Maharashtra Live News Update Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update : अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळांवरोधात अधिकाऱ्यांचं आंदोलन

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज मंगळवार, दिनांक ५ ऑगस्ट २०२५, महाराष्ट्रात पावसाची विश्रांती, संसदेचे पावसाळी अधिवेशन, राज-उद्धव एकत्र येण्यावर चर्चा, राज्यातील राजकीय घडामोडी, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

उपमुख्यमंत्री अजित पवार बीड दौऱ्यावर राष्ट्रवादीचे बॅनर वरून धनंजय मुंडे यांचा फोटो गायब

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार हे बीडच्या दौऱ्यावरती असून अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये बीडच्या वळवणीतील मुंडे पिता-पुत्र राष्ट्रवादी अजित पवार गटांमध्ये प्रवेश करत आहेत राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे यांचा प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी अजित पवार गटांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश होत आहे या प्रवेशाच्या बॅनर वरती माजी मंत्री आणि नेते धनंजय मुंडे यांचा फोटो गायब आहे तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्या समर्थक आणि पक्षाचे शहराध्यक्ष अमर नाईकवाडे यांच्या बॅनरवरून आमदार प्रकाश सोळंके यांचा फोटो गायब झाल्याचे पाहायला मिळत आहे

महादेवी हत्तीणीसाठी गडहिंग्लज तहसीलदार कार्यालयावर काढण्यात आला मोर्चा

नांदणी इथल्या महादेवीसाठी आज गडहिंग्लज तहसीलदार कार्यालयावर काढण्यात आला मोर्चा

मोर्चामध्ये हजारो नागरिक सहभागी

गडहिंग्लज इथल्या दसरा चौक परिसरातून तहसीलदार कार्यालयापर्यंत काढण्यात आला मोर्चा

Pune: पुण्यातील विसर्जन मिरवणुकीचा वाद टाळण्यासाठी पोलीस आयुक्तांनी बोलवल्या गणेश मंडळाच्या बैठका

सकाळी सात वाजता सार्वजनिक मिरवणूक काढण्यावर ठाम असलेल्या 100 गणेश मंडळाची सुरुवातीला बैठक घेणार

त्यानंतर शहरातील मानाचे नसलेले मात्र महत्त्वाचे गणेश मंडळ असलेले अखिल मंडई गणेश मंडळ भाऊ रंगारी गणेश मंडळ दगडूशेठ गणेश मंडळ यास नामांकित गणेश मंडळाची होणार बैठक

पुण्यातील मानाच्या पाच गणपतीच्या गणेश मंडळ कार्यकर्त्यासोबत पोलीस आयुक्त घेणार बैठक दिवसभर पोलीस आयुक्त कार्यालयात बैठकीचे सत्र सुरू असणार

Nashik: अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळांवरोधात अधिकाऱ्यांचं आंदोलन

- मंत्री झिरवाळांविरोधात अधिकाऱ्यांचं एक दिवसीय लेखणी बंद आंदोलन

- नंदुरबारच्या अधिकाऱ्याचं चुकीच्या पद्धतीने निलंबन केल्याचा आरोप करत केलं लेखणी बंद आंदोलन

- काल सोमवारी अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिवस केलं लेखणी बंद आंदोलन

- कोकाटेंपाठोपाठ नाशिकच्या दुसऱ्या मंत्र्यांविरोधात नाराजी

सोलापूरात चोरीचे सोने विकायला आलेल्या दोघांना पोलिसांनी केली अटक

चोरी केलेले सोने विकायला आलेल्या दोन संशयितांना सोलापूर एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.अटक करण्यात आलेल्यांकडून दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.या कारवाईत पोलिसांनी 1 लाख 91 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.बंडू पवार आणि उमेश काळे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.या दोघांनी सोलापूर शहरातील विनायक नगर आणि बाळकोटे नगर येथे घरफोडी केल्याची कबुली दिली आहे.

Solapur: सोलापुरात लंपी आजाराचा प्रादुर्भाव, एकाच महिन्यात तब्बल 33 जनावरांचा मृत्यू

- जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील लंपी आजारातील जनावरांच्या आजार प्रतिबंध लस देण्याचे काम युद्ध पातळीवर

- जिल्ह्यात एकाच महिन्यात 1544 जनावरांना लंपी आजाराचा प्रादुर्भाव,1108 जनवारे झाली बरी

- जिल्ह्यातील 403 लंपी आजारग्रस्त जनावरांवर उपचार सुरू

- जिल्ह्यातील माळशिरस आणि माढा तालुक्यात लंपीचा प्रादुर्भाव

Nandurbar: आरोग्य विभागाने वर्षभरापूर्वी तब्बल दीड ते पावणे दोन कोटी रुपये खर्चून घेतलेली बोट ॲम्बुलन्स बुडाली....

नंदुरबार जिल्ह्यातल्या नर्मदा नदीच्या काठावरील गावांच्या आरोग्यासाठी या ठिकाणी होती बोट ॲम्बुलन्स तैनात ..

बोट अ‍ॅम्ब्युलन्स सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रयत्न अंतिम टप्प्यात....

नंदुरबार जिल्ह्यातील सरदार सरोवर धरण क्षेत्रात अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने आरोग्य विभागाच्या बोट अ‍ॅम्ब्युलन्सच्या मागील भागाचा सुमारे 30 टक्के भाग पाण्याखाली....

ही परिस्थिती निर्माण होताच आरोग्य विभागाचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले बचावकार्य सुरू....

कोथरूड मुलींना मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ प्रकरणात अपडेट

या प्रकरणात पोलिसांकडून कोणता हलगर्जीपणा झालाय का याची चौकशी एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याकडून करण्यात आलीय....

चौकशी अंती पोलिसांकडून कोणताही हलगर्जीपणा झाल्या नसल्याचं एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अहवाल सादर करण्यात अलाय...

हे प्रकरण झाल्यानंतर पीडित महिलांनी ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली होती त्याचा देखील आज पुणे पोलिसांना अहवाल सादर होणार..

राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षांचा 'कार'नामा,आमदार नसतानाही गाडीवर आमदार लोगो

- अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या गाडीवर आमदार असणारा लोगो लावल्याचा प्रकार आला समोर

- आमदार नसतानाही गाडीवर आमदाराचा लोगो लावल्याने सोलापुर जिल्ह्यात चर्चेचा आले उधाण

- उमेश पाटील यांच्या एम एच 04 एच डी 5565 या नंबरच्या गाडीवर सोलापुरातील विश्रामगृह येथे आमदाराचा लोगो असल्याचे दिसून आले

- महाराष्ट्रातील 288 विधानसभा सदस्य आणि 78 विधान परिषद सदस्यांना शासकीय कामासाठी गाडीवर आमदाराचा लोगो लावण्याचा आहे अधिकार

मनपाच्या 'आपली बस'ची सीताबर्डी ते बुटीबोरी पर्यंत बससेवा सुरू

- बुटीबोरीचे नगराध्यक्ष बबलू गौतम यांच्या उपस्थितीत बससेवेचा शुभारंभ करण्यात आला...

- प्रवाशांची संख्या आणि त्यांची मागणी लक्षात घेऊन मनपाच्या वाहतूक विभागाने नागपूरच्या सीताबर्डी ते बुटीबोरी गावापर्यंत आपली बसची सेवा सुरू केली आहे

- दररोज अर्ध्या तासाच्या अंतराने ही बस सेवा उपलब्ध राहणार आहे...

- नोकरीसाठी ये- जा करणाऱ्या प्रवाशांसाठी ही बससेवा उपयुक्त ठरणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे नागपूर जिल्हा परिषदेत वाढणार ओबीसींचे संख्याबळ

-नागपूर जिल्हा परिषदेचे सार्वत्रिक निवडणूक 2017 मध्ये झाली होती, त्यावेळी ओबीसींचे एकूण 16 सदस्य होते

- मात्र सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केल्यानंतर ओबीसींचे संख्याबळ 11 झाले

- आता न्यायालयाच्या नव्या निर्णयामुळे जिल्हा परिषदेत पुन्हा 27 टक्के आरक्षण लागू होणार आहे

- त्यामुळे जिल्हा परिषदेच्या एकूण 57 जागांपैकी 15 जागा ओबीसींसाठी आरक्षित होतील

- यामुळे नागपूर जिल्हा परिषदेतील ओबीसी सदस्यांचे प्रतिनिधित्व पूर्वपदावर येणार आहे

शिवसेना शिंदे गटाकडून शावना एन. सी. यांची राष्ट्रीय प्रवक्तेपदी नियुक्ती

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पावलावर पाऊल ठेवत शिवसेना शिंदे गटाव्यक्तीलाअमराठी व्यक्तीला पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्ते पदी नेमले आहे. शायना एन सी. यांची शिवसेना शिंदे गटाच्या राष्ट्रीय प्रवक्ते पदावर निवड करण्यात आली आहे. एक वर्षासाठी ही निवड करण्यात आली असल्याचे शिवसेनेकडून काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.

अनधिकृत स्टोन क्रशरच्या विरोधात लाडक्या बहिणींचा सातारा ते मंत्रालय पायी मोर्चा

सातारा वाईतील अनधिकृत दगडखान आणि स्टोन क्रशर विरोधात साताऱ्यातील कुसगांव, एकसर, व्याहाळी, वाई या गावातील ग्रामस्थांचा सातारा ते मंत्रालय असा तब्बल 230 किलोमीटर पायी मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्च्यात लाडक्या बहिणींचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग असून, शासन आणि प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरल्या असल्याचं त्यांनी सांगितलंय..या अनधिकृत दगड खाणीमुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिक तसेच प्राण्यांच्या जीवनमानावर मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होतं आहे. तसेच खाणीत करण्यात येणाऱ्या ब्लास्टिंग मध्ये तेथील स्थानिक नागरिकांच्या पाळीव प्राण्यांचा जीव देखील गेला असल्याचं या मोर्चेकऱ्यांच म्हणणं आहे.. तसेच हा मोर्चा मंत्रालयात जाऊन धडकणार असून एवढं करून देखील जर न्याय मिळाला नाही तर समस्त ग्रामस्थ मोर्चेकरी सामूहिक आत्मदहन करण्याचा ईशारा यावेळी मोर्चेकरी ग्रामस्थांनी दिलाय...

- नाफेडची कांदा खरेदी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

- अवसायनात गेलेल्या संस्थेकडून नाफेडची कांदा खरेदी

- अवसायनात गेलेल्या बाळासाहेब ठाकरे अटल नाविन्यपूर्ण सहकारी संस्थेकडून नाफेडची कांदा खरेदी

- जिल्हा उपनिबंधकांकडून नाफेडला नोटीस, तातडीनं कांदा खरेदी थांबवण्याचे निर्देश

- दरवर्षीप्रमाणेच यंदा देखील नाफेडच्या कांदा खरेदी अनियमितता?

- तर सिन्नर तालुक्यात २ केंद्रांवर जिल्हा उपनिबंधकांच्या पथकाचे छापे

- प्रत्यक्ष खरेदी केलेला कांदा आणि चाळीत साठवलेल्या कांद्यात तफावत आढळली

- कांदा खरेदीत त्रुटी आढळल्याने नाफेडची कांदा खरेदी पुन्हा संशयाच्या भोवऱ्यात

भारतीय डाक विभागाची सेवा आता होणार जलद.. ॲडव्हान्स पोस्टल टेक्नॉलॉजीचा झाला शुभारंभ...

भारतीय डाक विभागाची सेवा आता जलद गतीने होणार असल्याने खातेदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.. बुलढाणा डाक विभागाच्या मुख्य कार्यालयामध्ये आज APT 2.0 अर्थात ॲडव्हान्स्ड पोस्टल टेक्नॉलॉजीचा शुभारंभ अधीक्षक गणेश अंभोरे यांच्या हस्ते पार पडला.. APT 2.0 प्रणाली ही भारतीय डाक विभागाची आधुनिक डिजिटल प्रणाली आहे, या प्रणालीमुळे भारतीय डाक विभागाला आता जलद सेवा देता येणार आहे..

भर पावसाळ्यात पाणी टंचाई, महिलाची पाण्यासाठी भटकंती...

गेल्या दोन महिन्यापासून जिल्ह्यात दमदार पाऊस झाला आहे, चिखली तालुक्यातील काही धरबे गाव तलाव जेमतेम भरले आहेत , पेन टाकळी ओहरफ्लो झाले आहे अश्या अवस्थेत तालुक्यातील सावरखेड हे गाव पेनटाकळी धरण नजिक आहे मात्र गेल्या 6 महिन्यापासून मानवी संकटामुळे गावाला पाणी पुरवठा केल्या जात नसल्याने ग्रामस्थांना भर पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लगत असल्याचे चित्र समोर आले आहे... पाणी पट्टी कर भरला असून घर पट्टी कर काही जणांचे राहिले असल्या कारणाने सरपंच व ग्रामसेवकाने पाणी पुरवठा बंद केल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.. अश्या मुजोर ग्रामसेवक व सरपंचावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ करताना दिसत आहे.. 1000 लोकवस्ती असलेल्या सावरखेड गावात नादुरस्त हातपंप आहे त्याला पाणी नाही, त्यामुळे कुठेतरी दूरवरील विहिरीचे पाणी आणण्यासाठी महिलांना भटकंती करावी लगत आहे.. तातडीने जिल्हा प्रशासनाने लक्ष देत ग्रामस्थांना पाणी पुरवठा करावा अशी मागणी सावरखेड येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे..

-जालन्यात केवायसी नसेल तर सप्टेंबरपासून लाभार्थ्यांना मिळणार नाही धान्य

जालना जिल्ह्यामध्ये सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत धान्य मिळवणाऱ्या ज्या लाभार्थ्यांनी अद्याप केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही अशा लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्यापासून धान्य मिळणार नाही. शासनाने यासंदर्भात कडक पावले उचलले असून सप्टेंबर महिन्यापासून केवळ केवायसी पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांनाच अन्नधान्याचा लाभ मिळणार आहे अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. जालना जिल्ह्यामध्ये अद्यापही जवळपास 3 लाख 54 हजार 887 लाभार्थ्यांची केवायसी प्रक्रिया प्रलंबित आहे. त्यामुळे केवायसी न करणाऱ्या लाभार्थ्यांचे अन्नधान्य सप्टेंबरपासून बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी लवकरात लवकर केवायसी करावी असं आवाहन पुरवठा विभागाकडून करण्यात येत आहे.

Maharashtra Live News Update : राज ठाकरे आणि बच्चू कडू यांची 6 तारखेला भेट होणार

मनसेच्या बाळा नांदगावकरांनी आमच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता...

तेव्हा दोन आक्टोंबर च्या मोर्चा संदर्भात शेतीच्या प्रश्नांवर भेटण्याचं बोलणं झालं होतं

आता योगायोगाने सहा तारखेला मी मुंबईत आहे त्यामुळे राज ठाकरेंसोबत भेट होईल

राजकारण हा वेगळा विषय आहे आणि भेटीगाठी हा वेगळा विषय आहे

वर्गणी गोळा करताना धर्मादायची परवानगी बंधनकारक

अगामी दहिहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सवात वर्गणी गोळा करताना धर्मादाय कार्यालयाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे.

अन्यथा महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था कायदा कलम ६६ क नुसार तीन महिने कारावासाची शिक्षा आणि विनापरवानगी जमा केलेल्या रकमेच्या दीडपट दंडाची तरतूद आहे.

ज्या मंडळांनी धर्मादाय आयुक्तांकडे कायमस्वरूपी नोंदणी केली आहे, त्यांना वेगळ्या परवानगी आवश्यकता नाही.

मात्र, सर्व आर्थिक वर्षांची हिशोबपत्रके ऑनलाइन दाखल करणे बंधनकारक आहे.

नोंदणीकृत नसलेली मंडळे आणि संस्थांनी ट्रस्ट कायद्याच्या कलम ४१ क अन्वये वर्गणी गोळा करण्यासाठी ऑनलाइन अर्ज करणे बंधनकारक आहे.

वाल्मीक कराडच्या वकिलांची उच्च न्यायालयात धाव,  दोष मुक्तीचा अर्ज बीड न्यायालयान फेटाळला होता उच्च न्यायालयात अपील.

आरोपी वाल्मीक कराड ने आपण संतोष देशमुख हत्या प्रकरणात दोषी नसल्याचा अर्ज बीड विशेष न्यायालयाकडे वकिलांच्या मार्फत केला होता तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता वाल्मिक कराडने आता वकिलांच्या मार्फत उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दोष मुक्तीच्या अर्ज संदर्भात आणि दोषारोप पत्रासंदर्भात उच्च न्यायालयात रिट पिटिशन दाखल केल्याची माहिती साम टीव्ही ला सूत्रांनी दिली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराडने वकिलांच्या मार्फत उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

होलार समाज महामंडळासाठी 50 कोटींची तरतूद; सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांची घोषणा

नव्यानेच स्थापन करण्यात आलेल्या होलार समाज आर्थिक विकास महामंडळासाठी 50 कोटी रूपयांची आर्थिक तरतूद केली जाईल अशी घोषणा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी केली आहे. माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथे होलार समाज मेळावा पार पडला. या मेळाव्याचे उद्घाटन मंत्री शिरसाठ यांच्या झाले. यावेळी त्यांनी होलार समाज आर्थिक विकास महामंडळासाठी निधीची घोषणा केली. यावेळी मंत्री भरत गोगावले उपस्थित होते.

अजित पवार मुख्यमंत्री होई पर्यंत गप्प बसायचं नाही - वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

अजित पवार मुख्यमंत्री होई पर्यंत आपण गप्प बसायचं नाही,असे आवाहन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना केले आहे,तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही एकमेव पार्टी आहे, जी युती मध्ये असून देखील छत्रपती, शाहू, फुले आणि आंबेडकरांचा पुरोगामी विचार सोडला नाही,असं मत देखील मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले आहे.ते सांगलीच्या आटपाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्यावतीने आयोजित युवा संवाद मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते.

कराडच्या कृष्णा- कोयना नदीच्या प्रीतीसंगमावर मगर

कराडच्या प्रीतीसंगम परिसरात कृष्णा- कोयना नदीच्या काठी मगरीचे वास्तव्य असून ड्रोनमधून हालचाल टिपण्यात आली आहे. मगरीच्या या वास्तव्यामुळे नागरिकांच्यात तसेच पोहायला जाणाऱ्या लोकांच्यात मोठे भीतीचे वातावरण आहे. आज ड्रोनच्या साहाय्याने केलेल्या चित्रीकरणात मगरीचे स्पष्ट दृश्य टिपले गेले असून, या दृष्यांनी परिसरात खळबळ उडाली आहे.

कोयना व कृष्णा नदीच्या संगमावर असलेल्या प्रीतीसंगमाला दररोज शेकडो पर्यटक, भाविक आणि स्थानिक नागरिक भेट देत असतात. ड्रोन चित्रीकरणात मगर नदीत शांतपणे तरंगताना व एका जागी स्थिरावलेली दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Relationship Trend : नातं अचानक संपलं? पण कारण कळलं नाही? घोस्टलाइटिंगचा नवा ट्रेंड वाचा

भाजपचा मविआला जोरदार धक्का, वसई-विरार अन् धाराशिवमध्ये राजकीय भूकंप, कोण कोणत्या नेत्यांनी साथ सोडली?

Indrayani : दिग्रसकरांच्या गादीचा मान अधोक्षजला मिळणार? पाहा VIDEO

Maharashtra Marine Fish : मासे उत्पादनात देशाची पीछेहाट, महाराष्ट्राची मोठी भरारी, CMFRI चा अहवाल

Tax Refund: टॅक्स रिफंड येण्यास किती वेळ लागतो? या चुका करु नका, अन्यथा पैसे येण्यास होईल विलंब

SCROLL FOR NEXT