महिन्यांचा पाऊस अवघ्या एक दिवसात पडला आणि बारामतीकरांवरचं आभाळच फाटलं.. अवघ्या तीन तासातच निरा कालवा फुटला आणि नागरिकांची दाणादाण उडाली.
ही दृश्य पाहा.... बारामतीतील निरा डावा कालवा फुटला आणि अनेक घरांमध्ये पाणी शिरलं.. त्यामुळं अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत. एवढंच नाही तर निरा कालव्याचं पाणी शेतात शिरल्यानं उभी पिकं भुईसपाट झाली..
त्यामुळेच उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांनी सरकारकडे मदतीची मागणी केलीय. तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अजित पवारांनी जिल्हाधिकाऱ्यांना पंचनाम्याचे आदेश दिलेत...
मान्सूनच्या पहिल्याच पावसात बारामतीच नाही तर इंदापूर, भिगवणे आणि दौंड जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालंय. अनेकांचं घर खचलीय.. चूल विझलीय... वर्षभराचं साठवलेलं होत नव्हतं वाहून गेलंय... त्यामुळे सरकारनं उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा हात देण्याची गरज आहे....
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.