Ahilyanagar Rahata taluka Two cousins ​​drown Saam Tv News
महाराष्ट्र

Ahilyanagar News : शेतात गेले, हात-पाय धुण्यासाठी ओढ्यावर आले, पाय घसरुन बुडाले; दोघे चुलत भावांचा घरच्यांसमोर अंत

Ahilyanagar Two Cousins ​​Drowned : सध्या निळवंडे धरणातून तळे भरण्यासाठी पाणी सोडण्यात आलेलं आहे. दोन्ही मुलांचा पाय घसरून ते ओढ्याच्या पाण्यात बुडाले. दोघांनाही पोहता येत नव्हते.

Prashant Patil

अहिल्यानगर : अहिल्यानगरमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कुटुंबियांसोबत शेतात खत टाकण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावांचा ओढ्याच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील गोगलगाव येथे घडली आहे. या घटनेनं गोगलगाव परिसरात शोककळा पसरली आहे. गोगलगाव येथील १९ वर्षीय साहिल दत्तात्रेय चौधरी आणि १४ वर्षीय किरण नारायण चौधरी हे दोघे चुलतभाऊ कुटुंबियांसोबत शेतात खत टाकण्यासाठी गेले होते. खत टाकण्याचे काम पूर्ण झाल्यावर साहिल आणि किरण हे हात-पाय धुण्यासाठी जवळच्या ओढ्यावर गेले.

सध्या निळवंडे धरणातून तळे भरण्यासाठी पाणी सोडण्यात आलेलं आहे. दोन्ही मुलांचा पाय घसरून ते ओढ्याच्या पाण्यात बुडाले. दोघांनाही पोहता येत नव्हते. त्यांच्या कुटुंबियांनी आजूबाजूच्या लोकांना बोलावून दोघांना बाहेर काढलं. त्यांना तातडीने लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. किरण हा नुकताच आठवी इयत्ता उत्तीर्ण झाला होता तर साहिल लोणी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिकत होता. या घटनेनं चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गोगलगाव आणि परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

बाप-लेकाचा जागीच मृत्यू, मनमाडवर शोककळा

देव दर्शन करून घरी परत येताना बाप-लेकावर काळाने घाला घातला. नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे आज पहाटे पावणेचार वाजेच्या सुमारास भीषण अपघात झालाय. या अपघातात पिता-पुत्राचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर त्यांचा पुतण्या गंभीर जखमी झाला. या घटनेने मनमाड आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

नाशिक येवला तालुक्यातील नगरसुल येथील वडाचा मळा परिसरातील किशोर ओंकार सोनवणे (वय ४०), त्यांचा मुलगा ऋतिक किशोर सोनवणे (वय ११) आणि पुतण्या रवींद्र बाळू सोनवणे (वय २७) हे तिघे मोटारसायकलवर (एमएच १५ डीएफ ५२११) देवदर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून परतत असताना मनमाड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर मागून येणाऱ्या पिकअप गाडीने (एमएच १५ जीके ४३१२) त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, किशोर आणि ऋतिक यांचा जागीच मृत्यू झाला. तर रवींद्र गंभीर जखमी झाला. जखमी रवींद्रवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अस्तंबा यात्रोत्सवावर ड्रोन कॅमेऱ्याची करडी नजर

एकेकाळी ५ हजार रूपये कमावणारी अभिनेत्री आता आहे करोडोंची मालकीण

OBC Reservation : ओबीसी समाजाला मोठा धक्का! सरकारच्या ४२ टक्के आरक्षणाच्या निर्णयाला स्थगिती, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?

Govinda and Sunita Ahuja Divorce: मी खूप वेळा माफ केले, पण...; पत्नी सुनीतासोबतच्या डिव्होर्सच्या अफवांवर गोविंदाचा मोठा खुलासा

Nashik-Pune Highway ST Bus Accident: नाशिक-पुणे महामार्गावरील चंदनापुरी घाटात बसचा अपघात

SCROLL FOR NEXT