Maharashtra Live News Update Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update : वीज कर्मचाऱ्यांचा ७२ तासांसाठी राज्यव्यापी संपावर जाण्याचा निर्णय

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज सोमवार, दिनांक ०६ ऑक्टोबर २०२५, महाराष्ट्रावर शक्ती चक्रवादळाचं संकट, कोकण मराठवाड्यात पावसाची शक्यता, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

कार नदीत कोसळली

दोडामार्ग बेळगाव कोल्हापूर मार्गावर कार नदीत कोसळली. दोडामार्ग कलमठाणा येथे अचानक समोर आलेल्या मोटार सायकल चालकाला वाचवण्याच्या प्रयत्नात कार थेट बारा फुट खोल नदी पाञात कोसळली. या अपघातात चालक राहुल गंवडळकर किरकोळ जखमी झाला. मात्र कारचे नुकसान झाले आहे. सध्या ही कार नदीतून बाहेर काढण्यात आली आहे तर जखमी वाहन चालकाला नजीकच्या आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले.

कोल्हापूरमध्ये आवाज वाढव म्हणणाऱ्या 54 जणांवर गुन्हा

नवरात्र उत्सवात कोल्हापूर शहरातील सर्वच भागांमध्ये सार्वजनिक मंडळांनी दुर्गादेवीची प्रतिष्ठापना केली होती. तर शनिवारी त्यांनी विसर्जन मिरवणूक काढली. या मिरवणुकीमध्ये कर्णकर्कश आवाज ध्वनी यंत्रणा लावण्यात आली होती. नियमाप्रमाणे रात्री दहा वाजल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी ध्वनी यंत्रणा बंद करावी लागते. मात्र काही मंडळांनी या नियमांना हरताळ फासला. ध्वनी यंत्रणा आणि विद्युत रोषणाईसाठी लावले जाणारे स्ट्रक्चर किती आकाराचे असावे याचेही नियम पोलिसांनी घालून दिले होते. तेही काही मंडळांनी पाळले नाहीत. त्यामुळे शनिवारी रात्री पोलिसांनी कारवाई करून 17 मंडळांच्या ध्वनी यंत्रणेतील मिक्सर जप्त करून कारवाई केली होती. आज पोलिसांनी आणखी 18 मंडळांवर गुन्हे दाखल केलेत. यातील नऊ मंडळांवर ध्वनी मर्यादेच्या उल्लंघनाची तर 9 मंडळांवर नियमबाह्य स्ट्रक्चर उभे केले म्हणून गुन्हे दाखल केले आहेत.

नाशिक महापालिकेची अंतिम प्रभाग रचना आज जाहीर होणार

- मागील महिन्यात प्रारूप प्रभाग रचना आराखड्याच्या सूचना आणि हरकतींवर झालेल्या सुनावणीनंतर आज अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार

- कोणत्या प्रभागात काय बदल होतो, याकडे इच्छुकांसह राजकीय पक्षांचं लक्ष

- नाशिक महापालिकेसाठी ३१ प्रभागात १२२ वॉर्ड

- अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांच्या पॅनेल निर्मितीला येणार वेग

परभणी शहर जिल्ह्यात पावसाचा पुन्हा एकदा हाहाकार

परभणी जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचा हा कार बघायला मिळालाय पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील शहरातील रस्त्यांसह ग्रामीण भागातील शेत शिवारही पाण्याखाली गेली आहेत शहरातील अष्टभुजा देवी मंदिर परिसर गांधी पार्क अक्षदा मंगल कार्यालय परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणीच पाणी झाले असून अनेक घरांमध्येही पाणी गेले आहे त्यामुळे नागरिकांना अक्षदा मंगल कार्यालयामध्ये शिफ्ट करण्यात आले आहे.

नवरात्रोत्सवात अंबाबाई मंदिरात 57 लाखाहून अधिक उलाढाल

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवात भाविकांनी भरभरून दान केले. उत्सव काळात भाविकांच्या वाढलेल्या गर्दीमुळे मंदिर समितीच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली असून 11 दिवसांच्या काळात मंदिराच्या तिजोरीत 57 लाख 19 हजार 442 रुपये इतकी उलाढाल झाली आहे. तसेच धार्मिक विधी, पूजा, अन्नदानासाठी देखील भाविकांनी भरभरून देणगी दिली आहे.

विविध मागण्यांसाठी ग्रामरोजगार सेवकांचे एक दिवसीय काम बंद, जोरदार निदर्शने...

राज्यभरातील ग्राम रोजगार सेवकांच्या मानधन आणि प्रवासभत्ता वाढी संदर्भात महायुती सरकारने 3 ऑक्टोबर 2024 रोजी शासकीय अध्यादेश काढून रोजगार सेवकांचे मानधन सहा हजारावरून आठ हजार रुपये आणि दोन हजार रुपये प्रवास व अल्पोहार भत्ता देण्याचे घोषित केले होते, मात्र या अध्यादेशाचा सरकारला विसर पडलाय, उलट गेल्या मार्च महिन्यापासून रोजगार सेवकांचे मानधन देखील अदा करण्यात आले नाही, त्यामुळे या संपूर्ण रोजगार सेवकांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.. परिणाम रोजगार सेवकांनी बुलढाण्याच्या खामगाव पंचायत समिती कार्यालयासमोर एक दिवसीय काम बंद आंदोलन करत जोरदार निदर्शने केली.. मानधन आणि भत्ता वाढी संदर्भात काढलेल्या अध्यादेशाची तात्काळ अंमलबजावणी करावी अन्यथा येत्या काळात तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा रोजगार सेवक संघटनेच्या माध्यमातून देण्यात आला आहे...

ओंकार हत्तीला पकडण्यासाठी वनताराची टीम दोडामार्ग मध्ये दाखल

ओंकार हत्तीने दोडामार्ग व सावंतवाडीच्या काही भागात अक्षरशः धुडगूस घातला आहे. भर वस्तीत हत्ती येत असल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भात शेती, केळी बागायतीचे अतोनात नुकसान या हत्तीकडून सुरू आहे. यापूर्वी या हत्तीने दोडामार्ग मधील एका शेतकऱ्याचा बळी सुद्धा घेतला होता. या ओंकार हत्तीला पकडण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती. त्या पाश्र्वभूमीवर वनताराची टीम दोडामार्ग मध्ये दाखल झाली आहे. सध्या या टीमकडून वनविभाग व ग्रामस्थांकडून माहीती घेण्यात येत असून हत्ती पकड मोहीम राबविण्या संदर्भात चर्चा केली जात आहे.

गणेश शिंदे यांना झोपडपट्टी महासंघाच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदाची जबाबदारी

गेल्या महिन्याभरापासून नाराज असलेले आणि दिंडोशी-गोरेगाव विभागप्रमुख म्हणून कार्यरत असलेले गणेश शिंदे यांना अखेर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची महाराष्ट्र झोपडपट्टी महासंघाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. येणाऱ्या मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती अत्यंत महत्वाची मानली जात आहे. नाराज पदाधिकाऱ्यांना पुन्हा संघटनात सक्रिय करण्याच्या दृष्टीने ही बोलवण ठरली आहे, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.या प्रसंगी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी गणेश शिंदे यांना मार्गदर्शन करताना म्हटले की, “बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी कंबर कसून कामाला लागले पाहिजे.”

शिंदे गटात नवचैतन्य निर्माण करण्याच्या दिशेने ही नियुक्ती एक महत्वाचे पाऊल मानले जात आहे.

दिवठाणा नदीत उडी घेऊन युवकाची आत्महत्या...

बेरोजगारीमुळे खामगाव शहराच्या शिवाजीनगर मधील राहणाऱ्या एका 31 वर्षीय तरुणाने देवठाणा नदीपात्रामध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली..... आकाश उमेश दळवी व 31 वर्षे असे मृतक तरुणाचे नाव असून बेरोजगारीमुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती मृतकाच्या मामे भावाने दिली...आकाश हा सतत चिंताग्रस्त होता, शिक्षित असलेला आकाश नेहमीच नोकरीच्या शोधात होता मात्र कुठेही जॉब मिळत नसल्याने त्ताचे टोकाचे पाऊल उचलीत आत्महत्या केल्याचे सांगण्यात आलेय.. याप्रकरणी मृतकाचा मामे भाऊ अक्षय गलांडे यांनी खामगाव शहर पोलिसात तक्रार दाखल केली असून या अधिक तपास हिवरखेड पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक कैलास चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन आहेर हे करीत आहेत...

मनसे नेते बाळा नांदगावकर लातूरमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर,, नुकसानग्रस्त शेती पिकांची केली पाहणी

मनसेचे नेते बाळा नांदगावकर हे लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते, लातूर जिल्ह्यातील अतिवृष्टीने शेती पिकांचे प्रचंड मोठ नुकसान झाल यात शेतकऱ्यांचं प्रचंड मोठे नुकसान झाल आहे ,जिल्ह्यातल्या मुरुड परिसरात मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या सोयाबीन पिकांची त्यांनी पाहणी केली. यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्याला 25 हजार रुपयांचे आर्थिक मदत देखील करण्यात आली आहे , सरकारने तीस हजार रुपये प्रति कर नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांना मदत करावी, राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कर्जमाफी करून कोरा करावा अशी देखील मागणी ते सरकारकडे करणार सांगितल..

अतिवृष्टीने केळी बाग झाली आडवी, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पुन्हा आश्रू

धाराशिव जिल्ह्यातील भूम परंडा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे विश्वरूपा नदीला आलेल्या महापुरामुळे भांडगाव येथील प्रगत शेतकऱ्यांची केळीच्या बाग अक्षरशः उद्ध्वस्त झाली असून,शेतकऱ्यांच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल आहे.जिल्ह्यात झालेल्या धुवाधार पावसामुळे वादळी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. भांडगाव मधील विजय चाबुकस्वार गुरव या शेतकऱ्याची आठ लाख रुपये खर्चून लावलेली केळीची भाग अक्षरश: भोई सपाट झाली.विश्वरूपा नदी दोन वेळा पात्रा बाहेर गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या केळी आणि बागा पूर्णपणे उध्वस्त झाल्या.आगामी सणासुदीत या पिकावरून उत्पन्न मिळण्याची अपेक्षा होती, परंतु आता शेतकरी डोळ्यांदेखत त्यांची मेहनत पाण्यात बुडाली आहे .

आज आदिवासी समाजाचा नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार उलगुलान आरक्षण बचाव महामोर्चा

हैदराबाद गॅजेट नुसार बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करा अशी मागणी बंजारा समाजाने लावून धरली आहे.एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी बंजारा समाज मोठ्या प्रमाणात मोर्चे देखील काढत आहे.बंजारा समाजाच्या मागणीला आदिवासी समाज देखील आता मोर्चे काढून प्रखरपणे विरोध करीत आहे. बंजारा समाजाच्या मागणीच्या विरोधात आज नांदेडमध्ये आदिवासी समाजाचा उलगुलान आरक्षण बचाव महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी 11 वाजता नांदेड शहरातील नवीन मोंढा बाजार समितीच्या मैदानातून हा मोर्चा निघणार आहे. नवीन मोंढा, अण्णाभाऊ साठे चौक, चिखलवाडी कॉर्नर मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.बंजारा समाजाने काढलेल्या मोर्चा पेक्षा दीडपट मोठा मोर्चा आमचा असेल असा दावा आमदार भीमराव केराम यांनी केला आहे.

26 ऑक्टोबर पासून विठुरायाचे 24 तास दर्शन सुरू राहणार

कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने 26 ऑक्टोबर पासून विठ्ठल रुक्मिणीचे 24 तास दर्शन सुरू राहणार आहे. येत्या दोन नोव्हेंबर रोजी कार्तिक यात्रेचा महासोळा संपन्न होणार आहे. या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे, परंतु कार्तिकीच्या महापूजेला दोन्ही पैकी कोणत्या उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण द्यायचं हे मात्र अद्याप ठरवण्यात आले नाही विधी व न्याय खात्याचा सल्ल्यानुसार दोन्हीपैकी एका उपमुख्यमंत्र्यांना महापूजेचे निमंत्रण दिले जाणार आहे. यासंदर्भात काल विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक पंढरपूर आज संपन्न झाली यावेळी गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी बैठकीत याबाबत माहिती दिली. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. आचारसंहिता लागू झाली तर मात्र उपमुख्यमंत्र्यांऐवजी विभागीय आयुक्त किंवा जिल्हाधिकारी यांना कार्तिकीच्या शासकीय महापूजेचा मान मिळण्याची शक्यता आहे.

लातूरमध्ये वाहतूक पोलिसांकडून ऑटो चालकाला बेदम मारहाण

लातूर शहरातल्या बार्शी रोड परिसरात एका ऑटो चालकाला वाहतूक पोलिसांनी लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली आहे. दरम्यान यावेळी या मारहाणीचा व्हिडिओ करणाऱ्या दुसऱ्या एका विद्यार्थ्याला तीन ते चार वाहतूक पोलिसांनी पुन्हा मारले आहे. तर विद्यार्थ्याला मारहाण केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. त्यामुळे सामूहिक मारहाण करणाऱ्या या पोलिसांवर कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

नांदेडमध्ये मध्यरात्रीपासून जोरदार पावसाची हजेरी

नांदेडमध्ये मध्यरात्रीपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने झोडपल्यामुळे शहरातील अनेक सखल भागांतील रस्त्यांवर पाणी साचले आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या चिंतेत पुन्हा भर पडली आहे. आज नांदेड जिल्ह्यासाठी हवामान खात्याने 'येलो अलर्ट' जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवर दुहेरी संकट; उतारा घटला आणि बाजारात दरही पडले.

अतिवृष्टीने शेतकऱ्यांच प्रचंड मोठ नुकसान झाल आहे, यातच खरीप हंगामातील उरलीसुरली पिक शेतकऱ्यांनी आता काढायला सुरुवात केली आहे, दरम्यान नवीन काढलेले सोयाबीन हे लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती दाखल झाल आहे,मात्र बाजारात दर पडल्याने हमीभावापेक्षा 1 हजार रुपये कमी भाव मिळत आहे. त्यामुळे काढणीचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी पुन्हा हतबल झाला आहे. जिल्ह्यात साधारणता चार लाख हेक्टर वरती सोयाबीनचा पेरा केला जातो मात्र यंदा अतिवृष्टीने शेतकऱ्यांच मोठ नुकसान झाल आहे, त्यात बाजारात भाव पडल्याने शेतकऱ्यांना पुन्हा आर्थिक फटका बसला आहे

शेतकरी कर्ज वसुलीवरून मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा बँकांना इशारा

महापुरात शेतकरी उध्वस्त झालाय. खरिपाची पिकं हातची गेली आहेत. समोर रब्बीची पेरणी कशी करावी हा प्रश्न आहे. शेतकऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून खत बी बियाण्यांचं वाटप करण्यात आले. धाराशिवच्या भूम भागात मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना खत आणि बियाणे वाटप करण्यात आलं. यावेळी शेतकरी कर्ज वसुलीवरून बाळा नांदगावकर यांनी बँकांना इशारा दिला. शेतकरी संकटात आहे हात जोडून विनंती आहे की शेतकऱ्यांना त्रास देऊ नका. आम्ही पाया पडून हात जोडून न्याय मागतो नाहीतर हात सोडून न्याय मागू असा इशारा नांदगावकर यांनी दिला.

मोरवड लखमापूर तलाव 100% भरला,ग्रामस्थांमध्ये आनंदाच वातावरण...महिलांनी केले जलपूजन

लातूर जिल्ह्यातल्या रेनापुर तालुक्यात असणाऱ्या मोरवड आणि लखमापूर या दोन्ही गावांची तहान भागवणारे तलाव शंभर टक्के भरल्याने. मोरवड येथील महिला ग्रामस्थांनी या तलावाचं जलपूजन केल आहे , शेतीच्या सिंचनासह, दोन्ही गावांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे

Pune : दोन दिवस पुणे पोलिसांची निलेश घायवळाच्या पुण्यातील घरांवर छापेमारी

छापीमारीमध्ये घायवळच्या कोथरूडमधील घरात सापडल्या बंदुकीच्या गोळ्या.

त्याचबरोबर सातबारे, साठेखत आणि विविध जमिनींची संदर्भात कागदपत्र सापडली

याशिवाय मराठवाड्यातील पवनचक्की प्रकल्पासंदर्भातील फाइल्स पोलिसांनी केल्या जप्त

याशिवाय पुणे पोलिसांचे महानगरपालिकेला पत्र.. निलेश घायवळच्या नावावर अनधिकृत बांधकामे तसेच मालमत्ताची चौकशी होणार... पुणे महानगरपालिका अनधिकृत मालमत्तेवर कारवाई करण्याच्या तयारीत

पुणे महापालिकेचे पथक घायवळच्या अनधिकृत मालमत्ता तसेच थकीत कर असलेल्या मालमत्ता सिझ करणार

पुणे पोलिसांनी निलेश घायवळभोवती फार्स आवळला

पुणे जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात चांगला पाऊस

यंदाचा पावसाळी हिंदू मत पुणे जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये चांगला पाऊस झाला विशेषता मावळ तालुक्यात सर्वाधिक सरासरीपेक्षा दुप्पट झाला असून मुळशी भोर खेड आंबेगाव शिरूर आणि दौंड तालुक्यातही सरासरीपेक्षा पाच ते पंधरा टक्के अधिक पावसाची नोंद झाली.

त्यामुळे पाण्याची चिंता मिटली असली तरी सप्टेंबर अखेर झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झालेय.

यूपीएससी पूर्वपरीक्षेची तात्काळ उत्तर तालिका

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरिक सेवा पूर्व परीक्षेच्या उत्तर तालिका अर्थात अन्सर कीज आता परीक्षानंतर तात्काळ जाहीर केल्या जाणार आहेत या महत्वपूर्ण निर्णय याची माहिती आयोगाने सर्वोच्च न्यायालयात एका प्रतिज्ञापत्र द्वारे दिली आहे.

परीक्षा प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्याचा मागणीसाठी दाखवलेल्या याचे केवळ सुनावणी दरम्यान यूपीएससी ही भूमिका स्पष्ट केली आहे.

अतिवृष्टीने केळी बाग झाली आडवी, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पुन्हा आश्रू

धाराशिव जिल्ह्यातील भूम परंडा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे विश्वरूपा नदीला आलेल्या महापुरामुळे भांडगाव येथील प्रगत शेतकऱ्यांची केळीच्या बाग अक्षरशः उद्ध्वस्त झाली असून,शेतकऱ्यांच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल आहे.जिल्ह्यात झालेल्या धुवाधार पावसामुळे वादळी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. भांडगाव मधील विजय चाबुकस्वार गुरव या शेतकऱ्याची आठ लाख रुपये खर्चून लावलेली केळीची भाग अक्षरश:भुई सपाट झाली.विश्वरूपा नदी दोन वेळा पात्रा बाहेर गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या केळी आणि बागा पूर्णपणे उध्वस्त झाल्या.आगामी सणासुदीत या पिकावरून उत्पन्न मिळण्याची अपेक्षा होती,परंतु आता शेतकरी डोळ्यांदेखत त्यांची मेहनत पाण्यात बुडाली आहे .

भंडारा शहरातील गांधी चौकात तिरुपती एम्पोरीयम येथे लागली भीषण आग.

भंडारा शहरातील गांधी चौकात असलेल्या तिरुपती गिफ्ट एम्पोरीयम येथे रात्री भिषण आग लागल्याने या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाली आहे,आग लागण्याचा कारण अद्याप अस्पष्ट असले तरी शॉर्ट सर्किट ने आग लागल्याचा बोलले जात आहे,आगीची माहिती मिळताच नागरिकांनी अग्निशमक दलाला माहिती दिली, अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळाले असले तरी दुकानाचा संपूर्ण सामान जळून खाक झालं.

Maharashtra Live News Update :  ९ ऑक्टोबरपासून वीज कर्मचाऱ्यांचा ७२ तासांसाठी राज्यव्यापी संपावर जाण्याचा निर्णय

नांदेडमध्ये मुसळधार पावसाला सुरूवात

हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्या नुसार नांदेड मध्ये मुसळधार पाऊस सुरु.

मध्ये रात्री पासून नांदेड जिल्ह्यात पुन्हा पावसाची तुफान बॅटिंग.

नांदेड शहरातील रस्ते जलमय, रस्त्याला आले नदीचे स्वरूप.

तीन दिवस घेतली होती पावसाने विश्रांती.

पुन्हा परतीच्या पावसाने नांदेडला झोडपले.

नांदेड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी.

ब्राह्मण जागृती सेवा संघातर्फे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना समाजस्नेह पुरस्कार

ब्राह्मण जागृती सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्ताने देण्यात येणारा ‘समाजस्नेह पुरस्कार’ एकनाथ शिंदे यांना जाहीर

कर्नाटकातील श्री माणिकप्रभू संस्थानचे पीठाधीश ज्ञानराज माणिकप्रभू महाराज यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण

पुण्यातील टिळक स्मारक मंदिर याठिकाणी १२ ऑक्टोबर रोजी हा पुरस्कार सोहळा

पुरस्कारासोबतच समाजभूषण, युवा गौरव पुरस्काराचे वितरण देखील याप्रसंगी होणार

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्घाटनाची तयारी जोरात 50 हजार लोक बसण्याची व्यवस्था

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 8 ऑक्टोबर रोजी होत आहेत डिसेंबर मध्ये विमान सेवा सुरू होणार आहेत दोन रनवे असणार आहेत

या कार्यक्रमासाठी पंतप्रधान राज्याचे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ उपस्थित असणारे त्यामुळे कार्यक्रमाची तयारी जोरात सुरू झाली आहे

nashik-laslgon-कांदा व्यापाऱ्याला चाकूने भोसकले

नाशिकच्या लासलगाव जवळील विंचूर येथील मारवाडी पेठेत कांदा व्यापारी पावन जाजू यांच्यावर त्यांचा सहकारी बोराडे नावाच्या व्यक्तीने चाकू ने हल्ला केल्याची घटना घडली असून,पावन जाजू यांच्या पोटावर जबरदस्त वार झाले आहे,घरासमोर उभे असताना हल्लेखोराने त्यांच्यावर वार केले,घटना घडतात आजू-बाजूच्या लोक धावत आले आणि त्यांनी जाजू यांना हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले मात्र घाव जबरी असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे पाठवण्यात आले असून,लासलगाव पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहे

भिवंडीमध्ये अग्नितांडव

भिवंडी तालुक्यातील लोनाड ग्रामपंचायत हद्दीतील पॅरामाउंट वेअर हाऊस संकुलातील कुरिअर गोडाऊनला भीषण आग.

शाडो फॅक्स, बर्ड व्हिव, कुरिअर गोडाऊन आगीच्या भक्ष्य स्थानी शॉर्ट सर्किट मुले आग लागण्याचा प्राथमिक अंदाज.

घटनास्थळी भिवंडी महानगरपालिकेची आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या दोन गाड्या दाखल, आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू.

शेतकऱ्यांना देणार प्रति टन 3020 रुपये उसाला भाव.....

संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा 28 वा बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याचे उद्घाटन कारखान्याचे अध्यक्ष माजी खासदार नानासाहेब नवले आणि देहू देवस्थानचे मुख्य विश्वस्त जालिंदर महाराज मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी परिसरातील शेतकरी बांधव, हितचिंतक आणि कारखान्याचे संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यंदा कारखान्याकडून तब्बल पाच लाख टन ऊस गाळपाचे लक्ष्य ठेवण्यात आले असून, गेल्या वर्षी सुमारे चार लाख टन उसाचे गाळप करण्यात आले होते. शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या ऊसदरातही वाढ करण्यात आली असून, गेल्या वर्षी प्रति टन 2900 रुपये भाव देण्यात आला होता, तर यंदा 3020 रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

राजगुरूनमध्ये तरुणाच्या डोक्यात दगड टाकत बेदम मारहाण

राजगुरुनगर शहरातील वृदावन सोसायटी रोड गुन्हेगारी टोळीकडुन तरुणाच्या डोक्यात दगड टाकत बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली. रात्रीच्या वेळी तीन दुचाकीवर आलेल्या सहा तरुणांनी तरुणावर हाताने दगडाने बेदम मारहाण करत उच्चभ्रु सोसायटीत जिवे मारण्याचा प्रयत्न करत दहशत निर्माण केली या मारहाणीचा विडिओ समोर आलाय लहान वयातील तरुणपिढी गुन्हेगारी वृत्तीकडे वळण घेत असल्याचे या विडिओतुन समोर आल्याने पोलीसांची गुन्हेगारी वचक राहिला नाही का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो.

भंडारा शहरातील मिस्कीन टॅंक गार्डनचा तलाव फुटला

भंडारा शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या मिस्कीन टॅंक येथील नगरपालिका प्रशासनाचा तलाव मुसळधार पाऊस पडल्यानंतर सायंकाळी फुटला तलावाच्या पाण्याचा प्रवाह भंडारा शहराचा मुख्य मार्ग असलेला जे एम पटेल मार्गावरून वाहत असल्याने वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. हे तलावाचं पाणी खालच्या भागांमध्ये असलेल्या बैरागी वाडा, बजाज कॉम्प्लेक्स, गांधी विद्यालय, तहसील कार्यालय परिसरात पूर्णपणे जलमयस्थिती निर्माण झाली आहे.

Maharashtra Live News Update : आदिवासी समाजाचा नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

हैदराबाद गॅजेट नुसार बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करा अशी मागणी बंजारा समाजाने लावून धरली आहे.एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी बंजारा समाज मोठ्या प्रमाणात मोर्चे देखील काढत आहे.बंजारा समाजाच्या मागणीला आदिवासी समाज देखील आता मोर्चे काढून प्रखरपणे विरोध करीत आहे. बंजारा समाजाच्या मागणीच्या विरोधात आज नांदेडमध्ये आदिवासी समाजाचा उलगुलान आरक्षण बचाव महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी 11 वाजता नांदेड शहरातील नवीन मोंढा बाजार समितीच्या मैदानातून हा मोर्चा निघणार आहे. नवीन मोंढा, अण्णाभाऊ साठे चौक, चिखलवाडी कॉर्नर मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.बंजारा समाजाने काढलेल्या मोर्चा पेक्षा दीडपट मोठा मोर्चा आमचा असेल असा दावा आमदार भीमराव केराम यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aetashaa Sansgiri : लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्रीचा थाटात पार पडला साखरपुडा, होणारी नवरा कोण?

तटकरेंच्या बालेकिल्ल्यात अजित पवारांना धक्का, महत्त्वाच्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश

दिवाळीत लाभार्थ्यांना झटका; महायुती सरकारची 'ही' लोकप्रिय योजना होणार बंद?

पीएचडी, नेट, सेट आहे, तरीही जॉब नाही; राज्यात प्राध्यापकांच्या 12 हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त

MNS Warns : लाडक्या बहिणींसारखी शेतकऱ्यांनाही मदत करा, अन्यथा... मनसेचा थेट इशारा

SCROLL FOR NEXT