Sanjay Raut Saam Tv
महाराष्ट्र

यापुढे महाराष्ट्रात भाजपचं सरकार कधीच येणार नाही; संजय राऊतांचं वक्तव्य

'सरकारला अडीच वर्षे झाली विरोधकांना अडीच वर्षे झोप लागत नाही. रोज वेगवेगळी तारीख भाजपचे नेते देत आहेत.'

संभाजी थोरात, कोल्हापूर

कोल्हापूर : महाराष्ट्रात यापुढे भाजपचं सरकार कधीच येणार नाही असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज कोल्हापूरात केलं. मनसेचे माजी जिल्हा प्रमुख दिवाकर पाटील यांनी आज कागल येथे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या उपस्थित शिवसेनेत पक्षप्रवेश केला या कार्यक्रमा दरम्यान राऊत बोलत होते.

ते म्हणाले, ' २०१४ साली मी इथं आलो होतो. त्यावेळी इथले पैलवान आणि आम्ही एकमेकांच्या विरोधात लढत होतो. आता आम्ही गळ्यात गळे घालून आहोत. आज सकाळीच हसन मुश्रीफ साहेब (Hassan Mushrif) यांचा फोन आला होता. स्वाभिमान हा शब्द कोणत्या मातीत रुजला असेल ती भूमी कोल्हापूरची आहे.

शाहू महाराज यांच्या विचाराने आताचं महाविकास आघाडी सरकार चालत आहे. आपल्या सरकारला अडीच वर्षे झाली. विरोधकांना अडीच वर्षे झोप लागत नाही. रोज वेगवेगळी तारीख भाजपचे नेते देत आहेत. सरकार पडण्याची तारीख पे तारीख दिली जात आहे. आम्ही अडीच घर चाललो आहोत. तुम्हालाच खेळता येत असं नाही. तर आम्हाला खेळता येत आणि खेळवताही येत' असं म्हणत राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

हे देखील पाहा -

भाजपवाले (BJP) सतत हा फुटणार तो फुटणार सांगत सुटले. या कागल नगरीत सांगतो यापुढे महाराष्ट्र राज्यात भाजपचे सरकार कधीच येणार नाही. असं देखील राऊत यावेळी म्हणाले. राऊत पुढे म्हणाले, 'शाहू महाराजांनी भाजपचा बुरखा फाडला, ३० वर्षे भगवा खांद्यावर घेऊन काम करणाऱ्या संजय पवार (Sanjay Pawar) यांना राज्यसभेत पाठवण्याचा निर्णय उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी घेतला. आमच्या राष्ट्रभक्तीमध्ये कुठेही भेसळ नाही.

गेल्या ३ वर्षात ५० हल्ले झाले आहेत, यांचे काही नेते म्हणतात पोलीस बाजूला करा मग सांगतो. आम्ही म्हणतो ईडी बाजूला करा मग आम्ही पण सांगतो. राम ते औरंगजेब असा यांचा प्रवास सुरु आहे. ऊठ सूट कबरीच काय झालं म्हणतात, ती कबर केंद्राच्या ताब्यात आहे ती फोडून दाखवा असं आव्हानचं राऊतांनी भाजपला दिलं.

तसंच काश्मीरमध्ये रोज कश्मिरी पंडितांची हत्या होते. यावर कधी पंतप्रधान बोलत नाही. भाजपवाल्यांचे हिंदुत्व कुठं आहे तर ज्ञानव्यापीमध्ये, ते महागाईवर कोण काही बोलत नाहीत, बेरोजगारीवर कुणी बोलत नाही. सत्तेवर आल्यावर दोन कोटी नोकऱ्या देणार होता त्या कुठे गेल्या? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT