अजित पवार यांच्या विमान अपघातावर संशयाची छाया
आमदार अमोल मिटकरी यांनी सरकारकडे थेट प्रश्न उपस्थित केले
मृतांची संख्या आणि पायलट बदलावरून गोंधळ
राष्ट्रवादी नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांची पारदर्शक चौकशीची मागणी
प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर आमदार अमोल मिटकरी यांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. 'साम'शी बोलतांना आमदार अमोल मिटकरी यांनी या गंभीर प्रश्नावर उत्तर देण्याची विनंती सरकार आणि यंत्रणांना केली आहे. अपघातानंतर डीजीसीएने सहा लोकांचा मृत्यू झाल्याचा म्हटलं होतं. मग पाच मृतदेह कसे समोर आलेत? विमान आणि विमान चालक यांचा इतिहास समोर असतानाही तेच विमान आणि तोच विमान चालक कसा देण्यात आला.
आदल्या रात्री अजितदादांचा दौरा वेगळा असताना ऐनवेळी विमानाने जाण्याचा निर्णय कसा झाला. यासंदर्भात लवकरच पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेणार आहोत असे अमोल मिटकरी म्हणाले. तसेच राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी देखील मोठा संशय व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे.
पोस्टमध्ये नेमकं काय?
मा.अजित दादांच्या अचानक जाण्याने बधिर झालो कसे झाले का झाले काहीच कळत नाही.देवाने लाखोच्या पोशिंदा नव्हता न्यायचा आमच्या सारखे नेहयचे होते अत्यंत अघटीत घडले.आता जे घडले त्याचे सत्य संपूर्ण तपशील,पारदर्शक चौकशी जगासमोर येणे तितकेच महत्वपूर्ण आहे. राहून राहून मनात हे प्रश्न येतात त्याची उतरे मिळाली पाहिजेत.
फ्लाइट 8 वाजता असताना कॅप्टन मदन आणि कॅप्टन यश ट्राफिकमध्ये अडकल्याचा दावा, दोघांचा एकाच वेळी उशीर, अचानक पायलट बदल आणि त्यानंतरची सेफ्टी प्रक्रिया—या सर्व बाबींची सविस्तर व पारदर्शक माहिती सार्वजनिक का नाही? याची चौकशी होणे गरजेचे कारण घात की अपघात?असे रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.