Heat Stroke Saam tv
महाराष्ट्र

Heat Stroke : भंडाऱ्यात उष्माघाताचा पहिला बळी; आणखी पाच जण घेताय उपचार

Bhandara News : जिल्ह्यात उष्णतेची लाट पसरली असून जिल्ह्यात आज ४५ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे.

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 

भंडारा : अंगाची लाहीलाही करणारे तापमान सध्या आहे. भंडारा जिल्ह्यात देखील उष्णतेची लाट पसरली असून वाढत्या तापमानामुळे अनेकांना याचा त्रास झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. दरम्यान भंडारा जिल्ह्यात उष्मघाताचा त्रास होऊन जिल्ह्यात यंदा पहिला मृत्यू झाला आहे. तर आणखी पाचजण उपचारासाठी रुग्णालयात दाखल आहेत.

भंडारा (Bhandara) जिल्ह्याच्या लाखांदूर येथील भास्कर तरारे (वय ५१) या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. उन्हामुळे त्रास जाणवू लागल्याने भास्कर तरारे यास जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान उपचारादरम्यान भास्कर यांचा मृत्यू झाला. भंडारा जिल्ह्याचे तापमान वाढत आहे. जिल्ह्यात उष्णतेची लाट (Heat Wave) पसरली असून जिल्ह्यात आज ४५ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. 

वाढत्या तापमानामुळे (Temperature) शहरातील रस्ते निर्मनुष्य झाले असुन नागरिकांनी घराबाहेर पडू नये असा सल्ला दिला जातो. अश्या परिस्थितीत उन्हाचा त्रास होऊन लोक आजारी पडून लागले आहेत. अश्यातच या उस्माघाताचा पहिला बळी भंडारा जिल्ह्यात गेला असून आणखी पाच रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयाला उपचार घेण्यासाठी दाखल आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT