पुण्याच्या दिवे घाटातून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज दुपारी १२ ते २ या वेळेत दिवे घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. आळंदी ते पंढरपूर मार्गावरील रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी ब्लास्टिंग करण्यात येणार असल्याने वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे वाहनचालकांनी प्रवासाचं नियोजन करून पर्यायी मार्गाचा वापर करावा.
तीर्थक्षेत्र आळंदीतील इंद्रायणी नदीच्या तीरावर तृतीयपंथीयांच्या दोन गटांत पैशांची मागणी करण्याच्या कारणावरून वाद झाल्याची घटना समोर आली आहे. या वादाचे पर्यवसान चक्क फ्रीस्टाइल हाणामारीत झाले. विशेष म्हणजे, नदीकाठी उपस्थित वारकऱ्यांसमोरच दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली.
या घटनेमुळे काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पैशांची मागणी करण्याच्या कारणावरून हा वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी आळंदी पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. हाणामारी नेमकी कोणत्या कारणावरून आणि कोणाच्या पुढाकाराने झाली, याचा तपास आळंदी पोलीस करीत आहेत.
मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनाची तयारी? जालना ते मुंबई जाण्यासाठी जालन्यात मीडिया व्हॅन तयार...
मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांचा आमरण उपोषण सुरू असून आज आमरण उपोषणाचा 14 वा दिवस आहे...
अंतरवाली सराटीत मागण्या मान्य झाल्या नाही तर मुंबईला धडक देऊ असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलेला होता त्या पार्श्वभूमीवर उद्या त्यांनी अंतरवाली सराटीत मराठा समाजाची बैठक देखील बोलावली आहे..
वाशिमच्या कारंजा येथील बस स्थानकावर महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन लंपास करणाऱ्या सराईत चोरट्याला वाशिमच्या स्थानिक गुन्हे शाखेने अहमदनगरमधून अटक केली आहे. चोरीच्या या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना आरोपीबाबत माहिती मिळाली होती. त्यानंतर पथकाने अहमदनगर बसस्थानक परिसरात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतलं.शशिकांत विठ्ठल इष्टे, वय 31 वर्षे, असं आरोपीचं नाव असून, त्याच्याकडून 14.770 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन किंमत 2 लाख 25 हजार, जप्त करण्यात आली आहे. आरोपीने अशाच प्रकारे आणखी काही गुन्हे केले आहेत का याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
भुसावळ जिल्ह्यात गुरुवारी पळासखेडे (ता.पारोळा) आणि भुसावळ अशा दोन ठिकाणी दोन जणांचे खून झाले. पळासखेडे येथील तरुणाचा खून पूर्ववैमनस्यावरून झाला तर भुसावळात खून झालेला इसम हा रेल्वे कर्मचारी होता.
पुणे विमानतळाच्या जुन्या टर्मिनल इमारतीचे नूतनीकरण करून उभारण्यात आलेल्या विस्तारित चेक-इन आणि सिक्युरिटी होल्ड एरियाची केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पाहणी केली.
प्रवाशांची वाढती संख्या, पीक अवर्समधील गर्दी आणि प्रवाशांच्या सोयी लक्षात घेऊन या जुन्या टर्मिनलचे अत्याधुनिक सुविधांसह नूतनीकरण आवश्यक प्रक्रियांपैकी बहुतांश प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत.
भुसावळ मध्य रेल्वेच्या पुणे विभागात पुणे यार्ड तसेच पुणे-दौंड दरम्यानच्या मार्गावरील रेल्वे लेआउटमध्ये बदल करण्यासाठी डीसीएन (डायरेक्ट करंट नेटवर्क) संबंधित काम हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी विशेष देखभाल ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे भुसावळ विभागातून धावणाऱ्या परिणाम होणार आहे. यात पुणे-नागपूर काही रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर एक्सप्रेस हडपसरहून सुटणार आहे.
पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी संकटात सापडला असतानाही मेहेकर तालुक्यातील खंडाळा देवी येथे बैलपोळा सण पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. यंदा मात्र गावात बैलांची कमतरता जाणवली. वर्षभर शेतकऱ्यांसोबत शेतात राबणाऱ्या सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करत ग्रामस्थांनी बैलांना सजवून त्यांच्या अंगावर झुली चढवल्या. विधिवत पूजा-अर्चा व आरती करण्यात आली. गृहिणींनी बैलांसाठी पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला. पावसाअभावी शेतीसमोर मोठे संकट असतानाही खंडाळा देवी गावाने आपली जुनी परंपरा कायम जपत बैलपोळ्याचा उत्साह टिकवून ठेवला. या सोहळ्यात परिसरातील महिला-पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
नांदेड दक्षिणचे शिंदे सेनेचे आमदार आनंद बोंढारकर यांच्या वतीने आज दही हंडीचे आयोजन करण्यात आले आहे. दही हंडीच्या कार्यक्रमात प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिला बोलावण्यात आले.शिवसेनेच्या दही हंडी कार्यक्रमात गौतमी पाटील हिच्या नृत्याचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाची शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार आनंद बोंडाळकर यांनी जय्यत तयारी केली आहे. गौतमीच्या कार्यक्रमाचे पोस्टर शासकीय कार्यालयात देखील लावण्यात आले आहे.दरम्यान शिवसेनेने गौतमी पाटील हिचा कार्यक्रम आयोजित केल्याने उबाठाचे नेते अंबादास दानवे यांनी टीका केली.दही हंडी संस्कृतीचा सण आहे त्याबद्दल विरोध नाही,पण त्यात महिलांना नाचवने चूक आहे असं अंबादास दानवे म्हणाले.
भिमाशंकर अभयारण्याच्या डोंगरमाळरानावर नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या रानभाज्यांची ओळख आणि स्वाद शहरी नागरिकांना व्हावा, यासाठी खेड पंचायत समितीच्या आवारात रानभाज्या महोत्सव भरवण्यात आलाय.
भरधाव आलेल्या एसटी बसने स्कुटीने जाणाऱ्या एका शेतकऱ्याला चिडल्याची घटना भंडाऱ्याच्या वरठी इथे घडली. ही घटना काल पोळ्याच्या दिवशी घडल्याने शेतकरी कुटुंबावर दुःखाचं डोंगर कोसळला. कैलास बांते (५८) असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. ते मोहाडी तालुक्यातील बीड सीतेपार या गावचे असून वरठी येथे काही कामात निमित्त आले होते. गावाकडे परत जाताना हा अपघात घडला. वरठी पोलिसांनी बस चालका विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
पुण्यातील कोंढवा भागात महापालिकेचे विद्युत खांब चोरीला गेल्याचा मुद्दा महापालिका सभागृहात उपस्थित होताच गोंधळ उडाला. भाजपचे नगरसेवक सुनील पांडे यांनी हा मुद्दा उपस्थित करून चौकशीची मागणी केली. त्यानंतर सत्ताधारी भाजपचे नगरसेवक आक्रमक होत महापौरांच्या आसनासमोर एकत्र आले. नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी करीत या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. सत्ताधारी पक्षाचेच नगरसेवक महापौरांसमोर येऊन घोषणाबाजी करीत असल्याने सभागृहातील वातावरण काही काळ चांगलेच तापले.
जालन्याच्या आंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांचे 11 वे उपोषण असून आज उपोषणाचा चौदावा दिवस आहे. त्यांची मध्यरात्री प्रकृती खालवल्याने त्यांच्यावरती उपचार करण्यात आले आहेत. त्यांना रात्री उशिरा सलाईन लावण्यात आली होती. त्याचबरोबर वैद्यकीय पथकाकडून त्यांची तपासणी देखील करण्यात आली. मात्र मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत गेल्या चार दिवसापासून सरकारच्या शिष्टमंडळाची कुठलीही चर्चा नाही. उद्या मनोज जरांगे पाटील यांची आंतरवाली सराटीत 12 वाजता राज्यव्यापी निर्णायक बैठक होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.