Maharashtra Live News Update Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update: सक्षम ताटे खून प्रकरणातील चार आरोपींना न्यायालयीन कोठडी

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: आज रविवार, दिनांक ७ डिसेंबर २०२५, राज्यात थंडी गायब, जिल्हा परिषद, महापालिका निवडणुका अपडेट्स, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

नागपूर अधिवेशनासाठी निघालेल्या अनेक आमदारांची तिकिटं रद्द

इंडिगो विमान सेवेचा फटका आता राज्यातील अनेक आमदारांना पण बसलेला पाहायला मिळतोय.. उद्यापासून नागपूर आत राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू होत असून राज्यभरातील सर्वपक्षीय आमदारांना आज नागपूरला पोहोचायचं आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून इंडिगो या विमान कंपनीचा झालेला गोंधळ आणि इंडिगो विमान कंपनीच्या अनेक विमान फेऱ्या रद्द झाल्याने आता अनेक आमदारांची तिकिटं रद्द झालेली पाहायला मिळत आहेत.. त्यातच पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील ज्या आमदारांना नागपूरला पोहोचायचं आहे त्या आमदारांनी आता थेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत चार्टर्ड विमानाने जाण्याचा निर्णय घेतला आहे.. चंद्रकांत पाटील आज दुपारी चार्ट विमानाने पुण्याहून नागपूरला रवाना होणार आहेत

सांगली.. सौर उर्जा प्रकल्पसाठी गावातील 19 एकर जमीन अधिग्रहण

सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील बलगवडे येथील सौर उर्जा प्रकल्पसाठी गावातील गायरान मधील 19 एकर जमीन अधिग्रहण करण्यात आली. यामध्ये संबंधित कंपनी व प्रशासनातील अधिकारी यांनी संगनमताने ही जागा चुकीच्या पद्धतीने हडप केली असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामपंचायतीने सुचविलेले जागेत हा प्रकल्प उभा करण्यास नकार देत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे महिलांनी आणि ग्रामस्थांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

चाकूर पंचायत समितीचा भ्रष्ट कारभार पुन्हा उघड

लातूर - चाकूर तालुक्यातील कलकोटी येथे मनरेगाची कामे प्रत्यक्षात न करता निधी हडप केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान या भ्रष्ट प्रकरणाची चौकशी वरिष्ठ समितीने जिओटॅग लावून केल्याने केवळ एकच गोटासमोर आलाय तर 41 गोट्याचा निधी काम न करता हडप केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेषता ज्या लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला त्यातील अनेक लाभार्थी हे शासकीय सेवेत कर्मचारी असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे., दरम्यान या भ्रष्ट कारभारामुळे शासकीय निधीवर डल्ला मारणाऱ्या अधिकारी कर्मचारी तसेच बोगस लाभार्थ्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

पिंपरीत अंगावर शेड आणि भिंत पडून एमआयडीसीतील कामगारांचा मृत्यू,

अंगावर शेड आणि भिंत पडून एका निष्काप कामगाराचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. भोसरी एमआयडीसी परिसरातील J ब्लॉक येथील प्लॉट नंबर 485 या ठिकाणी काल संध्याकाळ दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत मारुती भालेवार भालेराव वय अंदाजे 30 ते 35 वर्षे याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

आमदार अभिमन्यू पवार यांनी केली नवस्फूर्ती.,3 किलोमीटर दंडवत नवस पूर्ण.

लातूरच्या किल्लारी येथील नीलकंठेश्वर साखर कारखाना निर्विघ्नपणे सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणात गाळपाची प्रक्रिया सुरू झाली आहे, मागच्या अनेक वर्षापासून बंद अवस्थेत धुळखात पडलेला कारखाना सुरळीत चालत असल्याने शेतकऱ्यांच्या जीवनात आनंदाचे दिवस आल्याने , आमदार अभिमन्यू पवार यांनी किल्लारी येथील निळकंठेश्वर मंदिरापर्यंत दंडवत घालत नवस्फूर्ती केली आहे., एकूण 3 किलोमीटर पर्यंत दंडवत घालत, अभिमन्यू पवार यांनी नवस पूर्ण केलाय यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि कुटुंबीय उपस्थित होते.

पीएम किसान सन्मान योजनेतून धाराशिव जिल्ह्यातील 2588 शेतकरी वगळले

:केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे.या योजनेअंतर्गत पाञ शेतकऱ्यांना वर्षाला तीन हप्त्यात 6 हजार रुपयांचा निधी मिळतो माञ 20 वा हप्ता दिल्यानंतर लागु करण्यात आलेल्या काटेकोर निकषामुळे धाराशिव जिल्ह्यात 2 हजार 588 शेतकरी अपाञ ठरले आहेत.प्रामुख्याने ई केवायसी प्रक्रीया अपुर्ण ठेवल्याने,तसेच बॅंक खाते आधार कार्डशी व जोडल्याने व कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांनी लाभ घेतल्यामुळे ही लाभार्थी संख्या कमी झाली आहे.

अहिल्यानगर महापालिकेच्या मतदार यादीत श्रीगोंद्यातील ४३८१ नावे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून घोटाळ्याचा संशय

अहिल्यानगर महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीमध्ये श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील तब्बल ४३८१ नावे समाविष्ट करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्या निदर्शनास आणून दिला आहे तसेच या संदर्भात लेखी हरकतही नोंदवली आहे. ही सर्व नावे श्रीगोंदाच्या मांडवगण जिल्हा परिषद गटातील असल्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. मात्र महापालिका प्रशासन सत्ताधारी नेत्यांच्या दबावाखाली काम करत असून जर या नावांबाबत अहिल्यानगर महानगरपालिका प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही तर भविष्यात न्यायालयाचे दार ठोठावणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी सांगितले आहे.

वसई विरार पालिकेच्या निवडणुकीत भाजपचा पानिपत होणार - अविनाश जाधव

: वसई विरार महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 24व्या कार्यालयाचे उद्घाटन मनसे नेते अविनाश जाधव यांच्या उपस्थितीत करण्यात आले. याच कार्यक्रमात जाधव यांनी भाजपवर जोरदार टीका करत, पालिकेच्या निवडणुकीत भाजपचा ‘पानिपत’ होणार, असा दावा केला आहे.

वसई विरार शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना मागच्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे. यामुळे पालिकेच्या निवडणुकीत नवनिर्माण सेनेची ताकद सर्व राजकीय पक्षांना कळेल. भारतीय जनता पक्ष हा अतिशय हुशार पक्ष आहे. जिथे त्यांची स्वतःची ताकद आहे. तिथे ते युती करत नाही. ठाणे, मुंबई, नवी मुंबई त्यांची युती नाही. मात्र वसई विरार मध्ये युती करतात म्हणजे त्यांची ताकद नाही.

बुलढाणा नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या मतदान प्रक्रियेत बोगस मतदान झाल्याचा आरोप..

नगरपालिका निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली असून या मतदान प्रक्रियेत बुलढाण्यात हजारो मतदान हे बोगस झाल्याचा आरोप अड सतीश चंद्र रोठे यांनी निवडणूक आयोगाकडे केला आहे .. या बोगस मतदानाची एस आय टी चौकशी व्हावी अशी मागणी लेखी पत्रा द्वारे निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.... तसेच मतदानाचा निकाल 21 डिसेंबर ला लागणार असल्याने ई व्ही एम मशीन नगर पालिका कार्यालयाच्या हॉल मध्ये ठेवण्यात आल्या असून तिथे घोळ होऊ शकतो म्हणून अड सतीश चंद्र रोठे यांनी रात्रीचा मुक्काम देत पहारा देणे सुरु केले आहे.. दोन दिवसापासून हा कडक पहारा देणे सुरु असून तो 20 डिसेंबर पर्यंत सतत राहणार असल्याचे रोठे यांनी सांगितले आहे

यवतमाळ नगरपरिषद निवडणुकीत नेत्यांची कसोटी

यवतमाळ नगर पालिकेची निवडणूक येत्या वीस डिसेंबर रोजी होऊ घातली आहे.नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात नऊ उमेदवार असून नामांकन मागे घेण्यासाठी चार दिवसाचा कालावधीत उरलाय.या निवडणुकीत मंत्री संजय राठोड,मंत्री इंद्रनील नाईक,खासदार संजय देशमुख,मंत्री अशोक उईक,माजीमंत्री शिवाजीराव मोघे आणि भाजपाचे नेते मदन येरावार यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे.

नागपूर अधिवेशनासाठी निघालेल्या अनेक आमदारांची तिकिटं रद्द

इंडिगो विमान सेवेचा आमदारांना पण फटका बसला आहे. इंडिगो विमान कंपनीच्या अनेक विमान फेऱ्या रद्द झाल्याने अनेक आमदारांची तिकिटं रद्द झाली आहेत. पश्‍चिम महाराष्ट्रातील अनेक आमदारांची तिकिटं रद्द झाली.

अनेक आमदारांनी आज दुपारच्या विमानाचे तिकीट काढले होते पण विमानं रद्द झाल्याने अनेक आमदारांनी स्वःच्या मोटारीने नागपूर गाठण्याचा निर्णय घेतला. विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून नागपूर मध्ये सुरवात होणार आहे. राज्याचे मंत्रिमंडळ आज नागपूरमध्ये होणार दाखल

यवतमाळ जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला

डिसेंबरच्या थंडीचा जोर जाणवू लागला आहे.तापमानात जवळपास दोन अंशाने घट झाली आहे.परिणामी यवतमाळ जिल्ह्यात दिवसाही हुडहुडी भरवणारे थंडगार वारे वाहत आहे.यामुळे घराबाहेर पडताना उबदार कपड्यांचा वापर करावा लागत आहे तर नागरिकांसह महिला शेकोट्या जवळ बसून उब घेतांना दिसताहेत.जिल्ह्यात पारा 10 अंशावर स्थिरावलाय.

पंढरपुरात माझा पराभव झाला तर पुन्हा तोंड दाखवणार नाही; भगीरथ भालकेंचे परिचारिकांना आव्हान

माझा पंढरपुरात पराभव झाला तर पुन्हा मंगळवेढ्यात तोंड दाखवणार नाही,तुमचा पराभव झाला तर तुम्ही तोंड दाखवायचं नाही असं खुल आव्हान पंढरपुरातील भगीरथ भालके यांनी दिले आहे.

मंगळवेढा नगरपालिका निवडणूक प्रचार सभेत बोलताना भालके यांनी प्रशांत परिचारक यांच्यावर हल्लाबोल केला. दोन दिवसांपूर्वी माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी मंगळवेढा येथे पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचा विजय हा काळ्या दगडावरची पांढरी रेघ असल्याचा दावा केला होता. त्यानंतर भगीरथ भालके यांनी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सभेत परिचारकांच्या दाव्याला थेट आव्हान दिले आहे.

छत्रपती संभाजीनगर : तब्बल ३ दिवसांनंतर इंडिगोच्या मुंबई विमानांचे उड्डाण

तीन दिवस रद्द राहिलेल्या इंडिगोच्या सकाळच्या आणि रात्रीच्या वेळेतील मुंबई छत्रपती संभाजीनगर मुंबई विमानांचे शनिवारी उड्डाण झाले. त्यामुळे मुंबई विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला. परंतु मुंबईच्या प्रवासी संख्येत काहीशी घट झाली. दुसरीकडे दिल्ली विमानाला दीड तास विलंब झाला. इंडिगोचे रात्रीचे मुंबई विमान २ डिसेंबर रोजी अचानक रद्द करण्यात आले होते. त्यानंतर ३ ते ५ डिसेंबरदरम्यान मुंबईचे सकाळच्या आणि रात्रीच्या वेळेतील दोन्ही विमाने रद्द झाली. शुक्रवारी मुंबईसह दिल्लीचेही विमान रद्द झाले. परिणामी, प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. शनिवारी तीन दिवसांनंतर सकाळ आणि रात्रीच्या मुंबई विमानाने उड्डाण केले. रात्रीच्या मुंबई छत्रपती संभाजीनगर विमानाने जवळपास पाऊण तास उशिराने मुंबईहून रात्री ८:१५ वाजता 'टेकऑफ' घेतले.

Maharashtra Live News Update: सक्षम ताटे खून प्रकरणातील चार आरोपींना न्यायालयीन कोठडी

नांदेडमध्ये आंतरजातीय प्रेम प्रकरणातून खून करण्यात आलेल्या सक्षम ताटे प्रकरणात अटक असलेल्या चार आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावन्यात आली.नव्याने अटक केलेल्या दोघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली .. 27 नोव्हेंबर रोजी सक्षम ताटे या तरुणाचा खून करण्यात आला.याप्रकरणी इतवारा पोलिसांनी त्याच रात्री सक्षम ताटे याच्या प्रेयसीच्या आई-वडिलांसह , दोन भावाना अटक केली होती.आता पर्यंत या खून प्रकरणात एकूण आठ आरोपी अटक करण्यात आले. आरोपींना वेळोवेळी पोलिसांनी न्यायालयात हजर केले .. आज चार आरोपींना न्यायालयाने , न्यायालयीन कोठडी सुनावली.त्यात आँचलचे वडील गजानन मामीलवार , मोठा भाऊ साहिल मामीडवार , सोमेश लाखे , वेदांत कुदळेकर या चार जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.या चार जनांसह आँचलची आई, आणि अल्पवयीन भाऊ यांना देखील 28 नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती. आँचलची आई जयश्री मामीडवार हिला तीन दिवसांपूर्वी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. आंचलच्या अल्पवयीन भावाला सुधारगृहात पाठवण्यात आले.नव्याने अटक करण्यात आलेल्या अमन शिरसे याला आणि आदित्य सोमनकर या दोघांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

पुणे विमानतळावरून 69 विमानाचे उड्डाणे रद्द

पुणे विमानतळावरून काल दिवसभरात 69 विमानाचे उड्डाणे रद्द

सलग पाचव्या दिवशीही प्रवाशांना विमानसेवेचा बसला फटका

पुणे विमानतळावर काल दिवसभरात 22 विमानांचे आगमन तर 25 विमानांचे उड्डाणे झाले

इंडिगो चे आगमन होणारी ३४ तर उड्डाणे घेणारे ३५ अशी एकूण ६९ विमाने काल रद्द

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM किसान योजनेतून धाराशिवचे २५८८ शेतकरी वगळले, कारण आले समोर

प्रवाशांसाठी खूशखबर! टोल भरण्याची आता गरजच नाही, टोल प्लाझापासून किती दूर राहिल्यास मिळते सूट?

Accident : पुण्यात मोठी दुर्घटना! एमआयडीसीची भिंत कोसळून कामगाराचा मृत्यू

Gold Price Today : मुंबई-पुण्यात सोन्याच्या किंमतीत झाली घसरण, वाचा २४ आणि २२ कॅरेटचे आजचे दर

Gautam Gambhir: वनडे सिरीज जिंकल्यानंतर विराट-रोहितबद्दल काय म्हणाला गौतम गंभीर? IPL टीमच्या मालकांनाही सुनावले खडे बोल

SCROLL FOR NEXT