जालना सिंदखेड राजा महामार्गावरील देवमूर्ती गावाजवळ रस्ता रोको सुरूच...
समृद्धी महामार्गात बाधित शेतकरी महिलांसह रस्त्यावरच बसून...
जालन्यात समृद्धी महामार्गात बाधित होणारे शेतकरी आक्रमक,
जालना सिंदखेड राजा महामार्गार देवमूर्ती येथे शेतकऱ्यांचा रास्ता रोको.
रस्ता रोको आंदोलनात मोठ्या संख्येने महिला सहभागी...
मागील चार तासापासून जालना नांदेड समृद्धी महामार्गात बाधित शेतकऱ्यांचा रस्ता रोको सुरू आहे...
जालना नांदेड समृद्धी महामार्गात बाधित होणाऱ्या जमिनींना योग्य मोबदला देण्याच्या मागणी या शेतकऱ्यांची आहे...
आज आणि उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दरेगावात मुक्काम.
सातारा शहरात उद्या शिवसेनेच्या वतीने आयोजित केलेल्या मेळाव्याला लावणार उपस्थिती... या मेळाव्यानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक आणि विविध विकासकामांच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनासोबत बैठकीचे आयोजन
16 ऑक्टोबर रोजी ताराबाई पार्क येथील गोकुळच्या कार्यालयावर काढणार मोर्चा
गायी-म्हशी घेऊन दूध उत्पादक रस्त्यावर उतरणार
40 टक्के डिबेंचर कपात केल्याच्या विरोधात आंदोलन करणार
गोकुळच्या प्रशासनावर दूध उत्पादक शेतकरी नाराज
ज्येष्ठ करसल्लागार, चित्रपट निर्माते आणि साताऱ्याच्या साहित्य कला क्षेत्रातील व्यक्तिमत्व अरुण गोडबोले यांचे निधन.
अरूण गोडबोले यांचे चिंतामणी नर्सिंग होम येथे दु:खद निधन झाले आहे.आज संध्याकाळी ५.०० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली..
अहिल्यानगर महानगर पालिकेची अंतिम प्रभाग रचना अद्याप जाहीर नाही...
ड वर्गातील महानगरपालिकेचे अंतिम प्रभाग रचना जाहीर मात्र अहिल्यानगरची जाहीरना झाल्याने संभ्रम..
13 ऑटोबर होती प्रभाग रचना जाहीर होण्याची अंतिम तारीख...
दारुच्या नशेत कारची धडक दिल्याने अनेकजण गंभीर जखमी झालेत.
एक पेक्षा जास्त वाहनांना धडक दिली
याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी दखल घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे
रांजणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला
गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरणी शिवसेनेचे नेते माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह कोथरूड येथील उद्योजक समीर पाटील यांच्यावर आरोप करत आहे.
आत्ता या प्रकरणी उद्योजक समीर पाटील यांनी त्यांच्यावर होत असलेल्या आरोप प्रकरणी माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर ५० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.
० सुमारे पाच तास सुरु होते रस्ता रोको आंदोलन
० रस्त्यावर टायर जाळून आंदोलकांनी केला RCF प्रशासनाचा निषेध
० शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वा खाली झाले आंदोलन
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने सर्व जिल्हाध्यक्षांची अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार, आज वरळी डोम येथे जिलाध्यक्षांची बैठक पार पडणार आहे
अजित पवार आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने युती बाबत काय भूमिका जाहीर करणार याकडे लक्ष..
सातपूर गोळीबार प्रकरणात प्रकाश लोंढे आणि दीपक लोंढे यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी
न्यायालयात हजर केले असता देण्यात आली तीन दिवसांची पोलीस कोठडी, मुख्य आरोपी भूषण लोंढे अद्यापही फरार
- आरोपीकडून दोन दुचाकी, सोन्या चांदीच्या दागिन्यासह आठ गुन्हे उघडकीस आनले..
- दोन लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.. शेख आरिफ शेख शाकीर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे..
RCF कंपनी बाहेरील रस्त्यावर टायर जाळून शिवसेनेने केला RCF आणि जिल्हा प्रशासनाचा निषेध
शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली सुरु आहे आंदोलन
प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेणे, प्रदुषण, परिसरातील रस्ते आदी समस्यांविरोधात शिवसेना आक्रमक
बीडच्या केज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गेल्या अनेक तासापासून शेतकऱ्यांचा रस्ता रोको सुरू आहे. केज तालुक्यातील कोरडेवाडी येथे साठवण तलाव करण्याच्या मागणीसह शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी हा रस्ता रोको सुरू आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून साठवन तलावाच्या मागणीसाठी अनेक आंदोलने सुरू आहेत. तर कोरडेवाडी येथे 12 दिवसांपासून तरुणीचं आमरण उपोषण सुरू आहे.
हिंदू समाजातील बांधवांवर होत असलेल्या हत्याकाराच्या निषेधार्थ बीडमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आला आहे याच पार्श्वभूमीवर आज भाजप आमदार गोपीचंद पडळकर मिलिंद एकबोटे संग्राम बापू भंडारे हे बीडमध्ये दाखल झाले असून हिंदू विरुद्ध मुस्लिम संघर्ष निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे या पार्श्वभूमी वरती पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे
सोलापूरच्या रमाबाई आंबेडकर नगर, न्यू बुधवार पेठ परिसरात आज सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यशोदा सुहास सिद्धगणेश (वय ३५) या महिलेचा खून तिच्या पतीने केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
अतिवृष्टी व पूरग्रस्त भागात राज्य सरकारने मदत जाहीर केली त्या मध्ये जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुका हा वगळण्यात आला.
शासनाने मदतीसाठी जाहीर केलेल्या पहिल्या जीआर मध्ये जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुके बाधित असल्याचे दाखविण्यात आले होते त्यानंतर चोपडा व यावल तालुका वगळण्यात आला.
चोपडा तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेती पिकांच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याने देखील चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विरोधात सरकारने निर्णय का घेतला? असा प्रश्न उपस्थितीत करत शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलंय.
स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी यांना मिळालेले गोपनीय माहितीवरून वरला लासुर रस्त्याने गांजा घेऊन दोन इसम येत आहे .
ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव नितीननवरे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी वरला लासुर नाटेश्वर मंदिराजवळ ट्रॅप लावला असता.
वरला कडून लासुर मार्गाने चोपडाकडे येत असताना नाटेश्वर मंदिराजवळ मोटरसायकल थांबवून तपासणी केली असता त्यांच्याजवळ आठ किलो गांजा मोटरसायकल व मोबाईल असे दोन लाख 28 हजार 640 रुपयांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला.
चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे गांजा कुठून आणून कुठे घेऊन जात होता या संदर्भात तपास करण्यात येत असल्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी सांगितले.
धाराशिव -
शेतकऱ्यांच्या प्रशासनासाठी दिवाळी झाल्यावर राज्यव्यापी बैठक घेऊन आंदोलन उभारणार
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची मोठी घोषणा
असं आंदोलन उभा करावं लागेल की इथून पुढे अन् इथुन मागे 100 वर्षात अस अस आंदोलन कोणी केल नसेल - शेतकऱ्याच्या मागण्या मान्य करु घ्याव्या लागतील
मुंडक्यावरच पाय द्यावा लागेल नुसत वावरात फिरल्याने,भाषण केल्याने, चिखलात फिरल्याने शेतकऱ्यांचा उद्ध्वस्त झालेला संसार भरून निघणार नाही
पुणे -
निलेश घायवळ प्रकरणी उच्च न्यायालयात आता शुक्रवारी होणार सुनावणी
घायवळ ने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे रीट पिटीशन
उच्च न्यायालयात आज तीन गोष्टींवर झाला युक्तिवाद
निलेश घायवळ चां घायवळ टोळीशी काही संबंध नाही
घायवळ वर दाखल केलेली एफ आय आर रद्द करावी, घायवळ च्या वकिलांची न्यायालयाला विनंती
धुमाळ च्या पायाला गोळी लागल्याने ३०७ दाखल होत नाही, असा सुद्धा युक्तिवाद वकिलांनी केला
टोळीशी कुठला ही संबंध नसल्याचा वकिलांचा दावा
महाराष्ट्र बाईक टॅक्सी नियम, २०२५ साठी १७ ऑक्टोबरपर्यंत सूचना -हरकती करण्याचे आवाहन
अॅप बेसच्या वाहनांसाठीच्या महाराष्ट्र मोटर व्हेईकल ॲग्रीगेटरर्स नियम 2025 धोरणाबाबत प्रारुप नियमावली प्रसिद्ध झाली आहे.
या सदर प्रारुप नियमांच्या अधिसूचनेच्या अनुषंगाने १७ ऑक्टोबर २०२५ पर्यंत परिवहन आयुक्त कार्यालय, मुंबई यांच्याकडे हरकती, सूचना सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
महाराष्ट्र बाईक टॅक्सी नियम, २०२५ बाबत प्रारुप नियमांबाबत नागरिकांना आपल्या हरकती, सुचना प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांचेकडे rto. 12-mh@gov.in या ईमेल पत्त्यावर सादर कराव्यात
कल्याण -
काळ्यांच्या पत्री पूल ते नवीन गोविंदवाडी रस्त्यावर खड्यांचे साम्राज्य
कांग्रेस कडून खड्डेमय रस्त्याला केडीएमसी आयुक्तांच्या नावाचा फलक लावत केले आंदोलन
शिष्टमंडळाकडून आयोला प्रश्नांची सरबत्ती
आजच्या बैठकीत काही गोष्टी अनिर्णयीत
आमच्याकडे पुरावे आहेत
खोटे मतदार लाखांच्या घरात
याद्या दुरूस्त करा आणि फेरमतदान घ्या
जयंत पाटील यांची मागणी
महाविकास आघाडीची आजची पत्रकार परिषद रद्द
आज पत्रकार परिषद होणार नाही
उद्या पुन्हा ११ वाजता निवडणूक आयोगासोबत बैठक
राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांची माहिती
बदलापुरात वाहतूक सुरू असताना पथदिव्याचा खांब कोसळला
वडवली-मुरबाड हायवेवरील घटना
सुदैवानं मोठी दुर्घटना टाळली
रायगड -
अलिबाग येथील आरसीएफ कंपनीच्या गेटवर शिवसेनेचा रास्तारोको
प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्यासाठी आंदोलन
अलिबाग येथील आरसीएफ कंपनीच्या गेटवर शिवसेनेचा रास्ता रोको
140 प्रकल्प ग्रस्तांना आरसीएफच्या सेवेत सामावून घेण्यासाठी आंदोलन
पुणे -
समीर पाटील यांच्याकडून रविंद्र धांगेकर यांना ५० कोटीची अब्रु नुकसानची नोटीस
यापुढ मी त्यांना उत्तर देणार नाही
गुन्हेगारांना पाठीशी कोण घालत आहे.
त्यांनी सागर गवसने नावाचे इसम हा मक्कामधील आरोपी आहे.
माझी न्यायालयीन लढाई आहे.
बीड -
मंत्री छगन भुजबळ यांच्या महाएल्गार मेळाव्याचे छत्रपती शिवाजी महाराज चौकात होर्डिंग
होर्डिंगवर मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे, लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांचा फोटो.
बीडमधील महाएल्गार मेळाव्याला धनंजय मुंडे उपस्थित राहणार
कोल्हापूर येथील कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, अमोल काळे आणि शरद कळसकर यांना कोल्हापूर येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंच कडून जामीन मंजूर झालाय. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी आज पर्यंत एकूण 12 संशयित आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यापैकी 9 जणांना यापूर्वीच जामीन मंजूर झाला होता. मात्र डॉ. वीरेंद्र तावडे, अमोल काळे आणि शरद कळसकर या तिघांना जामीन मंजूर झाला नव्हता. जामीन न मिळाल्यामुळे तिघेही कळंबा कारागृहात होते. आज तिघांच्याही जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापुरातील सर्किट बेंच इथं सुनावणी झाली. यामध्ये तिघांनाही न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्यामुळे कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आजपर्यंतचे एकूण सर्वच 12 संशयीतांना आता जामीन मंजूर झाला आहे.
कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी 3 संशयित आरोपींना जामीन मंजूर
वीरेंद्र तावडे शरद कळसकर आणि अमोल काळे या तिघांना मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचने मंजूर केला जामीन
न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांनी मंजूर केला तिघांना जामीन
जळगावच्या सुवर्णनगरीत आज सोन्याच्या दराने विक्रमी उसळी घेतली असून जीएसटीसह दर प्रतितोळा तब्बल 1,31,000 वर पोहोचला आहे. केवळ एका दिवसात सोन्याच्या दरात तब्बल 4,000 ची झेप पाहायला मिळाली आहे.
सोन्यासोबतच चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली असून चांदीचा दर आता 1,96,000 प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे चांदी दोन लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचल्याचे चित्र दिसून येत आहे.
दरवाढीच्या पार्श्वभूमीवर दिवाळी आणि धनतेरसपूर्वी नागरिकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली आहे. वाढत्या भावांमुळे अनेक ग्राहकांनी दिवाळीची खरेदी आगोदरच उरकून घेतली असून शहरातील सराफ बाजारात आज दिवसभर प्रचंड उलाढाल झाल्याचे सराफ व्यावसायिकांनी सांगितले.
यु.एस.–चायना ट्रेड वॉर, तसेच जागतिक भू-राजकीय तणाव या घडामोडींचा थेट परिणाम सोने-चांदीच्या दरावर होताना दिसत आहे.
जळगाव सराफ बाजारात आजचे दर जीएसटीसह सोने 1,31,000 प्रति तोळा तर चांदी: 1,96,000 प्रति किलो वर आहे. सोन्याच्या दरातील या विक्रमी वाढीने जळगावच्या सुवर्णनगरीत पुन्हा एकदा चर्चेचा विषय निर्माण झाला आहे.
बुलढाणा जिल्ह्याच्या लोणार तालुक्यातील रायगाव येथील शेतकरी अर्जुन कोकाटे यांच्या तीन एकर शेतातील सोयाबीन गंजीला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची घटना घडली आहे .. या घटनेत सोयाबीन गंजी पूर्णपणे जळून खाक झालीय .. शेतकरी अर्जुन कोकाटे यांनी आपल्या तीन एकर शेतातील सोयाबीन कापून त्यांची गंजी लावलेली होती. मात्र रात्रीच्या वेळी कुणीतरी अद्न्यातने गंजीला जाळून टाकली आहे .. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे .. तर शेतकरी अर्जुन कोकाटे हे आठवडा भरपूर्वीच हॉस्पिटल मध्ये उपचार घेत आहेत. . तत्काळ पंचनामा करून आरोपीला अटक करावी आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे ..
शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी आणि सरसकट पंचनामे करावे यासह मागणीसाठी सांगलीच्या तासगाव मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात आले.जेसीबी,ट्रॅक्टर, बैलगाडी, शेळ्या-मेंढ्या घेऊन तासगावच्या एसटी स्टँड चौकात चक्काजाम करण्यात आले.आंदोलनाच्या माध्यमातून संजयकाका पाटलांनी राज्य सरकारने तातडीने कर्जमाफी करावी आणि सरसकट पंचमी करत शेतकऱ्यांची वसुली थांबवावी,अशी मागणी करत शेतकऱ्यांच्यासाठी सर्वसमावेशक राज्यव्यापी लढा उभारण्यात येईल,असं देखील जाहीर केले आहे.
० 140 प्रकल्पग्रस्तांना आरसीएफच्या सेवेत सामावून घेण्यासाठी आंदोलन
० शेकडो शिवसैनिकांनी अलिबाग रेवस रस्ता रोखून धरला
० आरसीएफ प्रकल्प ग्रस्तांच्या नोकरीचा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित
० दुसरीकडे आमदार महेंद्र दळवी यांची जिल्हा प्रशासना बरोबर चर्चा सुरू
० जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सुरू
पुणे पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांची माहिती
वैद्यकीय चाचणी करून हेमंत इनामे यांना अटक करण्यात आली
इनामे यांचे पोलिस दलातून निलंबन करण्यात येणार
इनामे यांनी दारूच्या नशेत वाहन चालवत ५ ते ६ वाहनांना दिली होती रविवारी धडक
- तोसीफ शेख यावर UAPA अंतर्गत ATS ने केली कारवाई..
- भारताच्या सार्वभौमत्व, एकात्मता, आणि सुरक्षा धोक्यात आणणाऱ्या व्यक्ती, गट किंवा संघटनांविरुद्ध कारवाई करण्यासाठी तयार केलेला दहशतवादविरोधी हा कायदा असून त्यानुसार हे कलम लावण्यात आले आहेत.
- मालेगाव न्यायालयात हजर करून त्यास हैदराबाद उच्च न्यायालयात हजर केले जाईल अशी माहिती मिळत आहे..
- देशविघातक किंवा दहशतवादी कारवाया करणं, आर्थिक संघटनांमध्ये सदस्यत्व घेणं किंवा अशा व्यक्तींशी संपर्क ठेवणं किंवा प्रचार करणं असे या कायद्यात असून त्यानुसार त्यावर कारवाई केली असल्याचे सांगण्यात येत आहे.
विरोधी पक्षनेते निवडणूक आयोगाच्या भेटीला गेले आहे. उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीचे अनेक नेते निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गेले आहेत.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीतील दुबार नावे वगळण्याची मागणी काँग्रेसने केलीय. याबाबत गंगापूरचे तहसीलदार नवनाथ वगवाड यांना निवेदन देण्यात आले. निवडणूक आयोगाने प्रारूप मतदार यादी जाहीर केली, त्या याद्यांमध्ये अनेक बुथवर एकाच मतदाराची नावे आढळून येत असल्याचे निदर्शनास आले आहे.
निवडणूक आयोग आणि गंगापूरचे तहसील प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन शुद्ध मतदार यादी तयार करण्याची मागणी काँग्रेस पक्षकडून होत आहे.
- सोलापुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर काँग्रेस पक्षाकडून स्वाक्षरी मोहीम करण्यात आला आंदोलन
- काँग्रेस पक्ष निरीक्षक मोहन जोशी, काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थित करण्यात आला आंदोलन.
- काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळेस वोट चोर गद्दी छोड म्हणत स्वाक्षरी करण्यात आली..
- काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली..
मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी मुळे सर्वसामान्य माणसाचे जनजीवन विस्कळीत झालेल आहे अनेकांची घर घरातील अन्नधान्य व गृह उपयोगी साहित्य कपडे सर्व पावसाच्या पुराच्या पाण्यात वाहून गेले. मुख्यमंत्री निधीत मदत म्हणून अमरावती येथील परंपरा गरबा ग्रुपच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना २१ लाखाचा चेक प्रदान करण्यात आला. यावेळी माजी खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा देखील उपस्थित होते गरबा चालवणाऱ्या एखाद्या ग्रुपने मुख्यमंत्री निधी मदत करणारा हा राज्यातील पहिलाच गरबा ग्रुप आहे.
26 प्रभाग निश्चित, एकूण 102 नगरसेवकांची निवड होणार...
24 प्रभागांमधून 4 नगरसेवक,इतर 2 प्रभागांमधून 3 नगरसेवक निवडले जाणार...
प्रारूप रचनेवर आलेल्या 38 हरकती आणि सूचना
सुनावणीनंतर 8 हरकती मान्य, 10 प्रभागांमध्ये फेरफार...
प्रभाग क्रमांक 6, 10, 11, 12, 14, 15, 16, 19, 20 आणि 21 मध्ये किरकोळ बदल...
काही बूथ इकडून तिकडे हलवले अथवा वाढवले
शहरातील तीन भाजप आमदारांच्या मतदारसंघात फेरफार...
विविध पक्षांचे पदाधिकारी आणि इच्छुक अंतिम रचना पाहण्यासाठी उपस्थित...
अंतिम आराखडा राज्य निवडणूक आयोगाकडे होणार सादर...
आयोगाची मंजुरी मिळाल्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता...
माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मराठा विरोधी भूमिकेवर मराठा क्रांती मोर्चा चे राज्य समन्वयक महेश डोंगरे यांनी जोरदार टीका केली आहे. धनंजय मुंडे यांनी मराठा समाजाच्या व नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. मराठा समाजाला मिळालेल आरक्षण हे त्याची पोटसूळ आहे. अलीकडेच धनंजय मुंडे यांनी वंजारा समाजाच्या मेळाव्यात मराठा समाजाला एका टक्क्याचे हे आरक्षण मिळो देणार नाही असे विधान केले होते. त्यावर आता मराठा क्रांती मोर्चाने आक्षेप घेत हल्लाबोल केला आहे.
शेतकरी कर्जमुक्ती व सरसकट पंचनामे सह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली तासगाव आणि कवठेमहांकाळ या ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे.जेसीबी,ट्रॅक्टर, बैलगाडी,शेळ्या मेंढ्यांसह तासगावच्या चौकात चक्काजाम सुरू झाले आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत चक्काजाम आंदोलन सुरू करण्यात आले आहे.शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे त्याचबरोबर जिल्ह्यातील अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून भरपाई मिळावी याचा विविध मागण्यांसाठी संजयकाका पाटलांकडुन आंदोलन करण्यात येत आहे.
सांगली जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडती पार पडल्या आहेत.61 जागांसाठी झालेल्या आरक्षण सोडत मध्ये असून 38 जागा खुल्या गटासाठी राखीव झाल्या आहेत.त्यामध्ये 19 जागा महिलांसाठी राखीव झाल्यात,तर 7 जागा अनुसूचित जाती गटासाठी आरक्षित झाले असून यामध्ये चार महिलांसाठी जागा राखीव झाली आहेत. तर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 16 जागा राखीव झाल्या असून यापैकी 8 जागा महिलांसाठी आरक्षित झाले आहेत.त्यामुळे जिल्ह्यातील अनेक दिग्गजांचा पत्ता कट झालाय तर अनेक नव्या उमेदवारांना संधी देखील मिळणार आहे.त्याचबरोबर जिल्हा परिषदे अध्यक्ष यंदा ओबीसी महिला गटासाठी राखीव झालाय,त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या गटांमध्ये 31 महिलांना संधी मिळणार असल्याने सांगली जिल्हा परिषदेमध्ये यंदा महिला राज पाहायला मिळणार आहे.
राज्यातील 12 हजार महसूल सेवकांनी आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले. महसूल मंत्री बावनकुळे यांची शिष्टाई यशस्वी, 16 ऑक्टोबर रोजी मुंबईत बैठक, समाधान होईल असा तोडगा काढण्याचे आश्वासन
अकोल्यात महापालिका निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीला मोठा झटका. पक्षाचे महापालिकेत 2012 आणि 2017 असे सलग दोनदा नगरसेवक असलेल्या बबलू जगताप यांचा भाजपात प्रवेश. काल अमरावती येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपच्या विभागीय मेळाव्यात हा प्रवेश. जगताप हे 10 वर्ष जठारपेठ-लहान उमरी भागातून विजयी होतायेत. त्यांच्या पक्ष प्रवेशाने या भागात भाजपला मोठा फायदा होण्याची शक्यता.
गेल्या अनेक वर्षांपासून लांबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता लवकरच होणार आहेत, कारण प्रशासनानं आरक्षण सोडत जाहीर केली आहे मात्र या निवडणुकीची तयारी करणाऱ्या अनेक भावी जिल्हा परिषद सदस्यांना आरक्षण सोडतीमुळे चक्क एक पाऊल मागे येण्याची वेळ आली आहे, हिंगोली जिल्ह्यात 52 जिल्हा परिषदेचे गट आहेत त्यापैकी 14 गटात ओबीसी उमेदवारांसाठी जागा राखीव झाले आहेत तर गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या अनेक उमेदवारांच्या जागेवर एससी एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे, आरक्षित जागेमुळे आता जिल्हा परिषदेसाठी नव्हे तर पंचायत समितीसाठी उभे राहू असे म्हणत भावी जिल्हा परिषद सदस्यांनी भावी पंचायत सदस्य म्हणून तयारी सुरू केली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लाडसावंगीमध्ये शेतीला विज मिळत नसल्याने संताप व्यक्त करीत शेतकऱ्यांनी उपकेंद्रात आंदोलन सुरू केलंय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनेक गावात वीजपुरवठा सुरळीत होत नसल्यानं शेतकरी, गावकरी त्रस्त झाले आहेत. रबी पिकाची पेरणी सुरू झाल्यानंतर १२-१२ तास वीजपुरवठा बंद असल्याने शेतीला पाणी देणे शक्य होत नाही, त्यामुळं शेतकरी संतप्त झाले आहेत. लाडसावंगी येथील उपकेंद्रातुन २२ गावाला विज पुरवठा होतो. शेतीला विज मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी रात्री बारा वाजेपासून उपकेंद्रात वीज बंद करून आंदोलन सुरू केले आहे. लाडसावंगी उपकेंद्रात एकूण चार फिटर आहे. मात्र अंजनडोह फिटरवर विज पुरवठा सुरळीत चालत नाही.
महाराष्ट्र सागरी मंडळाच्या संचालक मंडळाची ८५ वी बैठक आज दिनांक १३ ऑक्टोबर २०२५ रोजी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा महाराष्ट्र सागरी मंडळाचे अध्यक्ष श्री.नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील महाराष्ट्र सागरी मंडळाच्या कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीत महाराष्ट्र सागरी मंडळाच्या आस्थापनेवरील तसेच बाह्ययंत्रणेद्वारे नियुक्त (कंत्राटी) कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा यावेळी मंत्री नितेश राणे यांनी केली.
ग्रामीण भागातील महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
यापुढे राज्यातील सर्व तलाठ्यांना आठवड्यातील चार दिवस कार्यालयात आणि एक दिवस मंडल अधिकारी यांच्या कार्यालयात उपस्थित राहून काम करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
13 ऑटोबर होती प्रभाग रचना जाहीर होण्याची अंतिम तारीख...
प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर हरकती आणि सूचना जिल्हा अधिकाऱ्यांकडे प्राप्त झाल्यानंतर अंतिम प्रभाग रचना जाहीर होण्याकडे लागले होते आजी माजी भावी नगरसेवकांचे लक्ष...
निवडणूक आयोगाने मुदत संपूनही अंतिम प्रभाग रचना जाहीर न केल्याने चर्चेचा विषय...
महापालिकेचे आयुक्त, उप आयुक्त,आणि इतर अधिकारी मुंबईत मात्र प्रभाग रचना जाहीर का करण्यात आली या बाबत प्रश्नचिन्ह
अनुकंपा नोकरी देण्यात यावी, त्यांच्या आईचे घर पूर्वीप्रमाणे त्यांनाच देण्यात यावे, मनपाचे विधी अधिकारी श्रीकांत चव्हान, क्षेत्रीय अधिकारी नरेंद्र देवरणकर यांना सेवामुक्त करण्यात यावे यासाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ शांताबाई उकर्डा आणि त्यांची मुलगी विजया उकर्डा यांचे उपोषण चालू होते, मात्र 75 वर्षीय शांताबाई उकर्डा या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने खळबळ उडाली
जालना जिल्हा परिषदेच्या 57 गटांसह पंचायत समितीच्या 114 गणाची आरक्षण सोडत जाहीर झालीय. आरक्षण सोडतीमध्ये अनेक भावी उमेदवारांचा हिरमोड झाला आहे.जालना जिल्हा परिषदेवर महिलाराज येणार असून एकूण 29 जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. जालना जिल्हा परिषदेसाठी ओबीसी 15, एससी 8, एसटी 1 तर सर्वसाधारणसाठी 33 जागा निश्चित करण्यात आल्या आहे. तर जालना जिल्ह्यातील पंचायत समितीच्या 114 गणांची आरक्षण सोडत देखील जाहीर करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सिडकोच्या घराच्या किमती करण्यासंदर्भामध्ये बैठक आयोजित करणार होते..मुख्यमंत्री नवी मुंबईमध्ये आल्यानंतर पंधरा दिवसात सिडकोच्या घरांच्या किमती करण्यासंदर्भामध्ये बैठक लावू असे आश्वासन माथाडी कामगारांना देण्यात आलं होतं. मात्र सिडकोच्या घराच्या किमती करण्यासंदर्भामध्ये सिडको आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून अद्याप कोणताही निर्णय न घेतल्यामुळे सिडकोची लॉटरी आता लांबणीवर पडली आहे..
धाराशिव जिल्ह्यात यंदा रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला चार महिने झालेला पावसामुळे खरीप हंगामाचे अतोनात नुकसान झाले तर दुसरीकडे प्रकल्प मात्र तुडुंब भरले आहेत. मागील 27 वर्षात पहिल्यांदाच जिल्ह्यातील 204 प्रकल्प डबडबून गेले आहेत.प्रकल्पात 93% उपयुक्त पाणीसाठा असल्याने रब्बीचा पेराही यंदा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.शिवाय जिल्ह्यातील 350 गावांना उन्हाळ्यात टंचाई देखील भासणार नाही.मे महिन्यात बहुतांश महसूल मंडळात अतिवृष्टी झाली त्यामुळे नदी -ओढे उन्हाळ्यातच प्रवाहित झाले होते.त्यानंतर जून व जुलै महिन्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला मात्र ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात धुवाधार पाऊस पडत राहिला परिणामी नदी,ओढे पात्र सोडून वाहत होते.प्रकल्प क्षेत्रात मोठा पाऊस झाल्याने प्रकल्पात पाणी वाढले.
रायगड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोबत घेणार नाही, असं ठासून सांगणाऱ्या शिवसेनेने रायगड जिल्ह्यात आपला सूर बदलला आहे. जिल्हा परीषद आणि पंचायत समिती निवडणूका महायुतीमधूनच लढायच्या अशी सामंजस्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. मात्र त्याचवेळी जागावाटपाचा फॉर्म्युलाही त्यांनी समोर आणला आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर पक्षाचे मंत्री, आमदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत यावर चर्चा झाली. जिल्ह्यात शिवसेना भाजपचे प्रत्येकी तीन तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा केवळ एक आमदार आहे. जिल्हा परीषदेच्या 59 जागांचे वाटप पक्षाच्या आमदाराच्या संख्येनुसार करायचे. असा शिवसेनेचा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव त्यांनी महायुती समोर मांडण्याचा निर्णय घेतलाय. आता शिवसेनेचा हा प्रस्ताव घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी कॉंग्रेस मान्य करेल का, हा खरा प्रश्न आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने ११४ व्या वर्धापन दिनानिमित्त यंदा कर्मचाऱ्यांना १४ टक्के बोनस केला जाहीर
गेल्या दोन दशकांतील हा सर्वोच्च बोनस ठरला असून, यंदाची दिवाळी अधिक गोड करण्यासाठी प्रशासनाचा निर्णय
राज्य बॅंकेच्या मुख्य कार्यालयात आयोजित वर्धापन दिन सोहळ्यात प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी हा निर्णय जाहीर केला
बँकेचा स्वनिधी आठ हजार चारशे कोटी रुपयांच्या वर गेल्याने आशिया खंडातील सर्वात सक्षम राज्य बँक म्हणून बँकेने नावलौकीक प्राप्त केला आहे
मागील चार वर्षांपासून रखडलेला रायगड जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा अखेर पार पडला. 60 हून अधिक प्राथमिक शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मंत्री भरत गोगावले, मंत्री आदिती तटकरे तसेच आमदार महेंद्र दळवी यानिमित्ताने एकाच व्यासपीठावर पहायला मिळाले.
मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या यवतमाळ जिल्हा परिषदेच्या 62 गटांच्या आरक्षणाची सोडत जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना भवनात काढण्यात आली यात काही प्रस्थापितांना धक्का बसला असून काहींना मात्र लॉटरी लागली आहे.सदर आरक्षण हे प्रारूप असल्याने 14 ते 17 ऑक्टोबर पर्यंत विभागीय आयुक्ताकडे आक्षेप दाखल करता येणार आहे. अनुसूचित जाती सात, अनुसूचित जमाती 14 नामाप्र 16 आणि सर्वसाधारण साठी 25 जागा सोडवण्यात आल्या आहेत.
आज मंगळवारी दुपारी 12.30 वाजता सर्वपक्षीय नेत्यांचे शिष्टमंडळ राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेणार आहे. लोकशाही बळकट व्हावी आणि निवडणूक यंत्रणेवरील विश्वास अधिक दृढ व्हावा यासाठी शिष्टमंडळ आयोगासोबत चर्चा करणार आहे.
कुठल्याही योजना बंद करण्याचा आमचा विचार नाही, सर्व योजना आम्ही चालवणार आहोत. नैसर्गिक आपत्तीच्या संकटामुळे एक मोठा भार राज्यावर पडला आहे, मात्र तरीही आम्ही कुठलीही योजना थांबवलेली नाही.देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री महाराष्ट्र
नाशिकच्या मालेगाव मध्ये एटीएस व तेलंगणा पोलिसांनी संयुक्त पणे कारवाई करत तोशिफ शेख या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे तोशिफ हा सोशल मीडियाच्या माध्यमातून परदेशातील काही संघटना व संशयित व्यक्तींच्या संपर्कात असल्याचा गंभीर संशय असून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून,सुरक्षा यंत्रणेकडून याप्रकरणी गोपनीयतेने तपास करण्यात येत असून त्याच्या मोबाईल मधील डेटा,सोशल मीडिया अकाउंट तपासला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे,या प्रकरणात पोलिसांकडून पूर्ण माहिती नसली तरी या घटनेमुळे मालेगाव शहरात खळबळ उडाली आहे.
घायवळ च्या पासपोर्ट प्रकरणी अहिल्यानगर पोलिसांची होणार चौकशी
पासपोर्ट व्हेरिफिकेशन रिपोर्ट वर "not available" असा शेरा दिल्याप्रकरणी होणार चौकशी
घायवळ ने दिलेल्या खोट्या प्रतिज्ञापत्र आणि कागदपत्रांची शहानिशा का केली नाही असा प्रश्न अहिल्यानगर पोलिसांना विचारला जाण्याची शक्यता
अहिल्यानगर पोलिस दलातील कर्मचारी आणि अधिकारी यांची चौकशी होणार
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.