Ahmednagar Corporation Saam tv
महाराष्ट्र

Ahmednagar Corporation : प्रत्येक चौकात लागणार कर थकबाकीदारांची यादी; अहमदनगर मनपा प्रशासनाचा निर्णय

Ahmednagar News : अहमदनगर मनपाने मालमत्ताधारकांना लोकअदालतीच्या निमित्ताने ३० नोव्हेंबर ते ९ डिसेंबरपर्यंत ७५ टक्के शास्तीमाफी जाहीर केली होती.

Rajesh Sonwane

सुशील थोरात

अहमदनगर : अहमदनगरला १ लाखांच्या पुढील थकबाकीदारांवर कारवाई करण्याचा महापालिका (Ahmednagar) आयुक्तांनी आदेश दिला आहे. विशेष म्हणजे करबुडव्यांचे नावांचा फ्लेक्स नगरच्या चौकाचौकांत लावण्याचा निर्णय देखील प्रशासनाने घेतला आहे. (Tajya Batmya)

अहमदनगर मनपाने मालमत्ताधारकांना लोकअदालतीच्या निमित्ताने ३० नोव्हेंबर ते ९ डिसेंबरपर्यंत ७५ टक्के शास्तीमाफी जाहीर केली होती. दहा दिवसांत या योजनेचा ४ हजार ४१३ जणांनी लाभ घेत थकबाकीपोटी मनपाकडे ६ कोटी ७० लाख रुपयांचा भरणा केला. त्यानंतर शास्तीमाफीच्या योजनेत ३१ डिसेंबरपर्यंत वाढ केली. मात्र अद्यापही अनेकांनी कर्ज भरला नसल्याने कर (Tax) वसुलीच मोठं आव्हान पालिके समोर आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

थकीत कर वसुलीसाठी अहमदनगर महापालिकेने ७५ टक्के शास्ती माफी देऊनही महिनाभरात अवघी साडेनऊ कोटी रुपयांची वसुली झाली आहे. यामुळे आता महापालिका करबुडव्यांच्या नावांचे शहरात फ्लेक्स लावणार आहे. याबाबत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. पंकज जावळे यांनी वसुली विभागाला आदेश दिले आहेत. शहरात १ लाखांपुढे थकबाकी असणाऱ्यांची तब्बल २ हजार ७१२ इतकी संख्या आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : पंक्चर कार बाजूला घेताना वाहनाची धडक; दोघांचा जागीच मृत्यू, समृद्धी महामार्गावरील भीषण दुर्घटना

Maharashtra Live News Update: संघाच्या शताब्दी कार्यक्रमात पंतप्रधान मोदींच्या हस्ते टपाल तिकीट आणि नाणं जारी

Ladki Bahin Yojana: लाडकीची e KYC करण्याचा निर्णय का घेतला? कारण आलं समोर

Sleep Routine: दररोज ८ तास झोपल्यानंतरही प्रकृती बिघडू शकते? Sleeping Time म्हणूनच महत्वाचा

Sambhajinagar: अतिवृष्टीनं पीक गेलं, मुलीच्या कॉलेजची फी कशी भरायची? हतबल झालेल्या शेतकऱ्याची आत्महत्या

SCROLL FOR NEXT