मुलाने आत्महत्या केल्यानंतर मुलाच्या नातेवाहिकांनी मुलीला शिवीगाळ केल्यानंतर ती देखील आत्महत्या करील ही लक्षात येता बीट मार्शल यांनी तातडीने मुलीच्या घरी गेले असता मुलगी देखील गळफास घेत असताना मुलीचे वाचवण्यात आले.
आदिवासी प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी बंजारा समाज बांधवांनी महाराष्ट्रभर मोर्चा काढीत आरक्षणाची मागणी करीत असून राज्य सरकार हे आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही सरकार आदिवासी समाजाच्या पाठीशी आहे आरक्षणात घुसखोरी होणार नाही अशी प्रतिक्रिया आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी व्यक्त केलाय.
जालन्यातील अंबड तालुक्यातील बळेगाव परिसरामध्ये जोरदार पाऊस पडलाय.या पावसामुळे कपाशी , सोयाबीनसह उसाचं अतोनात नुकसान झालय. कपाशी आणि सोयाबीनच्या शेताला तर अक्षरशः तलावाचं स्वरूप आलय. शासनाने तात्काळ पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे...
नाशिक पत्रकार हल्ला ऑन गिरीश महाजन
*नाशिक पत्रकार हल्ला हा निषेधार्थी बाब आहे त्याची माहिती मी घेतली आहे .
*जिल्हाधिकाऱ्यांना माहिती घेण्याचे आदेश देण्यात आले आहे .
*मी आता नाशिकला पोहोचणार लागलीच मी त्यावर चर्चा करून कारवाईची सूचना करणार आहे .
*पत्रकारावर हल्ला हा निषेधार्थ आहे दोशींवरती कडक कारवाई होईल
*मी आता नाशिकला जाऊन पत्रकारांची भेट घेणार
जोगेश्वरी स्पोर्ट्स क्लब येथे विभाग निहाय पदाधिकारी यांच्याशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चर्चा करत आहेत
या चर्चेत विभागातील कामावर भर देण्यासाठी सूचना करण्यात आल्या आहेत
तर शिवसेनेची नोंदणी किती झाली आहे..नोंदणी वर भर द्या.
Sra चे प्रकल्प आणि त्याचा विकास रखडल्याचा पदाधिकारी यांनी विषय मांडला
तर झोपडपट्टी चा विषय sra आणि म्हाडा एकत्र मिळून सोडवू.. एकनाथ शिंदे यांनी पदाधिकारी यांना सांगितलं...
जालना -
जालन्यातील अंबड तालुक्यातील बळेगाव परिसरामध्ये जोरदार पाऊस
कपाशी, सोयाबीनसह ऊसाचं अतोनात नुकसान.
कपाशी आणि सोयाबीनच्या शेताला तलावाचं स्वरूप...
तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी..
ठाणे शहरातील वाहतुक कोंडीसह अवजड वाहनांच्या विरोधात आज ठाण्यातील पालिका मुख्यालय पाचपाखाडी या ठिकाणाहून मनसेच्या वतीने ट्राफिक मार्च काढण्यात येणार आहे. या मार्चची सुरुवात पाचपाखाडी या ठिकाणाहून थोड्याच वेळात होणार आहे. त्यानंतर आराधना सिनेमा, हरी निवास सर्कल ठिकाणी सांगता होणार आहे.
अष्टविनायक महामार्गावरुन भरधाव वेगाने जाणा-या डंपर चालकाचे अचानक नियंत्रण सुटल्याने महामार्गालगत असणा-या घराकडे घुसला यातुनही चालकाने प्रसंगावधान राखत घर वाचवले अन शौचालयावर डंपर वळवल्याने घरातील कोणीही जखमी झालेले नाही. या घटनेत घराचे शौचालय कोसळले असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अपघातानंतर डंपर शेतात जाऊन थांबला.डंपर चालक अपघातात जखमी झाला असून तो पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना सतर्क ग्रामस्थांनी त्याचा पाठलाग करून पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले.
पुणे श्रमिक पत्रकार संघाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र
या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची पत्रकार संघाची मागणी
पुणे शहरात सुद्धा अनेक पत्रकारांना धक्काबुक्की, महिला पत्रकाराचा विनयभंग या घटनेत वाढ झाल्याचं पत्रात उल्लेख
पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांवर कायदेशी कारवाई करण्याची मागणीचे पत्र पुणे श्रमिक पत्रकार संघाने मुख्यमंत्री यांना लिहिले आहे
महाड तालुक्यातील कुर्ला गावात कुत्रा चावल्याच्या घटनेनंतर शिवसेना ठाकरे गटाने महाड ग्रामीण रुग्णालय प्रशासनाविरोधात आंदोलन केल आहे. यावेळी त्यांनी रुग्णालयात अपुऱ्या सुविधांबद्दल येथील डॉक्टरांना जाब विचारला. प्रशासनाचा निषेध करीत डॉक्टरांना टाळे भेट देण्यात आले. हि परिस्थिती सुधारली नाहीतर रुग्णालयाला टाळे ठोकण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
मागील काही दिवसांपासून दररोज सायंकाळ नंतर पावसाच्या सरी कोसळत आहे.
मात्र काल दिवसभराच्या विश्रांतीनंतर आज उघाड असतांना अचानक ढगाळ वातावरण नंतर मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे.
विशेष म्हणजे आज हवामान विभागाने हवामान कोरडे राहील असा अंदाज व्यक्त केला असताना मागील पंधरा मिनिटांपासून शहरातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहे..
गोपीचंद पडळकर यांची जीभ छाटणाऱ्याला पाच लाखांचं रोख बक्षीस देऊ अशी घोषणा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी केलीय. आज राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने बदलापुरात गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी जयंत पाटील यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करत गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर अत्यंत खालच्या शब्दात टीका केल्यामुळे राज्यभरात याचे पडसाद उमटले आहेत. बदलापुरातही राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी केली. इतकच नाही नाही तर पडळकर यांची जीभ जो कोणी छाटेल त्याला पाच लाखांचं रोख पारितोषिक दिलं जाईल अशी घोषणा यावेळी अविनाश देशमुख यांनी केली. या आंदोलनात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
नाशिकमधील त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांना मारहाण करण्यात आली
या प्रकरणी मुख्यमंत्री यांनी दखल घेतली आहे
मुख्यमंत्र्यांनी मारहाण करणाऱ्या गुंडांवर कठोर कारवाई करावी असे आदेश दिले
धनगर समाजाला एसटीचे आरक्षण मिळावे यामागणीसाठी दीपक बोऱ्हाडे यांचे उपोषण सुरू आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस असून,त्यांची प्रकृती खालावल्याने धनगर समाज बांधव उपोषण स्थळी एकवटल्याचा पाहायला मिळतय..दरम्यान 24 तारेखेच्या आत धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण न दिल्यास उद्रेक होईल असा इशारा आंदोलकांनी दिलाय. तसेच 24 तारेखला जालन्यात धनगर समाजाचा इशारा मोर्चा काढण्यात येईल असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील सणसवाडी भागातील एका सोसायटीच्या खोलीतून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने छापा टाकत तब्बल वीस लाख रुपयांचा विविध प्रकारचा पानमसाला व गुटखा जप्त केला आहे. या कारवाईत बलिंदरकुमार राजकिशोर यादव असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
सणसवाडी भागातील शिवम सोसायटी मधील एका खोलीत एका गुटखा माफियाने लाखो रुपयांचा गुटखा बेकायदेशीरपणे ठेवला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने खोलीत जाऊन पाहणी केली असता पोलिसांना त्या खोलीत एक इसम आणि मोठा गुटखा व पान मसालाचा साठा मिळून आला.
वाशिम जिल्हा दौरा करून नांदेड कडे जात असताना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काळे झेंडे दाखवण्याचा केला प्रयत्न
हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांचे नुकसान झाले असताना दत्ता भरणे यांनी भेट दिली नसल्याने शिवसैनिक संतप्त
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात आमदार गोपीचंद पडळकर यांनी अर्वाच्च भाषा वापरल्याने नवापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने तीव्र आंदोलन...
मराठ्यांना दिलेल्या आरक्षणाचा ओबीसी आरक्षणावर कुठलाही परिणाम होणार नाही. वडेट्टीवारांनी यावर राजकारण करू नये, अशी प्रतिक्रिया महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. नव्या जीआरचा गैरवापर होण्याची भीती भुजबळ यांनीही व्यक्त केली. मात्र असे काहीही होणार नाही, अशी ग्वाही बावनकुळे यांनी दिली.
हिंदू मातंग संमेलन नवी मुंबई मध्ये आयोजित करण्यात आलं होतं वनमंत्री गणेश नाईक यांनी मातंग समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी सरकार कठीबुद्ध आहे तसेच मातंग समाजाच्या लोकसंख्येप्रमाणे शासनाकडून निधी आवश्यक आहे असा मी आग्रह धरलेला आहे
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यात पेरूचे भाव गडगडल्याने पेरू उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.. पेरूच्या भावात किलोमागे 15 ते 20 रुपयांची घसरण झाल्याने उत्पादन खर्च निघणेही कठीण झालंय.. एकीकडे अतिवृष्टीने बळीराजा अस्मानी संकटात सापडल्याचे चित्र असताना दुसरीकडे पेरूचे भाव गडगडल्याने पेरू उत्पादक शेतकरी हवालदील झाले आहेत..
पुण्यात स्वारगेट चौकात जय भीम संघटनेच्या वतीने गोपीचंद पडळकर यांनी बेताल वक्तव्य केल्याबद्दल यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं .गोपीचंद पडळकर यांच्या फोटोला शाई लावण्यात आलं चप्पल नी लाथ मारण्यात आले. व त्या पोस्टर वरती असे लिहिण्यात आलं. मी शेण खातो मला बोलायचं कळत नाही अशाप्रकारे आंदोलन करण्यात आले.संघटनेचे प्रदेशाध्यक्ष करण गायकवाड संघटनेचे महिला अध्यक्ष वैशालीताई राक्षे हनुमानसर सोनवणे रोहन भाऊ ठोसर सनी गायकवाड राजू कांबळे प्रदीप गायकवाड सुष्मिता टीव्ही अशाप्रकारे कार्यकर्ते उपस्थित होते
जयंत पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी पडळकर यांच्याविरोधात आज साताऱ्यात शरद पवार गटाने पडळकर यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत, पडळकर यांच्या प्रतिमेला ला चपलीने मारत निषेध आंदोलन केले.या निषेध आंदोलनाचे नेतृत्व सातारा जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी केले. यावेळी गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या या आंदोलनात महिला आघाडीचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकरी उध्वस्त झाला आहे, शेतीपिके खरडून गेली आहेत हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे, यावर शासणकर्ते बोलायला तयार नाहीत त्यामुळे उबाठा आक्रमक होऊन आज खामगाव येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत घोषणाबाजी केलीत, ओला दुष्काळ जाहीर करा तसेच नुकसान भरपाई पोटी हेक्टरी 50 हजार रुपये आर्थिक द्या अशी मागणी करण्यात आली.
पुण्यातील एमआयटी महाविद्यालयाच्या कॅम्पस मध्ये आढळून आला मृतदेह
सुभाष कामठे असे 65 वर्षीय व्यक्तीचे नाव
मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट
सुभाष कामठे दोन दिवसांपासून घरून होता बेपत्ता
कामठे मूळचे पुण्यातीलच फुरसुंगी परिसरात राहण्यास असल्याची माहिती
तसेच कामठे यांना दारूचे देखील व्यसन असल्याची प्राथमिक माहिती
एमआयटी महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये मृतदेह आढळून आल्याने खळबळ
सणसवाडी (ता. शिरूर) येथे पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल वीस लाख रुपयांचा गुटखा व पानमसाला जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि शिक्रापूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करून परप्रांतीय गुटखा माफिया बलिंदरकुमार राजकिशोर यादव (वय ३२, मूळ रा. पटना, बिहार, सध्या रा. सणसवाडी) याला अटक केली.
भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात तीन जण गंभिर झाल्याची घटना महाड तालुक्यातील कुर्ले गावातून समोर आली आहे. कुत्र्याने एका तरूणा ओठाचा लचका तोडला आहे, दुसऱ्या एका महिलेच्या हाताला, पायाला आणि डोक्याला चावा घेतला आहे तर अणखी एका महिले किरकोळ दुखापत झाली आहे. कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या या तीघांवर माणगावच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचर सुरु आहेत. तरुणाच्या तोंडाला गंभिर दुखापत झाल्याने त्याला प्लास्टिकचे सर्जरीची गरज भासणार असल्याचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले आहे. कुत्र्यांनी केलेल्या या हल्ल्याच्या घटनेनंतर या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मोठी गरज निर्माण झाली आहे.
गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात राज्यभर तीव्र संताप आणि आंदोलन सुरू असताना सांगलीमध्ये पडळकर समर्थकांकडून प्रति आंदोलन करण्यात आले आहे.गोपीचंद पडळकर यांच्या तीस फुटी पोस्टरला दुग्धभिषेक घालून गोपीचंद पडळकर यांचे समर्थन करण्यात आले आहे.
शहरातील राम मंदिर येथे गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांकडून हे आंदोलन करण्यात आले आहे.राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांच्यावर आमदार गोपीचंद पडळकरांकडुन जहरी टीका करण्यात आली,त्यानंतर राज्यभर तीव्र पडसाद उमटतं आहेत,
त्याचबरोबर सांगली जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि जयंत पाटील समर्थकांकडून पडळकरांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून पडळकर समर्थकांनी आजच सांगलीमध्ये पडळकर यांच्या समर्थनाचा आंदोलन केलं आहे.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात कोल्हापुरात जोरदार निदर्शने
शरद पवार राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून कोल्हापुरातील दसरा चौक परिसरात निदर्शने
राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक
कोल्हापुरातील दसरा चौक परिसरात कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर केलेल्या टीकेच्या निषेधार्थ ईश्वरपूर मध्ये जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं होतं. परंतु पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर या ठिकाणी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाल्याचे पहावयास मिळालं. रस्त्यावर टायर पेटवत जयंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं होतं. परंतु रास्ता रोको आंदोलनामुळे पेठ ते सांगली महामार्गावर रस्त्याच्या दुतर्फा वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाले देखील पहावयास मिळालं. त्यामुळे या ठिकाणी गोंधळाचे वातावर निर्माण झाल्याचं दिसून येतं. जयंत पाटील यांच्या कार्यकर्ते संतप्त झाले असून त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केलीये.
दोन दिवसापूर्वी माजी मंत्री जयंत पाटील यांच्या विषयी आमदार गोपीचंद पडळकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर आमदार पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोडेमारो आंदोलन केले. त्यानंतर आज आमदार पडळकर समर्थकांनी पंढरपुरात संत नामदेव पायरी जवळ दुग्धाभिषेक करत आमदार पडळकर यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.
अमरावती सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील 60 पेक्षा अधिक डॉक्टर 25 दिवसांपासून संपावर...
200 पेक्षा अधिक रुग्णांच्या शस्त्रक्रिया रखडल्या; डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णांचे प्रचंड हाल...
शासनाने अजूनही कुठलाही तोडगा न काढल्याने काँग्रेस आक्रमक सुपर स्पेशालिटी रुग्णालयासमोर आंदोलन सुरू.
सरकारकडे डॉक्टरांचे नऊ कोटी रुपयांचे मानधन थकल्याने डॉक्टर गेले संपावर....
डॉक्टरांच्या संपावर सरकारने तोडगा काढण्याची रुग्णांची आणि काँग्रेसची मागणी..
- आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी धरणे आंदोलन
- गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नागपुरात व्हेरायटी चौकात आंदोलन
- नागपूरच्या वेरायटी चौकात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून पडळकर यांच्या निषेध करत घोषणाबाजी करत आंदोलन
- आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आई वाडीलाबद्दल अपशब्द वापरले होते...
पुणे नाशिक महामार्गावर नारायणगाव बायपासला गँसची मोठी गळती
गँस वाहतुक करणा-या गाडीतुनच महामार्गावर गँस गळती, गँस गळतीची हवा सर्वत्र पसरली
अचानक गँस गळती सुरु झाल्याने नारायणगाव परिसरात घबराहट
पुणे-नाशिक मार्गावर वाहतुक सुरु असतानाच गँस गळती सुरु होती
काही वेळात गँस गळतीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले
- शासनाने कुंभाच्या पार्श्वभूमीवर शिखर समितीसह कुंभमंत्री समिती जाहीर केल्यानंतर साधू महंतांमध्ये नाराजी
- नाशिकसह तत्र्यंबकेश्वरच्या साधू महंतांची तातडीची बैठक
- त्र्यंबकेश्वर येथे सर्व आखाड्यांचे प्रमुख बैठकीला उपस्थित राहणार
- यापूर्वी कुंभ प्राधिकरणात स्थान न मिळाल्याने साधू महंतांनी व्यक्त केली होती नाराजी
- शासनाच्या समितीमध्ये स्थान न दिल्याने साधू महंत काय भूमिका घेतात? याकडे लक्ष
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अंबाबाईच्या अलंकारांची स्वच्छता पूर्ण झालेली आहे. यामध्ये देवीच्या नित्य दिनक्रमामध्ये पूजाअर्चा मध्ये वापरल्या जाणाऱ्या सोन्या-चांदीच्या अलंकारांची स्वच्छता करण्यात आली.
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडीला सुरुवात झाली आहे. महामार्गावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहनांची गती मंदावली आहे. चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. पुन्हा एकदा याच वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याचे दृश्य पाहायला मिळाले.
कल्याण शहाडमध्ये पालिकेच्या आरक्षित भूखंडावरून गोंधळ! गार्डनवर आरोग्य केंद्र वाद… रहिवासी विरुद्ध महानगर पालिका आमनेसामने!"
गार्डन दाखवून फ्लॅट विकले. रहिवाशांचा आरोप “आमचा रस्ता सोसायटीचा, परवानगीशिवाय काम नको” – नागरिकांचा आक्रमक पवित्रा
शेतकऱ्यांचे नवीन सोयाबीन बाजारपेठेत येण्यापूर्वीच सोयाबीनचे दर घसरले....
महिन्याभरापूर्वी 4500 ते 4700 रुपये प्रति क्विंटल विकल जाणार सोयाबीन आता 4000 ते 4300 रुपये प्रति क्विंटल...
क्विंटल मागे शेतकऱ्यांचा तीनशे ते पाचशे रुपयांपर्यंतचे नुकसान...
शेतकऱ्याचे नवीन सोयाबीन बाजारपेठेत आल्यानंतर आणखी दर घसरण्याची शक्यता सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात...
बीडच्या केज येथील गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर याच्याविरुद्ध केज पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे एका 16 वर्षीय मुलीवर अतिप्रसंग करण्याचा बेडसकर याने प्रयत्न केला. रात्री साडेआठच्या दरम्यान पिडीत मुलगी आणि तिच्या मावशीसह बहिणीला नाश्ता चारण्याच्या बहाण्याने आपल्या चारचाकी गाडीत निर्जनस्थळी घेऊन गेला. आणि तेथे त्याने एका 16 वर्षीय मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. याचवेळी तिथे काही लोक दाखल झाल्यानंतर बेडसकर याने तेथून पळ काढला. याप्रकरणी केज पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र ज्यावेळेस गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती त्यावेळेस हा आरोपी त्याच पोलीस स्टेशनमध्ये हजर असल्याचा फोटो देखील समोर आला आहे मग पोलिसांनी त्याच वेळेस या गटशिक्षणाधिकारी आणि आरोपी बिडकर ला ताब्यात का घेतलं नाही अशा देखील आता प्रश्न उपस्थित केला जात आहे.आरोपी फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.
नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात आज प्रहार संघटनेतर्फे नाशिक–संभाजीनगर महामार्गावर जोरदार रस्तारोको आंदोलन करण्यात आले.
एक तासाहून अधिक काळ रास्ता रोको आंदोलन सुरू.
प्रहार संघटनेच्या आंदोलनामुळे वाहनांच्या दुतर्फा रांगा.
कांद्याच्या दरवाढीसह शेतकऱ्यांना तातडीचे अनुदान आणि हमीभाव मिळावा या मागण्यांसाठी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले.
गळ्यात कांद्याच्या माळा घालून आणि डोक्यावर काळे वस्त्र बांधून शेतकऱ्यांनी केंद्र सरकारचा जोरदार निषेध नोंदवला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोला घातली कांद्याची माळ
आंदोलनकर्त्यांनी इशारा दिला आहे की, मागण्या तातडीने मान्य न झाल्यास हे आंदोलन आणखी तीव्र केले जाईल.
जवळपास 2 कोटी 61 लाख रुपयांचे ट्रक्स इंटेलिजन्स विभागाने केले जप्त
5 किलो 234 ग्रॅम मेथाकॅलोन नावाचा अमली पदार्थ आणला जात होता पुण्यात
विशिष्ट गुप्तचर माहितीच्या आधारे, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एअर इंटेलिजेंस युनिटच्या अधिकाऱ्यांनी १८ सप्टेंबर २०२५ रोजी बँकॉकहून एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट क्रमांक IX-२४१ वरून येणाऱ्या एका प्रवाशाला अटक केली.
त्यांच्या चेक-इन लगेज बॅगची झडती घेतली असता पावडर आणि क्रिस्टल स्वरूपात ५.२३ किलोग्रॅम वजनाचा पांढरा पदार्थ आढळून आला.
फील्ड टेस्टिंगमध्ये हा पदार्थ मेथाकॅलोन असल्याचे निश्चित झाले
हा प्रतिबंधित पदार्थ जप्त करण्यात आला आणि नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स (NDPS) कायदा, १९८५ अंतर्गत प्रवाशाला अटक करण्यात आली
स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानाचे "नमो उद्यान" नामकरण करण्याचा घाट घातला जात असल्याने सावरकर प्रेमींनी नाराजी व्यक्त केलीय. नाशिकच्या भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमीत सावरकर उद्यान असावे, अशी मागणी करण्यात आलीय. नमो उद्यानाला निधी नाही मिळाला, तरी चालेल अशी भूमिका शिवसेना ठाकरे गटाकडून घेण्यात आलीय. भगूरमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानाचे २४ वर्षापासून रखडलेले काम अजूनही पूर्ण झालेले नाही. तर शासनाच्या नवीन निधी अंतर्गत नमो उद्यान घोषणा करण्यात आलीय. या नमो उद्यानांतर्गत स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानासही एक कोटीचा निधी वर्ग करण्यात आलाय. मात्र हे उद्यान नमो उद्यान की सावरकर उद्यान? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
परळीतील सहदेव सातभाई यांच्यावर खुनाचा प्रयत्न आणि लूट झालेल्या प्रकरणात बीड पोलिसांनी रघु फड गॅंगवर मकोकांतर्गत कारवाई केली होती. या गॅंगचे वाल्मीक कराड समर्थकांशी संबंध असल्याचे उघड झाले होते. या टोळीत सात जणांचा समावेश असून त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. मात्र आता अपर पोलिस महासंचालकांनी सातपैकी पाच आरोपींवरील मकोका रद्द केला आहे. यात वाल्मीक कराडचा राईट हँड म्हणून ओळखला जाणारा गोट्या गितेचाही समावेश आहे. नंदागौळ (ता. परळी) येथील रहिवासी असलेल्या गोट्या गितेवर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी असे १० ते १५ गंभीर गुन्हे नोंद असून तो अद्याप फरार आहे. गोट्या गिते, जगन्नाथ फड, संदीप सोनवणे, बालाजी दहिफळे आणि विलास गिते या पाच जणांवरील मकोका रद्द झाला आहे. तर टोळीप्रमुख रघुनाथ फड आणि धनराज गिते या दोघांवरच मकोका कायम ठेवण्यात आला आहे. या निर्णयामुळे परळी परिसरात चर्चांना उधाण आले आहे
- बार्शी तालुक्यातील बेलगाव परिसरात वादळी वारा, गारपीटीसह मुसळधार पाऊसाची हजेरी
- मुसळधार पावसामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झालेय.
- त्याचबरोबर ताडसौंदणे गावात शिरले पावसाचे पाणी
- तर मांडेगाव येथील चांदणी नदीवरील पुलावरून जेसीबीच्या साह्याने नागरिकांची ये जा.
- बार्शी सोलापूर मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने वाहतुकीला अडथळा.
मराठवाड्यात यंदाच्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीने १ हजार ४१८ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मागच्या आठवडाभरापासून मराठवाड्यातल्या सगळ्याच भागात अतिवृष्टी ढगफुटी सारखा पाऊस झाल्यामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले. शिवाय शेत जमिनी वाहून गेल्या. अनेक घरांची पडझड झाली. या नुकसानीसाठी पन्नास टक्के म्हणजेच ६३० कोटींची मदत शासनाने १८ सप्टेंबरपर्यंत मंजूर केल्याचे सांगण्यात येत आहे. चार जिल्ह्यांतील ऑगस्ट महिन्यातील नुकसानीचे आकडे अद्याप स्पष्ट नाहीत. अद्याप सप्टेंबरमधील नुकसानीचा आकडा समोर आला नाही. सर्वाधिक नुकसान हे सप्टेंबर महिन्यात झाले आहे. शिवाय सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीचे पंचनाम्यानुसार किती मदत लागणार, हे स्पष्ट नाही. आतापर्यंत ५ हजार गावांतील १९ लाख शेतकरी बाधित झाले. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने शेतात जाता येत नाही, ई- पीक पाहणी सर्व्हर डाऊन असणे, शेतकऱ्यांच्या जमिनीचे लोकेशन चुकीचे दिसणे, खाते क्रमांक न जुळणे आदी अडचणींमुळे शेतकरी ई-पीक नोंदणी करु शकले नाहीत. शासनाकडे केलेली मागणी आणि मंजूर केलेल्या निधीत ५० टक्के फरक सध्या आहे. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यात प्रामुख्याने पीक नोंदणी, आधार-बँक खाते लिंक नसणे, पंचनामा प्रक्रियेतील विलंब, नैसर्गिक आपत्तीनंतर मदतीची प्रतीक्षा व निधी वितरणातील समस्या या प्रमुख अडचणी आहेत
कोल्हापुरात परवा रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे राजाराम बंधाऱ्यावर पाणी
यावर्षीच्या पावसाळ्यात सहाव्यांदा राजाराम बंधाऱ्यावर आलं पाणी
खबरदारीचा उपाय म्हणून राजाराम बंधाऱ्यावरील वाहतूक तात्पुरती बंद
कोपरखैरणे पोलिसांना गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार घनसोली रेल्वे स्टेशन परिसरात एम.डी. अंमली पदार्थ विक्रीसाठी दोन इसम येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सेंट्रल पार्कच्या विरुद्ध बाजूस सापळा रचून कारवाई करण्यात आली असून दोघांना अटक केली आहे.
या कारवाईदरम्यान निखील राजकुमार वागासे याच्या अंगझडतीतून ४४ लाख किमतीचा ११२.३८ ग्रॅम एम.डी. (मेफेड्रोन) पावडर जप्त करण्यात आला. तर त्याचा साथीदार मसुद अब्दुल सलाम खान याच्या अंगझडतीतून २८ लाख किमतीचा ६९.७४ ग्रॅम एम.डी. पावडर मिळाली.
- रात्रीच्या वेळी सिडकोच्या स्टेट बँक चौकात मद्यधुंद तरुणींचा गोंधळ
- तरुणींना हटकणाऱ्या एका व्यक्तीला तरुणींकडून मारहाण
- मद्यधुंद तरुणींकडून गोंधळ आणि गुंडगिरी
- अखेर मित्रांनी मैत्रिणीची अवस्था पाहून ठोकली धूम
आदिवासी तरुणाचा हत्तेच्या निषेधार्थ आज जिल्हा बंद...
तरुणाच्या हत्यने आदिवासी समाजात प्रचंड संताप...
मृत जयेश भील च्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षेची मागणी...
आज सकाळ पासूनच जिल्ह्यातील सर्व दुकाने बंद.....
जिल्हाभरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात...
मावळतील अतिशय महत्त्वाची ग्रामपंचायत म्हणून ओळखले जाणाऱ्या खडकाळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत अंजलीताई मुथा यांची एकमताने निवड करण्यात आली. या निवडणुकीत सरपंचासह एकूण १७ सदस्य उपस्थित होते.
ग्रामपंचायतीत उपसरपंच पद रिक्त झाल्यानंतर घेण्यात आलेल्या निवडणुकीत अंजलीताई मुथा यांच्या नावावर सर्व सदस्यांनी एकमताने विश्वास दाखवत निवड केली.
दोन दिवसांपूर्वी खासदार बजरंग सोनवणे यांनी लक्ष्मण हाके यांच्याबाबत बोलताना म्हटले होते की ते वारंवार बीड जिल्ह्यामध्ये येत आहेत त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये बीडमधून निवडणूक लढवायची आहे याला उत्तर देताना लक्ष्मण हक्क म्हणाले की बजरंग सोनवणे हे बावचळले आहेत भंजाळले आहेत. आठ दिवसांपूर्वी ते म्हटले गावच्या ग्रामपंचायतच्या सदस्य होयला सांगा आणि आज म्हणतायेत बीड जिल्ह्यामध्ये हे लोकसभा लढवायला येणार आहेत नक्की ठरव बाबा मी एका मेंढपाळाचा पोरगा आहे याच बीड जिल्ह्याने आणि याच बीड जिल्ह्यातील लोकांनी नेहमी मतदान देण्याची भूमिका बजावली आहे एका मेंढपाळाचे पूर्व जर निवडणुकीला उभा राहिलं तू कारखानदार तुझा मालक शरद चंद्र पवार तू जहागीरदार मेंढपाळाचे पोरग आहे बाबासाहेबांनी आम्हाला संविधानाचा अधिकार दिला आम्ही जर बीडमध्ये आलो तर तू काय करायचे ते ठरव.
-- बेझे धरणातून पाईपलाईनने आणणार पाणी
- त्र्यंबकेश्वरमधील अरुंद कुशावर्तातील गर्दी विकेंद्रित करण्यासाठी प्रशासनाचा प्रयत्न
- बेझे धरणातून पाईपलाईनने पाणी उचलून गौतमी, गोदावरी, गंगासागर, इंद्र आणि कुशावर्त कुंडात आणलं जाणार
- गोदावरी नदी बारमाही वाहण्यासाठी ३३० कोटींचा प्रकल्प
- त्र्यंबकेश्वरसह नाशिकमधील घाट देखील आकर्षक करण्याचा निर्णय
- नाशिक शहरात आज शनिवारी पाणीबाणी
- संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा आज राहणार बंद
- तर उद्या रविवारी देखील होणार कमी दाबाने पाणी पुरवठा
- शहरातील विविध जलकुंभ, जलशुद्धीकरणाच्या पाईपलाईन दुरुस्ती आणि तांत्रिक कामानिमित्त आज दिवसभर पाणीपुरवठा राहणार बंद
- नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचं पालिका प्रशासनाचं आवाहन
साताऱ्यातील सोमनाथ जाधव या शिक्षकाने एक खास शैक्षणिक ऍप्लिकेशन तयार केले आहे, ज्यामुळे पालकांना आपल्या मुलांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणे सोपे होणार आहे. या शैक्षणिक ॲपचा शाळा आणि पालकांना उपयोग होणार असून या ॲप चे अनावरण पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते पालकमंत्री कार्यालयात करण्यात आले..
पहिलीपासून ते अगदी कॉलेजमधील विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांसाठी हे ऍप्लिकेशन खूप उपयुक्त ठरणार असून. शाळा आणि महाविद्यालयांना या ऍपच्या मदतीने मुलांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवता येईल. महत्त्वाचे म्हणजे, मुलांमध्ये दिवसभर होणाऱ्या सर्व घडामोडींची माहिती आणि शैक्षणिक माहिती यामुळे पालकांना लगेच मिळणार असल्याची माहिती सोमनाथ जाधव यांनी दिलीये.
- प्रमाणपत्रांच्या बनावटगिरीला आळा बसणार
- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा सुरक्षितता आणि पारदर्शकपणासाठी निर्णय
- विद्यापीठातील विविध प्रमाणपत्रे आणि श्रेयांकपत्रकांची छपाई इंडियन सिक्युरिटी प्रेसमध्ये होणार
- पूर्वीच्या प्रमाणपत्रांमध्ये केवळ ६ सुरक्षा मानके, आता वाढून ती १६ सुरक्षा मानकांपर्यंत जाणार
- या निर्णयामुळे प्रमाणपत्रांची विश्वासार्हता आणखी मजबूत होणार
एक दिवसाच्या उघडीप नंतर पुन्हा एकदा हिंगोली जिल्ह्याला परतीच्या पावसाने झोडपले आहे, हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील आजेगाव ,सिंधगी, सेनगाव सह हिंगोलीत मुसळधार पाऊस कोसळला आहे,या पावसाने शेतकऱ्यांच्या शेतात प्रचंड पाणी जमा झाले असल्याने पुन्हा एकदा पिके पाण्याखाली गेली आहेत.
पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात यकृत प्रत्यारोपण करत असताना दाम्पत्याचा मृत्यू प्रकरण
त्या प्रकरणी राज्य सरकारने नेमली चौकशी समिती
मात्र त्या समितीचा अहवाल अजूनही आरोग्य विभागाला दिला नाही
या प्रकरणात सह्याद्री रुग्णालयाला क्लीनचिट देणार की ठपका ठेवणार हे पाहावे लागेल
१५ ऑगस्टला बापू कोमकर यांना यकृत दान करणारी पत्नी आणि बापू या दोघांचाही मृत्यू झाला
या प्रकरणात रुग्णालयावर आरोप करण्यात आला आहे यासाठी राज्य सरकारने चौकशी समिती नेमली आहे.
नातेवाईकांनी केली होती कारवाईची मागणी
हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील केंद्रा खुर्द गावात जिल्हा परिषदेच्या शाळेच्या शिक्षकाची बदली झाल्याने विद्यार्थ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला आहे, सर तुम्ही आमच्या शाळेतून जाऊ नका असे म्हणत विद्यार्थ्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली, गेल्या पाच वर्षापासून या जिल्हा परिषदेच्या शाळेत गणेश उजाडे हे शिक्षक विद्यार्थ्यांना नियमित अध्यापनाचे धडे द्यायचे, त्यासोबतच अनेक विद्यार्थ्यांना स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळत मायेचा ओलावा द्यायचे मात्र प्रशासकीय कारणास्तव आता त्यांची बदली दुसऱ्या शाळेत झाल्याने त्यांनी या शाळेचा निरोप घेतला यावेळी शिक्षक गणेश उजाडे यांना देखील अश्रू अनावर झाले होते.
धाराशिव च्या उमरगा तालुक्यात गेली दोन दिवसात झालेल्या पावसाने नाईचाकूर परिसरातील अनेक शेतकऱ्यांचा तोडणीस आलेले ऊस आडवा झाला आहे.वर्षभर काबाडकष्ट करून उसाचे पीक शेतकऱ्यांनी कसेबसे जगवले होते.पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचा ऊस जमीनदोस्त होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकातील तूर,सोयाबीन,या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांना तात्काळ पंचनामे होऊन आर्थिक मदत मिळावी अशी मागणी केली जात आहे.
धाराशिव च्या परंडा तालुक्यातील सीना कोळेगाव प्रकल्पाच्या पानलोट क्षेत्रात दररोज कमी अधिक प्रमाणात दमदार पाऊस पडत असल्याने सिना कोळेगाव प्रकल्पाच्या 13 दरवाजातून 21 हजार 700 क्युसेकने सिना नदीपाञात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.परंडा तालुक्यातील पाच टिएमसी क्षमता असलेल्या सीना कोळेगाव प्रकल्पासह खासापुरी चांदणी साकत मध्यम प्रकल्प व निम्म खैरी मागील महिन्यात ओव्हरफ्लो झाले आहेत.तर सिना कोळेगाव प्रकल्पात येणाऱ्या पाण्याची आवक पाहून विसर्ग कमी अधिक केला जात आहे.
रस्त्यातील अडथळे,अतिक्रमण दूर करा, नोव्हेंबर अखेरपर्यंत खड्डे मुक्त करा असे आदेश महापालिका आयुक्त यांनी प्रशासनाला दिले. पण त्याचवेळी दुसरीकडे पोलिसांतर्फे शहरातील तब्बल ५५० किलोमीटरचे रस्ते सीसीटीव्हीची केबल टाकण्यासाठी खोदण्यात येणार आहे. याची सुरुवात नवी पेठेतील राजेंद्रनगरमधून झाली आहे. त्यामुळे पुणे खड्डे मुक्त कसे होणार? असा प्रश्न उपस्थित झाला असून, महापालिकाही संभ्रमित झाली आहे.
अकोल्यात 'किसान ब्रिगेड'च्या वतीने 'शेतकरी लूट वापसी संवाद सभा' पार पडलीय. ही सभा गाजलीय ती 'प्रहार'चे नेते बच्चू कडू आणि शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या वादग्रस्त विधानांनी... या सभेसाठी देश आणि राज्यातील शेतकरी नेते अकोल्यात आले होतेय. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत, बच्चू कडू, रविकांत तूपकर, प्रकाश पोहरे, अजित नवले, विश्वास उटगी आदी नेते या सभेला उपस्थित होतेय.
या सभेत बोलताना 'प्रहार'चे नेते बच्चू कडू यांनी त्यांच्या नुकत्याच झालेल्या जळगाव येथील आंदोलनानंतर दाखल झालेल्या गुन्ह्यांचा उल्लेख केलाय. जळगावातील आंदोलनात आम्ही फक्त जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट तोडलंंय. यानंतर राज्यात होणाऱ्या आंदोलनात आम्ही आता थेट कलेक्टरलाच तोडू, असा वादग्रस्त इशारा बच्चू कडू यांनी दिलाय.
उद्धव ठाकरे यांचा ४ ऑक्टोबर रोजी पुणे दौरा
शिवसैनिकांना उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन
आगामी महापालिका निवडणुकीची पायभरणीला होणार सुरुवात
स्थानिक स्वराज्य निवडणुकीची तयारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन, पक्ष संघटना मजबूत करणे याविषयी उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन
एक दिवसीय मार्गदर्शनाला पुणे शहरातील सर्व पदाधिकारी, शिवसैनिक राहणार उपस्थितीत
बालगंधर्व रंग मंदिर या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन होण्याची शक्यता
Rain Alert: आज (ता. २०) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
अहिल्यानगर : अनेकदा राज्य आणि देश पातळीवरील विविध विषयांवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करणारे आमदार रोहित पवार आज त्यांच्या मतदारसंघात अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापलेले दिसले. जामखेडमध्ये आमसभा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये नागरिकांनी नगरपालिकेच्या कामाबद्दल सर्वाधिक तक्रारी केल्या. यावर अधिकारी मोघम उत्तरे देत असल्याचे पाहून आमदार पवार संतापले. "आतापर्यंत गोट्या खेळत होतात का?" अशा शब्दात अधिकाऱ्यांना फटकारले.
नगरपरिषद संदर्भात जामखेड शहरातील नागरिकांनी सर्वात जास्त तक्रारी आमसभेत आमदार रोहित पवार यांच्यासमोर मांडल्या... नगरपरिषद सीईओ यांच्यावर नागरिकांनी कामात केलेली अफरातफर, शहरातील कचरा उचलण्यासाठी देण्यात आलेले कंत्राट... कचरा उचलण्यात होणारी टाळाटाळ, शहरातील चिखलमय रस्ते, गटारी, सांडपाण्याची विल्हेवाट, मोकाट जनावरे, मोकाट कुत्रे, तुंबलेल्या गटारी, अनियमित सुटलेले पाणी, मच्छरांचा होणारा उपद्रव आदी विषयावर आमदार रोहित पवार यांनी नागरिकांच्या प्रश्नावर अधिकाऱ्यांना धारेवर धरलं...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.