Aurangabad: बालकांना विकत घेतल्याच्या घटनेनंतर जिल्ह्यात मुस्कान अभियान Saam Tv
महाराष्ट्र

Aurangabad: बालकांना विकत घेतल्याच्या घटनेनंतर जिल्ह्यात मुस्कान अभियान

औरंगाबाद शहरात भीक मागण्यासाठी दीड लाख रुपयांत दोन बालकांना विकत घेतल्याची घटना उघडकीस आल्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं आहे.

डॉ. माधव सावरगावे

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद : औरंगाबाद Aurangabad शहरात भीक मागण्यासाठी दीड लाख रुपयांत दोन बालकांना विकत घेतल्याची घटना उघडकीस आल्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं आहे. जिल्हा बालकल्याण समितीच्या वतीनं औरंगाबाद शहरासह जिल्हाभरात भीक मागणाऱ्या बालकांच्या आई-वडीलांची तपासणी सुरू करण्यात आलीय. जिल्हाभरात मुस्कान अभियान राबविण्यास सुरुवात झाली आहे. त्यात शहरातील रस्त्यांवर, चौकाचौकात भीक मागणाऱ्या बालकांची तत्काळ तपासणी सुरू करण्यात आली आहे. आज सकाळपासून त्यासाठी शहरातल्या वेगवेगळ्या भागात पथके फिरून भीक मागणाऱ्या लहान मुलांना, त्याच्याशी संबंधित असलेल्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. आता त्यांच्या पालकांची संपूर्ण माहिती घेण्यात येत असल्याची माहिती बालकल्याण समितीचे प्रभारी अध्यक्ष डॉ. मनोहर बन्सवाल यांनी दिली आहे.

हे देखील पहा-

औरंगाबाद शहरातील रामनगर भागात जनाबाई जाधव आणि तिच्या मुलीने बुलढाणा आणि जालना जिल्ह्यातून एक ५ वर्षांचा मुलगा ५० हजार रुपयात तर दोन वर्षांचा मुलगा १ लाख रुपयांना भीक मागण्यासाठी १०० रुपयांच्या बॉण्डवर करार करून विकत घेतला होता.

रामनगरमधील नागरिकांच्या सतर्कतेमुळे ही घटना उघडकीस आली. लहान लेकरांना विकत घेऊन भीक मागायला लावणाऱ्या दोघींना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर शहरात अशाच पद्धतीने लहान लेकरांना विकत आणून भीक मागायला लावले जाते का याचा तपास सुरू झाला आहे.

औरंगाबाद शहरातील सिग्नल आणि चौकाचौकात भीक मागणाऱ्या मुलांची पाहणी करायला सुरुवात झाली आहे. त्यामध्ये म्हाताऱ्या पुरुष महिला सोबतच दहा वर्षाखालील अनेक मुले, मुली भीक मागताना आढळून आली आहेत. ज्यावेळी यांना ताब्यात घेतले त्यानंतर मुलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, ती बोलण्याच्या मनस्थितीमध्ये दिसून आली नाहीत.

यातील अनेक मुलांना त्यांचे मूळ नाव, गाव, आई-वडिलांची नावेही सांगता येत नाहीत. यात विशेष म्हणजे ही मुले भीक मागण्याशिवाय इतर काहीही बोलण्यास तयार नसल्याचेही दिसून आले. औरंगाबाद शहरातील रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलांची तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. यात मुलांचे आई वडील तपासण्यात येतील. या मोहिमेत काही मुलांचे आई वडील सापडले नाहीत तर त्यांना बालगृहात दाखल केले जाणार असल्याचेही डॉ. मनोहर बन्सवाल यांनी सांगितले आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dasara Melava: बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण होणार? दसरा मेळाव्यात राज-उद्धव एकत्र येणार?

TCS Layoffs: TCSमध्ये 30 हजार नोकरकपात? आयटी कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचं सावट

Nilesh Ghaywal : खाकीचा खुळखुळा, गँगस्टर पळाला; निलेश घायवळला पळवणारे पुणे पोलिसांमध्ये कोण? VIDEO

Black Pepper : दररोज काळीमिरी खाल्ल्याने आरोग्याला होतात 'हे' भन्नाट फायदे

Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील हल्ला खोटा? अहवालात नेमकं काय?

SCROLL FOR NEXT