शुभम देशमुख
भंडारा जिल्हा हा धान्य उत्पादक जिल्हा आहे. येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात धान्याची लागवड करत आहेत. मात्र धान्य शेती परवडत नाही म्हणून अनेक शेतकरी भाजीपाला पिकाकडे वळले आहेत. भाजीपाला पिकाकडे वळलेल्या अशाच एका शेतकऱ्याची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे.
मोहाडी तालुक्यातील जांब येथील झलकराम बोरकर यांच्याकडे वडिलोपार्जित १० एकर शेती आहे. त्यामुळे त्यांनी दोन एकर शेतीमध्ये फुलगोबीची लागवड करण्याचे ठरवले. त्यांनी मौदा येथील नर्सरीमधून शिजेंटा कंपनीचं टेट्रिस वाणाची 33 हजार रूपयांची 33 हजार झाडे खरेदी करून आणली. तसेच लागवड देखील केली.
आता फुलगोबिला फूल आलं व बाजारात विक्री करीता नेणार तितक्यात फुलगोबी खराब होऊ लागली. याची माहिती शेतकऱ्यांनी शिजेंटा कंपनीला कळविली. कंपनीचे कर्मचारी आले पण गोबी वातावरणामुळे खराब झाल्याचे त्यांनी सांगितले. पण बाजूच्या शेतकऱ्यांची गोबी वातावरणामुळे खराब झाली नाही मग माझी का? असा प्रश्न शेतकऱ्यांनी केला.
त्यावर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तुम्हाला जे करायचे ते करा, अशा शब्दांत शेतकऱ्याला उत्तर दिलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे ५ लाखांचे नुकसान झाले आहे. आता शेतकऱ्यांनी कंपनीवर गुन्हा दाखल करून योग्य मोबदला द्यावा अशी मागणी कृषी विभागाकडे तक्रार देत केली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.