मुंबईच्या चारकोपमध्ये गॅस सिलेंडर चोरीची धक्कादायक घटना घडली. तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.
वांद्रे - वरळी सी लिंकच्या वांद्रे एक्झिट टोल नाक्यावर वादातून कारचालकाला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना काल रात्री सुमारे ११.५० वाजण्याच्या सुमारास घडली. टोल कर्मचाऱ्यांशी झालेल्या वादानंतर कारचालकाला कथितपणे मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे टोल नाक्यावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. सुमारे दहा मिनिटांनंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. या प्रकरणातील अधिक तपशील अद्याप समोर आलेले नाहीत.
निवासी शिक्षण केंद्रासाठी महापालिकेने मंजूर केले १ कोटी ७९ लाखांचा निधी
स्थायी समितीच्या बैठकीत हा ठराव मंजूर करण्यात आला आहे
बाणेर येथे मागासवर्गीय आदिवासी विद्यार्थीनीसाठी निवासी शिक्षण केंद्र उभारण्यासाठी हा निधी मंजूर करण्यात आळ आहे
या कामासाठी जवळपास २ कोटी १६ लाख रुपये खर्च होणार आहे
मुंबई उच्च न्यायालयाची पुणे महापालिकेला नोटीस देण्यात आलीये
पदपथावर लागलेल्या वाहनांवर वाहतूक पोलीस दंड आकारतात मात्र महापालिकेचा पण दंड आकारला जातो
याला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली होती
चार आठवड्यात प्रतिज्ञापत्राद्वारे बाजू मांडण्याच्या सूचना यावेळी मुंबई हाय कोर्टाने दिल्या आहेत
विजय सागर यांनी या संदर्भात याचिका दाखल केली आहे
पुण्यातील होटल असोसिएशनची पुण्याच्या जिलाधिकाऱ्यांकडे मागणी
गॅस पुरवठाबाबत स्पष्टता द्या
अनेक हॉटेल्स सध्या बंद आहेत तर काही बंद होण्याच्या मार्गावर आहेत
गॅस नसल्याने हॉटेल व्यवसायावर परिणाम
पाईपलाईन द्वारे गॅस जोडणी करण्याच्या प्रशासनाच्या सूचना
सावंतवाडी बाजारपेठेत या हंगामातील हापूस व पायरी आंबा दाखल झाला आहे. आंब्याचे दर मात्र अक्षरशः गगनाला भिडले आहेत. हापूस आंब्याचे दर तब्बल सोळाशे ते अडीच हजार रुपये डझन इतके झाले आहेत. तर काही ठिकाणी हापूस अडीच हजारांपासून थेट साडेतीन हजार रुपयांपर्यंत विकला जात असल्याचे चित्र आहे. पायरी आंब्याचे दर देखील कमी नाहीत. पायरी आंबा ९०० ते १६०० रुपये डझनाने विक्री होत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांसाठी आंबा खरेदी करणे मुश्किल बनले आहे. यंदा आंब्याचे उत्पादन केवळ आठ ते दहा टक्क्यांपर्यंतच मर्यादित राहिल्याने बाजारात आवक कमी आणि मागणी जास्त असे समीकरण निर्माण झाले आहे. परिणामी दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. एकीकडे आंबा बाजारात दाखल झाला असला, तरी वाढलेल्या किमतींमुळे ‘आंबा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर’ गेल्याचे दिसून येत आहे. आंबा खरेदीसाठी खास कोकणात आलेल्या पर्यटकांना आंब्याचे दर ऐकून आंबा खरेदी कसा करायचा असा प्रश्न पडला आहे. हंगाम पुढे सरकत असताना दर कमी होणार का? याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.
कराड तालुक्यातील टेंभू उपसा सिंचन योजनेच्या पहिल्या टप्प्यात मोठी पाण्याची गळती
कृष्णा नदीवर आधारित आणि आशियातील सर्वात मोठ्या उपसा जलसिंचन प्रकल्पांपैकी एक असलेल्या टेंभू योजनेच्या पहिल्या टप्प्यातील पाईपलाईनमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे.
पाईपलाईनमधील एअर वॉल्वचे झाकण प्रेशरमुळे उडून गेल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे.
घटनास्थळी २० ते ३० फूट उंच पाण्याचे फवारे उडताना दिसत आहेत, ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
स्थानिक कोरेगाव आणि टेंभूच्या नागरिकांनी या घटनेती माहिती तात्काळ प्रशासनाला दिली असून आता या प्रवाहाची मोटार बंद करण्यात आली आहे. मात्र, या घटनेचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पापरी परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळीचा तडाखा...
द्राक्ष बागा,बेदाणे,पेरू,आंबा,मका ज्वारी पिकांचे मोठे नुकसान
वादळी वाऱ्यासह झालेल्या तुफान गारपीटमुळे 7 एकरावरील काढणीला आलेली द्राक्ष बागा उध्वस्त
शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान, शेतकरी राजा हवालदिल
अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे तयार झालेले द्राक्षांचे घड मातीमोल
म्हाडा घोटाळा प्रकरणी ४५ बड्या बिल्डरांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
नाशिक जिल्हा न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय, ४५ बड्या व्यावसायिकांवर अटकेची टांगती तलवार
संशयितांची आता उच्च न्यायालयात धाव घेण्याची तयारी
म्हाडाला आर्थिक दुर्बल घटकांचा कोटा टाळण्यासाठी नकाशे आणि कागदपत्रांमध्ये छेडछाड तसच फेरफार करून कोट्यावधींची फसवणूक
म्हाडाची फसवणूक केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल आहे गुन्हा
संशयितांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर पोलिसांच्या कारवाईला वेग
रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दुरुस्तीच्या कामासाठी बंद
पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी काढली अधिसुचना
पुणे जिल्हा हद्दीतील हिरडोशी परिसरात रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करण्यात भोर घाट मार्ग बंद ठेवण्याचे आदेश
25 मार्च ते 30 एप्रिल दरम्यान वरंध घाट रस्ता बंद रहाणार
नागरीक, प्रवासी आणि पर्यटकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सुचना
सांगलीच्या गोंधळेवाडी येथून पंढरपूरसाठी निघालेल्या चैत्रवारी दरम्यान मेंढरांचा रिंगण सोहळा पार पडला आहे. पंढरपुरकडे मार्गस्थ होताना श्री संत बाळूमामांच्या मेंढरांनी श्री संत बागडेबाबांच्या पालखीभोवती रिंगण घातले.टाळ-मृदुंगाचा निनाद,विठ्ठल नामस्मरणाचा गजर यामुळे हा मेंढरांचा रिंगण डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला.ह.भ.प.तुकाराम बाबा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ही चैत्रवारी पायी दिंडी पंढपुरकडे निघाली आहे. सागवानी आकर्षक रथात पालखी सह शेकडो विठ्ठल भक्त या चैत्रवारीत सहभागी झाले आहेत. बाळूमामांच्या मेंढरांच्या रिंगण सोहळ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होतं.
मोहोळ तालुक्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं नुकसान झालं आहे.येवती-पापरी आणि पेनूर परिसरात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचा नुकसानीची पाहणी करण्यासाठी शिवसेना राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. "सरकार आणि लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहेत" असा शब्द देत त्यांनी हतबल झालेल्या बळीराजाला धीर दिला आहे. द्राक्ष बागा, केळी, आणि इतर नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.अनेक शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडताना खासदारांसमोर अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
वाशिम जिल्ह्यातील लघु पाटबंधारे विभागाअंतर्गत येत असलेल्या ७५ लघु प्रकल्पात केवळ 27.8 टक्के इतकाच जलसाठा शिल्लक राहिल्याने वाशिम जिल्ह्यात येणाऱ्या दिवसात पाणी टंचाईच संकट अधिक गडद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वाशिम जिल्ह्यात गत पावसाळ्यात दमदार पाऊस पडला असतानाही मार्च महिनाही अजून संपला नसताना अनेक प्रकल्प तळ गाठण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पाणी टंचाईची शक्यता निर्माण होऊन ग्रामीण भागात जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा समर शेड्युल जाहीर..
समर शेड्युलअंतर्गत फ्लाइट्सची संख्या आणि कनेक्टिव्हिटी वाढविण्यात आली आहे..
सदरील शेड्युल 26 मार्च ते 24 ऑक्टोबर पर्यंत असणार, या बदलामुळे प्रवाश्यांना अधिक
उन्हाळ्यात दुपारच्या फ्लाईट कमी करून बहुतेक उड्डाणे सकाळी ठेवण्यात येणार, तर काही फ्लाइट्सची वेळ सायंकाळी आणि रात्री करण्यात आली आहे..
या बदलामुळे उन्हाळ्यात हवाईमार्गे पर्यटनास फ्लाइट्सचे पर्याय आणि सुधारित कनेक्टिवीटी मिळणार..
अशोक खरात विरोधात शुक्रवारी रात्री उशिरा दोन गुन्हे दाखल
एका महिलेची लैंगिक शोषणाची तर एका इसमाची फसवणूक केल्याप्रकरणी अशोक खरात विरोधात गुन्हा दाखल
नेवासा येथील व्यावसायिकाला व्यवसायिक बरकतीसाठी वेगवेगळ्या अंगठ्या लाखो रुपयांना विकून फसवणूक केल्याप्रकरणी खरात विरोधात गुन्हा
तर एक विवाहित महिलेचा तिच्या पतीसोबत वाद होत असल्याने त्यावर सल्ला घेण्यासाठी गेली असता तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची महिलेची तक्रार
अशोक खरात विरोधात आत्तापर्यंत एकूण 10 गुन्हे नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल
2 आर्थिक गुन्हे फसवणुकीचे तर 8 गुन्हे लैंगिक शोषणाचे
लैंगिक शोषणाचे एकच मोडस वापरल्याच समोर
नागपुरात शुक्रवारी 40.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, शुक्रवार ठरला या मोसमातील सर्वाधिक उष्ण दिवस
तर 41.2 अंशासह अमरावती विदर्भातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले
एकीकडे पावसाचा अलर्ट असताना नागपूरकरांना उन्हाच्या झळा सहन करावा लागल्या
विदर्भाच्या सात जिल्ह्यात शुक्रवारी दिवसाचे तापमान 40 अंशांवर गेले
यात अमरावती, अकोला, वर्धा, चंद्रपूर, नागपूर आणि वाशिम जिल्ह्याचा समावेश आहे
पुढील सहा ते सात दिवस कडक उन्हासह पाऊस आणि वादळी वारा वाहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे
नागपुरात बनावट नोटांच्या काळाबाजार प्रकरणात शिक्षा, दोघांना सात वर्षांची सक्तमजुरी
जिल्हा व सत्र न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल प्रत्येकी ५० हजार रुपयांचा दंडही ठोठावला
दंड न भरल्यास सहा महिन्यांची अतिरिक्त शिक्षा सुनावली
जमरूल उर्फ मणिरूल हुसेन आणि अजीम शेख अशी दोषींचे नाव...
तहसील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल गस्ती दरम्यान पोलिसांनी दोघांना पकडले
५०० रुपयांच्या २४३ बनावट नोटा जप्त झडतीत मोठा साठा उघड
अनेक नोटांवर एकच क्रमांक आढळला पंचनामा करून गुन्हा नोंदवला होता...
यामध्ये नाशिक चलनी मुद्रणालयाकडून तपासणी अहवालात सर्व नोटा बनावट असल्याचे स्पष्ट
रिझर्व्ह बँकेकडूनही बनावट असल्याची पुष्टी न्यायालयात ठोस पुरावे सादर
९ साक्षीदारांची साक्ष, पंचनामा आणि अहवाल निर्णायक, पुराव्यांच्या आधारे गुन्हा सिद्ध
भारती विद्यापीठ परिसरातील एका हॉटेलमध्ये गॅस गळतीमुळे अचानक भडका उडाल्याची घटना घडली.
या दुर्घटनेत चार जण किरकोळ जखमी झाले असून हॉटेलचे किरकोळ नुकसान झाले आहे.
हे हॉटेल सकाळी व संध्याकाळी सुरू असते. सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास कामगारांनी हॉटेल उघडले असता गॅसचा तीव्र वास येत होता.तसेच गॅस प्रेशरचा आवाजही ऐकू येत होता.
परिस्थिती लक्षात घेऊन कामगारांनी तात्काळ लाईट बंद केली. मात्र काही क्षणांतच गॅसचा भडका उडून आग लागली.घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताने संतुलित आणि प्रभावी धोरण राबवले असून, यामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारची महत्त्वाची भूमिका आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार या संकटकाळात महाराष्ट्रात पीएनजी (पाईप्ड पद्धतीने वितरण) वितरणाला गती देण्यात येत असून खतांच्या उपलब्धतेसाठी सातत्याने आढावा घेतला जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.