Aurangabad Accident : जिल्ह्यातून पाण्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. देऊळघाट येथील एक 8 वर्षीय मुलगी पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेली असता तिचा पाय घसरून 70 फुट खोल विहिरीत पडली. या अपघातात ती गंभीर जखमी झाल्याने तिला तातडीने जिल्हा समान्य रुग्णाल्यात भरती केले. मात्र उपचारा दरम्यान ती दगावली. पाण्यासाठी जिल्ह्यातील पाहिला बळी गेला असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Accident)
देऊळघाट येथे गेल्या 70 वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची भीषण पाणी टंचाई आहे, 25 हजार लोकसंख्या असलेल्या देऊळघाट येथील धनगर वाडी परिसारातील अंजली भरत शेजोळ ही बालिका पाणी भरण्यासाठी परिसरातील विहिरीवर गेली होती. त्याच वेळेस तिचा पाय घसरून ती 70 फूट खोल विहिरीत पडली. त्यात तिचा दुर्दैवी मृत्यू झालंय.
या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच विहिरीत पडण्याची ही 10 वी घटना होती, परिसरातील आतापर्यंत 10 व्यक्ती यामध्ये पडले असून 9 जणांना कायमचे अपंगत्व आले आहे. दरम्यान पाणी टंचाईवर कायमची उपाय योजना करण्याच्या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी बुलढाणा अजिंठा महामार्ग आडवून धरला आहे.
पाण्याच्या बाबतीत वारंवार जिल्हाधिकारी यांना निवेदने दिली जातात मात्र देऊळघाट वासियांची कायमस्वरूपी तहान भागविण्यात प्रशासणाला अद्याप यश मिळाले नाही , त्रस्त नागरिक आता मोठ्या आंदोलनाच्या तयारीत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.