Manjra Dam  Saam tv
महाराष्ट्र

Water Shortage : बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यावर पाणी संकट?; मांजरा धरणातील पाणीसाठा होतोय कमी

Beed News : यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. यामुळे राज्यातील अनेक भागात भीषण पाणी टंचाई जाणवू लागली आहे. धरणात असलेला पाणीसाठा देखील खालावत असल्याचे पाहण्यास मिळत आहे.

विनोद जिरे

बीड : यंदा पाऊस कमी झाल्याने पाणी संकट निर्माण झाले आहे. धरणात असलेल्या पाणीसाठ्याची देखील पातळी खालावत आहे. अशाच प्रकारे मांजर धरणातील (Manjra Dam) पाणी पातळी देखील कमी होत असल्याने (Beed) बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मोठं पाणी संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Maharashtra News)

यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस (Rain) झाला आहे. यामुळे राज्यातील अनेक भागात भीषण पाणी टंचाई (Water Crisis) जाणवू लागली आहे. धरणात असलेला पाणीसाठा देखील खालावत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. यामुळे शहरांना होत असलेल्या पाणी पुरवठ्यात कपात होत असल्याचे चित्र देखील आतापासून पाहण्यास मिळत आहे. हीच परिस्थिती बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण मांजर धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा) -

बीडसह (Latur) लातूर, उस्मानाबाद जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे बीडच्या केज तालुक्यातील धनेगावच्या मांजरा धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याचं समोर आलं आहे. गेल्या ४ दिवसांपूर्वी १० टक्के असणारा पाणीसाठा आज घडीला ९.५१ टक्क्यांवर आला असून अवघ्या ४ दिवसात तब्बल ०.४९ टक्के पाणीसाठा कमी झाला आहे. यामुळ उन्हाळा आता कुठं सुरू झाला असून एप्रिल आणि मे महिन्यात बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यावर पाणी संकट ओढवण्याचं चित्र निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूरमधील चेट्टीनाड कंपनीच्या ट्रान्सफार्मरला भीषण आग

Todays Horoscope: आज या राशींनी ताण कमी करण्याचा प्रयत्न करावा, वाचा राशीभविष्य

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

SCROLL FOR NEXT