Ajit Pawar In Bhandara Saam Tv
महाराष्ट्र

Ajit Pawar : अजित पवारांचं भाषण सुरू असताना कार्यक्रमात गोंधळ, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Bhandara News : अजित पवारांचं भाषण सुरु असताना कार्यक्रमात गोंधळ, नेमकं काय घडलं?

Satish Kengar

Ajit Pawar In Bhandara :

एक मोठी राजकीय बातमी समोर येत आहे. भंडार येथे शासन आपल्या दारी कार्यक्रम सुरु असताना काही लोकांनी गोंधळ घातल्याची माहिती मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे भाषण करत असताना हा गोंधळ घालण्यात आला आहे.

यातच पोलिसांनी मध्यस्थी करून गोंधळ घालणाऱ्यांना शांत केलं आहे. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. ज्यात अजित पवार भाषण करत असताना काही लोक घोषणा देत असल्याचं दिसत आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हा गोंधळ झाला तेव्हा अजित पवार हे गोंधळ झाला तेव्हा अजित पवार हे मराठा आरक्षणावर महत्वाचे बोलत होते. ते म्हणाले आहेत की, ''आरक्षण देताना ते सुप्रीम कोर्टात टिकले पाहिजे. इतर समाजाला ही त्याचा नुकसान होऊ नये, असे प्रयत्न सरकार करत आहे. मात्र, काही लोक वेगळ्या पद्धतीचे वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहेत.'' (Latest Marathi News)

या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले आहेत की, महायुतीचे सरकारच्या योजना घरोघरी पोहचाव्या यासाठी हा कार्यक्रम घेत आहोत. अनेकांना योजनांचा लाभ मिळत आहे. कारभार लोकाभिमुख असला पाहिजे. सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत.

अजित पवार म्हणाले, सरकारच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये योजनेवर खर्च करण्यात आले आहेत. विमा असो की शेतकऱ्यांसाठी अन्य योजना असो. यामुळे 47 लाख 63 हजार लोकांना लाभ होणार आहे. पिकविम्यात मोठा संख्यने शेतकऱ्यांना लाभ झाला. आम्ही मूळचे शेतकरी आहोत. त्यामुळे आम्हाला येणाऱ्या अडचणी माहीत आहे, शून्य टक्के व्याजाने सरकार काम करत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Garlic Peeling: लसूण सोलण्यासाठी घरच्या घरी वापरता येतील अशा सोप्या पद्धती

Hair Care: केसांचे नुकसान टाळायचंय? मग 'या' गोष्टी आजपासूनच बंद करा

Sun Transit 2025: आजपासून या राशींचं नशीब पालटणार; 12 वर्षांनी सूर्य करणार गुरुच्या नक्षत्रात प्रवेश

Sunday Horoscope : भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरेल; ५ राशींच्या लोकांचा दिवस आनंदी जाणार

Maharashtra Politics : राज्याचं राजकीय समीकरण बदललं, 'ठाकरे'च विरोधी पक्षाचा चेहरा? VIDEO

SCROLL FOR NEXT