police constable annabhau shirsath saam tv
महाराष्ट्र

गुन्ह्यातून नाव काढून टाकतो! लाच घेताना पोलीस हेड कॉन्स्टेबल एसीबीच्या जाळ्यात

पाच हजराची लाच स्विकारताना पोलीस कॉन्स्टेबलला एसीबीने रंगेहाथ पकडले आहे.

साम टिव्ही ब्युरो

औरंगाबाद : औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढताना दिसत आहे. चोरीच्या घटनांही धुमाकूळ घातला आहे. याच पार्श्वभूमीवर औरंगाबाद पोलीस (Police) प्रशासनाकडून गुन्हेगारांवर कडक कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. मात्र, औरंगाबाद शहरातील वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात धक्कादायक प्रकार घडला आहे. गुन्ह्यातून नाव काढून टाकण्यासाठी तक्रारदाराकडून (Bribe Crime) पाच हजराची लाच स्विकारताना पोलीस कॉन्स्टेबलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau) रंगेहाथ पकडले आहे. अण्णासाहेब शिरसाठ असे आरोपी पोलीस हेड कॉन्स्टेबलचे नाव आहे. यामुळे औरंगाबाद पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वरिष्ठ कार्यालयात नोंद झालेल्या गुन्ह्यातून नाव काढून टाकून कारवाई होणार नाही, असं शिरसाठने तक्रारदार व्यक्तीला सांगितलं होतं. त्यानंतर तक्रारदाराकडे गुन्ह्यातील नाव काढून टाकण्यासाठी दहा हजार रुपयांची मागणी आरोपी शिरसाठने केली होती.

त्यानंतर या रक्कमेत तडजोड करून पाच हजार रुपयांची मागणी करण्यात आली. या गंभीर प्रकरणाची एसीबीला खबर मिळताच आरोपी विरोधात सापळा रचण्यात आला. त्यानंतर तक्रारदाराकडून पाच हजरांची लाच स्विकारताना पोलीस कॉन्स्टेबलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT