Bajar Samiti Election Saam tv
महाराष्ट्र

Bajar Samiti Election: मातब्बरांची प्रतिष्ठा पणाला; २२ हजार ५६२ मतदार निवडणार बाजार समित्यातील कारभारी

मातब्बरांची प्रतिष्ठा पणाला; २२ हजार ५६२ मतदार निवडणार बाजार समित्यातील कारभारी

विनोद जिरे

बीड : बीड जिल्ह्यात नऊ बाजार समित्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. यामध्ये अनेक मातब्बरांची (Beed) प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ९ बाजार समित्यांच्या (Bajar Samiti) १६२ संचालक पदांसाठी निवडणूक होत असून यात २२ हजार ५६२ मतदार बाजार समित्‍यांमधील कारभारी निवडून देतील. (Maharashtra News)

बीड जिल्ह्यातील ९ बाजार समित्यांच्या १६२ संचालक पदांसाठी निवडणूक जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी कडा बाजार समिती बिनविरोध झाली. त्यामुळे आता ८ बाजार समित्यांची निवडणूक येत्या २८ व ३० एप्रिलला होत आहे. यासाठी २२ हजार ५६२ मतदार बाजार समित्यांचे कारभारी (Bajar Samiti Election) निवडणार आहेत. त्यामुळे कोण कुठं बाजी मारणार? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

नेत्‍यांची प्रतिष्‍ठा पणाला

परळीत मुंडे बहीण भावांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. तर बीडमध्ये क्षीरसागर काका पुतण्याची प्रतिष्ठा पणाला लागलीय. यामध्ये सर्वपक्षीयांकडून जयदत्त क्षीरसागर यांनी चितपट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर गेवराईमध्ये राष्ट्रवादीचे नेते अमरसिंह पंडित आणि भाजपचे आमदार लक्ष्मण पवार, शिवसेना नेते बदामराव पंडित यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. माजलगावमध्ये राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळुंके यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT