ManojJarangePatil saam tv
महाराष्ट्र

देवाभाऊंच्या घरी जरांगेभाऊ जाणार, अमृता फडणवीसांकडून जरांगेंना जेवणाचं आमंत्रण

Amruta Fadnavis Invites Jarange Patil for Dinner: मुख्यमंत्री फडणवीसांशी संघर्ष सुरू असताना अमृता फडणवीस यांनी जरांगेंना निमंत्रण दिलंय. आणि विशेष म्हणजे जरांगेंनीही त्यांचं निमंत्रण स्वीकारलंय. नेमकं काय आहे हे निमंत्रण ? आणि जरांगे वर्षावर कधी येणार? यावरचा हा रिपोर्ट...

Suprim Maskar

जरांगे पाटलांच्या आंदोलनाला 13 दिवस उलटल्य़ानंतरही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारला तोडगा काढता आलेला नाही... अशातच जरांगेंनी मुंबईत निर्णायक आंदोलनाचा इशारा सरकारला दिलाय...त्यातच , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मनोज जरांगे यांना घरी जेवणाचे निमंत्रण दिल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलयं...अमृता फडणवीस काय म्हणाल्या ऐकूय़ात...

अमृता फडणवीसांनी जेवणाचं आमंत्रण दिल्यानंतर जरांगेंनीही सकारात्मक प्रतिक्रिया दिलीय.. ताईंनी लढाईत जेवायला बोलवू नये, मात्र भाऊबीजेला साडी-चोळी घेऊन जेवायला घरी येतो, असा टोला जरांगे पाटलांनी लगावलाय... दुसरीकडे जरांगेंसोबत जेवण, नाष्टा करायला आम्ही तयार आहोत. पण ते आम्हाला शिव्या घालतात, अशी खोचक टीका प्रताप सरनाईक यांनी केलीय...

जरांगेंनी आधीच सरकराला 12 सप्टेंबरचा अल्टिमेटम दिलाय. .... त्यानंतर मुंबईतील आंदोलनासाठी मराठ्यांना सज्ज राहायला त्यांनी सांगितलयं...अमृता फडणवीसांचं निमंत्रण जरांगेंनी स्वीकारलंय. मात्र जेवायला साडीचोळी घेऊन भाऊबीजेला जाणार असल्याचं सांगून जरांगेंनी आताची वर्षावरची वारी ही मराठा आरक्षणासाठीच असल्य़ाचं सांगून संघर्षाची भूमिका कायम ठेवलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील इळेगाव येथे पोलिसांवर वाळू माफियांचा हल्ला

फ्लॅटच्या 7/12 साठी लवकरच कायदा, फ्लॅटधारकांना आता डिजिटल प्रॉपर्टी कार्ड

विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूण बंदी, भाजप आमदाराच्या शाळेत अजब फतवा

Team India Squad : टी २० मालिकेआधी टीम इंडियात मोठा बदल; गंभीरचा सर्वात विश्वासू खेळाडू बाहेर, 'विदर्भ एक्स्प्रेस'ची संघात एन्ट्री

एक-दोन दिवसात कुणबी प्रमाणपत्र देणं शक्य नाही; जरांगेंच्या मागण्यांवर जालनाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी थेट नियमच सांगितला

SCROLL FOR NEXT