गिरिष कांबळे, साम प्रतिनिधी
अंबाजोगाई येथील एका खासगी रूग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा केला जात होता. या गोष्टीचा छडा लावत ४ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले. परंतु लॅबोरटरी टेस्टिंगचा रिपोर्ट यायला एवढी दिरंगाई का? असा प्रश्न उबाठा गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी विधानभवनात उपस्थित केला. मागील अडीच वर्ष तानाजी सावंत आरोग्यमंत्री होते.
त्यांनी मागच्या काळात एकदाही या संबंधित प्रकरणावर कारवाई केली नाही का? असा सवाल उपस्थित करत प्रभु यांनी तानाजी सावंत यांना जाब विचारला. शिवाय सखोल तपास करून संबंधित असलेल्या नेत्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
अंबाजोगाई येथील एका रूग्णालयात बनावट औषधांचा सुळसुळाट होता. एकूणच सामन्यांच्या जीवाशी खेळ सुरू होता. मात्र, हे प्रकरण लवकर उघडकीस आलेच कसे नाही? औषध लॅबोरेटरी टेस्टिंगच्या रिपोर्टला १ वर्ष लागलेच कसे? एवढी दिरंगाई कशी होऊ शकते? यासह या प्रकरणाच्या संबंधित अनेक प्रश्न सुनील प्रभू यांनी विधानभवनात उपस्थित केले. तसेच मागील अडीच वर्षात आरोग्यमंत्री पद हे तानाजी सावंत यांच्याकडे होते. पण त्यांनी यावर काहीच कारवाई केली नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
जे अधिकारी या प्रकरणाच्या संबंधित होते, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. ते निष्पाप लोकांच्या जीवाशी खेळत होते, असं प्रभू म्हणालेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनंती करताना सुनिल प्रभु यांनी नेत्यांवरही कारवाई करावी असं सांगितलं. 'बनावट औषधांच्या प्रकरणाच्या निगडीत काही नेते मंडळी देखील असतील. तर, त्यांना मंत्रिमंडळ विस्तारात घेऊ नये. ठाणे भिवंडीमध्ये हे रॅकेटचे कनेक्शन आहे. जे कुणी या सगळ्या प्रकरणात असतील. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.' अशी मागणी त्यांनी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.