची गरज आहे. त्यांनी राजकारणात लक्ष घालण्यापेक्षा मोदी साहेबांच्या विविध धोरणांची अंमलबजावणीसाठी सहकार्य केलं पाहिजे असं विखे-पाटील म्हणालेत.

Bharat Jadhav

सुशील थोरात, साम प्रतिनिधी

राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची तब्येत बरी नाहीये. डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिलाय. त्यानंतर शरद पवार यांनी पुढील चार दिवसांचे सर्व कार्यक्रम रद्द केलेत. याबाबतची माहिती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने दिलीय. भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार यांच्या तब्येतची चिंता व्यक्त केलीय. त्याचबरोबर त्यांनी पवार यांना खोचक टोला देखील मारलाय.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची तब्येत खालवल्याने त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिलाय. यावर बोलतांना मंत्री राधाकृष्ण विखे यांनी पवारांना उत्तम आरोग्य लाभो, ही कामना करतो. मात्र त्यांनी आता लक्ष्मण रेखा आखण्याची गरज आहे. आज त्यांनी राजकारणात लक्ष घालण्यापेक्षा मोदी साहेबांच्या विविध धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी सहकार्य केले पाहिजे, असा खोचक टोलाही त्यांनी शरद पवार यांना लगावला आहे.

शरद पवार यांना कफ झाल्याने बोलताना त्रास होतोय. यामुळे त्यांना कार्यक्रमांमध्ये भाषण करण्यास त्रास होत आहे. या कारणाने त्यांचे पुढील चार दिवसांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आलीय. दरम्यान दोन दिवसांपासून शरद पवार हे सांगली, कोल्हापूरच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी कार्यक्रम, सभांमध्ये बोलताना शरद पवारांना त्रास होत होता. यामुळे डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिलाय.

दरम्यान शरद पवार यांचे वय ८४ वर्ष असून ते अजूनही सक्रीय राजकारणात आहेत. राष्ट्रवादीमध्ये दोन वर्षांपूर्वी दोन गट झाले. अजित पवारांनी आपला पक्ष हा राष्ट्रवादी असल्याचा दावा केला. त्यावर हार न मानता शरद पवार यांनी आपला लढा सुरू केलाय. न्यायालयात पक्षाबाबत लढाई सुरू आहे. तर दुसरी राजकारणाच्या मैदानातही ते अजित पवार गट आणि भाजपशी दोन हात करत आहेत.

दरम्यान शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी चिंता व्यक्त केलीय. मात्र त्याचवेळी विखे-पाटील यांनी शरद पवार यांना खोचक टोला लगावलाय. पुढे बोलताना राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावरही भाष्य केलंय. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे, या मागणी करता मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून पुन्हा अंतरावली सराटी येथे उपोषण सुरू केले आहे.

यावर प्रतिक्रिया देताना राज्याचे जलसंपदा मंत्री यांनी सांगितले की उपोषण करून आपण काय साध्य करणार आहात १० टक्के आरक्षण याआधीच मराठा समाजाला देण्यात आलेले आहे. त्याकरता सरकार कसोशीने प्रयत्न करत आहे. सुप्रीम कोर्टापर्यंत अद्यापही कुठे स्थगिती आलेली नाही. त्याची अंमलबजावणी सुरू आहे आणि सरकारने पहिल्यापासून ही भूमिका घेतली आहे. कोणत्याही इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार आहोत. सरकार आत्ताच आले आहे.अजून शंभर दिवस पूर्ण व्हायचे आहेत .त्यामुळे उपोषणाचा मार्ग सोडून द्यावा त्यांच्या मागणी संदर्भात चर्चा करता येईल अशी प्रतिक्रिया मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ITR Filling 2025: आयकर विभागाचा मोठा निर्णय! आयटीआर रद्द झाला तरीही पुन्हा मिळणार संधी, खात्यात जमा होणार रिफंड

HBD Sanjay Dutt : बॉलिवूडचा मुन्नाभाई किती कोटींचा मालक?

Dharashiv Crime : बँकेची लोखंडी खिडकी तोडून चोरट्यांचा आत प्रवेश; दरोड्याचा प्रयत्न फसला

Sangali Nag Panchami : सांगलीकरांची २३ वर्षांची प्रतीक्षा संपली, जिवंत नाग पकडण्याला परवानगी, नेमकं प्रकरण काय?

Honey Trap : नाशिकनंतर सांगलीतही हनी ट्रॅप, २ माजी मंत्र्यांचा सहभाग, खडसेंचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT