Jaykwadi Dam Saam tv
महाराष्ट्र

Jayakwadi Dam : जायकवाडीच्या सौर ऊर्जा प्रकल्पाला मच्छीमारांचा विरोध; जलसमाधी घेण्याचा दिला इशारा

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

नेवासा (अहमदनगर) : जायकवाडी जलाशयातील नियोजित तरंगते सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करण्यात यावे या मागणीसाठी कहार भोई आणि भिल्ल समाजाचे शेकडो मच्छीमार (Ahmednagar) अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत. हा प्रकल्प रद्द न झाल्यास जलसमाधी घेण्याचा इशारा मच्छीमारांनी दिला आहे. (Maharashtra News)

केंद्र सरकारच्या अधिन असलेल्या नॅशनल थर्मल कॉर्पोरेशन लिमिटेडला मराठवाड्यातील जायकवाडी धरण (Jayakwadi Dam) जलाशयात तरंगते सौर ऊर्जा प्रकल्पाच्या कामाचे प्रस्ताव देण्यात आले आहेत. हा सौर ऊर्जा प्रकल्प झाल्यास २३ हजाराहून अधिक मच्छीमारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार (Nevasa) असल्याची भिती या जलाशयावर अवलंबून असलेल्या मच्छीमारांना आहे. तसेच या प्रकल्पामुळे जायकवाडी जलाशयामध्ये असलेले सर्व माशे ऑक्सिजन विना मरण पावतील अशी देखील भीति असल्याने सरकारने तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पाचा घेतलेला निर्णय तातडीने रद्द करावा अशी मागणी केली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जलसमाधीचा इशारा 

जायकवाडीतील सदरचा प्रकल्प रद्द न झाल्यास सर्व मच्छीमार जलसमाधी घेतल्याशिवाय राहणार नाही; अशी भूमिका भिल्ल भोई आणि कहार समाजाच्या मच्छीमारांनी घेतली आहे. शेकडो मच्छीमार आजपासून नेवासा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT