बिबट्याच्या वाढत्या संख्येमुळे बिबट माणुस संघर्ष वाढत असताना अपु-या पिंज-यांमुळे वनविभागही हतबल झालंय एका महिन्यात बिबट्याने दोन चिमुकल्यांचा बळी घेतलाय तर अनेकांना जखमी केल्याच्या घटना घडल्या असुन पाळीव प्राण्यांवरील हल्ले सुरुच असल्याने नागरिकांचा रोष वाढत असल्याने माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी २०० नवीन पिंजरे तात्काळ उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं असून, बिबट्यांची नसबंदी हाच दीर्घकालीन उपाय असल्याचंही मत व्यक्त केलं आहे.
कल्याणच्या सापड गावातील एका स्मशानभूमीचा व्हिडिओ व्हायरल झालाय. ज्यामध्ये दिसत आहे की एका दुचाकीच्या हेडलाईटच्या प्रकाशात अंत्यविधी केला जात आहे. या स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता नाही. स्वच्छतेसाठी पाणी नाही. त्या ठिकाणी लाईट नाही. दुचाकीच्या हेडलाईटच्या प्रकाशात अंत्यविधी करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.
विशेष म्हणजे हे गाव शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या घरच्या काही अंतरावर असणारे गाव आहे. विश्वनाथ भोईर हे दोन वेळा शिवसेने तर्फे निवडून आले आहेत. केडीएमसी कडे वारंवार पाठपुरावा करून देखील. ही दुरावस्था असल्याची बाब उघड झाली आहे.
हनुमान मंदिरात महाप्रसाद तयार करण्याचं काम सुरू असताना कुकरचा अचानक स्फोट झाल्यानं 14 जण जखमी झाले असून त्यातील 6 जणांची प्रकृती गंभीर असल्याची घटना घडली आहे. घटना भंडारा शहरातील बाबा मस्तानशहा वार्डातील हनुमान मंदिरात आज सायंकाळच्या सुमारास घडली. सर्व गंभीर जखमींवर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. जखमींमध्ये चार पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. परवेज शेख, भावेश खंगार, रितेश साठवणे, आशिष गणविर, ज्योति नान्हे, विकी गणवीर, साधना गणवीर,
गिता आंबुलकर, माया मारवाडी, चिऊ मारबाडे, सविता साठवणे यांच्यासह अन्य यांचा जखमींमध्ये समावेश आहे.
ऐन दिवाळीत आनंदाचा शिधा बंद
गरिबांचा सणाचा आनंद हरपला
गरिबांनी महागाईच्या काळात सण
साजरे करायचे कसे? गृहिणींचा सरकारला सवाल
ओवेसी आणि त्यांचा परिवार हे पागल कुत्र्यासारखे लोक आहेत.
ओवेसी वर टीका करताना मंत्री आकाश फुंडकर यांची जीभ घसरली.
मोहन भागवत हे सूर्यासारखे तेजस्वी त्यांच्यावर बोलणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे.
पवार कुटुंबीयांकडे यंदा दिवाळी साजरी होणार नाही
बारामती मध्ये यंदा पवार कुटुंबियांचा दिवाळी पाडवा साजरा होणार नाही
शरद पवार आणि संपूर्ण कुटुंबीयांकडे यंदा दिवाळी साजरी केली जाणार नसल्याची माहिती
या वर्षी प्रतापराव पवार यांच्या पत्नी यांचं निधन झाल्यामुळे पवार कुटुंबीयांनी घेतला दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय
जयंत पाटील, काँग्रेस आमदार विश्वजीत कदम आणि सांगलीचे खासदार विशाल पाटील यांच्यात बंद दाराआड चर्चा
वसंतदादा शुगर इन्स्टिटयूटमध्ये कारखानदारांची बैठक संपल्यावर तिन्ही नेत्यांमध्ये बैठक
गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांवर केलेल्या टिकेनंतर सांगलीत निघालेल्या मोर्चात खासदार विशाल पाटील सहभागी झाले होते
मात्र याच मोर्चाच्या सांगता सभेत विशाल पाटलांनी जयंत पाटलांवर अप्रत्यक्ष टीका केली होती
"आपण कुठलेही काम शंभर टक्केच करतो, अन्यथा करत नाही" उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शरद पवारांसमोर जोरदार भाषण
ऊस लागवडीवर बोलताना अजित पवारांचे भाष्य
"जयंत पाटील राजेश टोपे तुम्ही देखील शंभर टक्के लागवड करा. आपण केलं तरच लोकांना सांगू शकतो
राज्यातील आठ साखर कारखान्यांना केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी मदत करण्याचं सांगितल आहे
कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली इथल्या श्री विठ्ठल बिरूदेव यात्रेचा आज मुख्य दिवस आहे. यात्रेनिमित्त हजारो भाविक या विठ्ठल बिरूदेवाच्या दर्शनाला येत असतात. या यात्रेच्या काळात हेडाम नृत्य, गजी नृत्य, धनगरी ढोल वादन होतं असतं. भंडाऱ्याची उधळण करत बिरोबाच्या नावानं चांगभलंचा गजर या यात्रेत असतो. या यात्रेची भाकणूक प्रथा प्रसिद्ध आहे.
पश्चिम रेल्वेच्या विरार रेल्वे स्थानकाजवळ विद्युत पुरवठा बंद झाल्याने डहाणू पर्यंत धावणाऱ्या लोकल सेवेवर परिणाम . विरार आणि वैतरणा दरम्यान विद्युत पुरवठा बंद झाल्याने वाहतूक खोळंबली . विद्युत पुरवठा बंद झाल्याचे कारण अस्पष्ट. डहाणूसाठी 3:45 ची सुटलेली लोकल वैतरणा रेल्वे स्थानकाजवळ अडकून पडली . डहाणूपर्यंत धावणाऱ्या लोकल चा खोळंबा . लांब पल्यांच्या गाड्यांवर ही परिणाम
हुंडा घेणारे नामर्द असल्याचं परखड मत मराठी चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केलंये. जर स्त्री जर टिकली नाही तर, समाज कसा टिकेल?, असा सवाल त्यांनी यावेळी केलाय. ते आज अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातल्या निंबा फाटा येथे एका सभेत बोलत होतेय.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी घेतलेल्या प्रखर हिंदूत्वाच्या मुद्द्यावरून तसेच दिवाळीत केवळ हिंदूंकडून खरेदी करा या वक्तव्यावरून अजित पवारांनी संग्राम जगताप यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे याबाबत विचारले असता आमदार संग्राम जगताप यांनी बोलणं टाळलं आहे... या संपूर्ण प्रकरणाबाबत अजित दादांशी सविस्तर चर्चा करू एवढंच जगताप यांनी म्हटले आहे...
मुंबई - सोलापूर विमानसेवेचे पहिले प्रवासी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार सोलापूरला, पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांनी दिली माहिती
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात केळीच्या बाजारभावात प्रचंड चढ-उतार होत आहे, गेल्या महिनाभरात तर भाव कोसळून शेतकऱ्यांचे गणित पूर्णपणे बिघडले आहे, पूर्वी 40 हजार रुपये टनावर पोहोचलेले भाव आता 28 हजार रुपये टनावर येऊन पोहोचला असल्यामुळे केळी उत्पादका शेतकऱ्यांना लाखोंचे नुकसान सहन करावे लागत आहे,
163 कारखान्याचे प्रमुख पदाधिकारी आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या संचालक मंडळाची बैठक
बैठकीत पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या पिकांच्या आढावा घेतला जाणार
बैठकीला माजी मंत्री बाळासाहेब थोरात राजेश टोपे वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये दाखल
नाशिकच्या मालेगाव महानगर पालिकेच्या स्वछता कर्मचाऱ्यांना आज शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते दिवाळी भेट देण्यात आली,साडी व मिठाई अशी भेट दिवाळी सणानिमित्त या कर्मचाऱ्यांना देण्यात आली,यावेळी झालेल्या कार्यक्रमात भुसे यांनी दिवाळी नंतर रस्त्यावर असलेल्या हातगाडी,टपरी धारकांना शिस्त लावावी अशा आदेश वजा सूचना महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या तर दिवाळी पूर्वी या सर्व कर्मचाऱ्यांना सानुग्रह मदत त्यांच्या खात्यात पोहचली पाहिजे अशा सूचना महापालिका आयुकताना दिल्या,यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी मोठ्या संख्येने स्वछता कर्मचारी सहभागी झाले होते
सरकारने मराठा समाजासाठी हैदराबाद गॅझेट लागू केले असेल तर ते वंजारी समाजासाठी देखील लागू करावे या मागणीसाठी बीड शहरातील संत भगवान बाबा चौकामध्ये आंदोलन करण्यात आले.. यावेळी सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली तसेच सरकारने मागणी मान्य नाही केली तसेच वंजारी समाजासाठी स्वतंत्र महामंडळ जाहीर नाही केले तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील आंदोलकांनी दिला..
जालन्यातील घनसांवगी तालुक्यातील ढोबळेवाडी ते रांजणी रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे.रस्त्यावर चिखल झाल्याने शाळकरी विद्यार्थ्यांसह महिलांचे हाल होत आहे, या रस्त्यावरून दुचाकी वर सोडा पायी देखील चालणं कठीण झाला आहे. ग्रामस्थांनी वारंवार प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधीला याबाबत निवेदन दिले आहे मात्र कोणीही दखल घेतली नाही. दरम्यान हा रस्ता लवकरात लवकर बनवून द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहेत..
गणित आणि विज्ञान विषयातील प्रत्येक विद्यार्थ्याचे पायाभूत ज्ञान दृढ करण्यावर शासनाने भर दिला आहे. या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासनामार्फत ‘डॉ. जयंत नारळीकर गणित आणि विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम’ राबविण्यासाठी खान अकॅडमीसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. वैज्ञानिक दृष्टीकोन आणि कुतूहल यांचा वारसा विद्यार्थ्यांमध्ये रुजविणारे प्रख्यात वैज्ञानिक डॉ.जयंत नारळीकर यांच्या सन्मानार्थ हा उपक्रम राबविला जात असून सुमारे 50 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल.
जालना शहर महानगरपालिका निवडणुकीमध्ये महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे संकेत भाजप नेते कैलास गोरंट्याल यांनी दिले. जालना शहरामध्ये भाजपाची ताकद आहे. त्यामुळे जालना शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 99% मैत्रीपूर्ण लढत होईल अशी प्रतिक्रिया गोरंट्याल यांनी दिली आहे. जालना शहर महानगरपालिकेमध्ये 35 पेक्षा अधिक नगरसेवक भाजपाचे निवडून येणार असून पहिला महापौर देखील भाजपचाच होईल असा विश्वास कैलास गोरंट्यांनी व्यक्त केला आहे.दरम्यान जालना शहर महानगरपालिकेमध्ये निवडून येणारे चेहरे फक्त भाजपकडे आहे
ठाकरे बंधूंमध्ये गेल्या काही दिवसांपासून गाठीभेटीचं प्रमाण वाढलं असल्याचं चित्र आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे. नुकतेच मनसे प्रमुख राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झाले आहेत. दोन्ही बंधूंमध्ये राजकीय चर्चा होणार का? याकडे सर्वांचेच लक्ष आहे.
अजित पवार यांच्याकडून PDDC बँकेची पाहणी
PDCC बँकेने खरेदी केलेल्या नव्या जागेची आणि जुन्या इमारतीची अजित पवारांनी केली पाहणी
थोड्याच दिवसात PDCC बँकेच्या नवीन इमारतीच्या कामाला होणार सुरुवात
काही दिवसांपूर्वी PDCC बँकेकडून नव्या जागेची करण्यात आली आहे खरेदी
नव्या इमारतीच्या बांधकामाबद्दल अजित पवारांनी संचालकांना दिल्या सूचना
बोरिवली (प.) येथील ओल्ड एमएचबी कॉलनी परिसरात शनिवारी दुपारी एका महिलेवर भटक्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून, तिला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अहिल्यानगर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अत्यंत खालच्या पातळीवर लिखाण करून ती पत्रके नगर शहराच्या माळीवाडा एसटी स्टँड भागात फिरवण्यात आली होती या प्रकरणाचा पोलिसांनी तपास करत एका आरोपीला ताब्यात घेतले आहे या घटनेच्या निषेधार्थ आजअहिल्यानगर शहरात आज जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे या मोर्चाला भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर आमदार संग्राम जगताप सागर बेग यांच्यासह विविध हिंदू आणि दलित संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. दोन दिवसांपूर्वी आमदार संग्राम जगताप यांनी करमाळा येथे बोलताना दिवाळीचे खरेदी करताना हिंदू व्यवसाय करून खरेदी करावी असे आव्हान भाषणात बोलताना केले होते यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार संग्राम जगताप यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार असल्याचे सांगितले होते तर आज आमदार गोपीचंद पडळकर यांनी आम्ही आमदार संग्राम जगताप यांच्या पाठीशी असून संग्राम जगताप यांच्यासोबत आम्ही कालही होतो आजही राहणार आणि पुढेही राहणार असल्याचं स्पष्ट केल आहे. त्यामुळे भाजपकडून आमदार संग्राम जगताप यांना क्लीन चीट दिल्याचे दिसून येत आहे.
ठाणे शहरातील पाणी समस्या, वाहतूक कोंडी समस्या व रस्त्यातील खड्यांच्या प्रश्नांना अनुसरून उद्या मनसेचा व ठाकरेंच्या शिवसेनेचा ठाण्यात मोर्चा निघणार आहे.. हा मोर्चा गडकरी रंगायतन ते थेट ठाणे महानगर पालिकेवर धडकणार आहे.. या मोर्चाची दोन्ही पक्षांकडून सध्या जय्यत तयारी पाहायला मिळते.. ठाणे महानगरपालिका मुख्यालयासमोर सध्या कार्यकर्त्यांकडून या मोर्चाची बॅनरबाजी करण्यात आली आहे या बॅनरवर राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांचा एकत्र फोटो लावण्यात आला आहे सोबतच आदित्य ठाकरे व अमित ठाकरे यांचा देखील फोटो लावण्यात आलेला आहे शिवसेना व मनसेचा धडक मोर्चा येतोय अन्यायाला गाढायला असा मजकूर देखील या बॅनरवर लिहिण्यात आला आहे.
नाशिकच्या लासलगाव येथील परमपूज्य भगरी बाबा मंदिरात सालाबादप्रमाणे परिसरातील गोरगरीब जनतेसाठी दिवाळी गोड व्हावी या उदत्त हेतूने सहा दिवशीय माणुसकीची भिंत हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमाला परिसरातून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.परिसरातील गोरगरीब गरजू व्यक्तींना सर्व प्रकारच्या कपड्यांचे वाटप सेवा सुरू झाले आहे पंचक्रोशीतील अनेक गरजू या सेवेचा लाभ घेत आहे. तुम्हाला नको असेल ते देऊन जा व जे पाहिजे असेल ते घेऊन जा, या उपक्रमाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मदत या ठिकाणी जमा करत आहे,यामध्ये सामाजिक कार्यकर्ते निस्वार्थपणे सेवा देत आहे. या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी दूरवरून गोरगरीब या योजनेचा लाभ घेत आहे
मालवणी परिसरातील फेरिवाल्याकडून हप्ता घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चौकशीत दोषी ठरलेल्या चार पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. निलंबित पोलिसांमध्ये पोलिस उपनिरीक्षक प्रदीप कदम, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय राठोड, पोलिस शिपाई विकास माळी आणि पोलिस शिपाई चालक महेंद्रकुमार मराळ यांचा समावेश आहे.
या घटनेमुळे पोलिस दलाची प्रतिमा मलिन झाली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कठोर कारवाई केली आहे. या चौघांना निलंबनाची नोटीस देण्यात आली असून, या कारवाईमुळे संपूर्ण दलात खळबळ उडाली आहे.
जालन्यात धुळे - सोलापूर महामार्गावरील दुनगाव फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेय.अतिवृष्टीने बाधित झालेल्या पिकांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्यावि, तसेच ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी या मागणीसाठी अंबड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने हा रास्ता रोको आंदोलन करण्यात आलाये,यावेळी या महामार्गावर वाहनाच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या आहेत..
श्रीरामपूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या परिसरात एका युवकावर दोन जणांनी कोयत्यांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.. या हल्ल्यात शाहरुख सय्यद नावाचा युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.. हल्ल्याची ही घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.. हा प्राणघातक हल्ला नेमका कोणत्या कारणातून झाला? हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.. मात्र श्रीरामपूर शहरात वाढत्या गुन्हेगारीने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे..
देहुरोड थॉमस कॉलनी येथील तीन तरुण मुले काल दुपारी एक वाजताच्या सुमारास गंहुजे येथील पवना नदी ठिकाणी पोहण्या साठी गेले होते. त्यांच्या सोबत याच भागात राहणारा वीस वर्षाय रोहन रॉय हा देखील होता. मात्र पाण्यात पोहत असताना नदी पात्रातील खोलीचा अंदाजां न आल्याने पोहता पोहता अचानक रोहन दिसेनासा झाला त्याला शोधण्या साठी त्याच्या इतर मित्रांनी प्रयत्न केले. परंतु तो मिळून आला नाही या घटनेची माहिती शिरगाव परदंवडी पोलिस ठाणे तसेच वन्यजिव संरक्षण संस्था यांना देण्यात आली. शोध पथकाने घटना स्थळावर दाखल होत तीन तास प्रयत्न करून रोहन चा मृतदेह पाण्या बाहेर काढला शिरगाव पोलिसांच्या मदतीने मृतदेह पिंपरी येथील YCM रुग्नाल्यात पाठविण्यात आला. असं परंदवाडी पोलीस अधिक तपास करीत आहे...
इंटरपोल ने जारी केली घायवळ विरोधात ब्लू कॉर्नर" नोटीस
पुणे पोलिसांकडून इंटरपोल शी पत्र व्यवहारानंतर नोटीस जारी
फौजदारी गुन्ह्यांत सहभागी असलेल्या व्यक्तींची तपासासाठी अतिरिक्त माहिती, ओळख, ठावठिकाणा मिळावा यासाठी ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली जाते
घायवळ चा शोध घेण्यासाठी आता पुणे पोलिसांना इंटरपोल ची मदत
दि इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ॲार्गनायझेशन म्हणजेच ‘इंटरपोल’ या नावाने ही यंत्रणा ओळखली जाते
आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध देशांमधील पोलीस आणि गुन्हेगारांच्या माहितीची अंतर्गत सहकार्य या तत्त्वावर यंत्रणेचे काम चालते
घरफोडी करत व्यापाऱ्याच्या घरातून मोठ्या प्रमाणात सोन आणि रोकड लंपास झाल्याची माहिती
संपूर्ण घटनेचा CCTV आला समोर
घराच लॉक तोडत चोरट्यांनी मारला डल्ला
मार्केट यार्ड पोलीस स्टेशन मध्ये २ आरोपींविरोधात गुन्हा दाखल
शुक्रवारी पहाटे ३ वाजल्याची घटना
मुंबईतील रेल्वे प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) उद्या तांत्रिक कामांसाठी बंद राहणार आहे. रविवारी रात्री ११.४५ ते सोमवारी पहाटे ५.४५ पर्यंत पीआरएस सेवा, कोचिंग रिफंड सेवा, आयव्हीआरएस, चालू आरक्षण, चार्ट डिस्प्ले, टच स्क्रीन आणि रिफंड काउंटर उपलब्ध नसतील. प्रवाशांना परतावा विद्यमान नियमांनुसार दिला जाईल. यासाठी टीडीआर जारी केला जाईल.
माझं नाव घेतल्याशिवाय काही जणांना जेवण जात नाही, जिल्ह्यातील शुल्लक राजकारण सोडून द्या, विरोधक बोंबलून बोंबलून किती बोंबलतील त्यांना बोंबलू उद्या,माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.नांदेडच्या हदगाव तालुक्यातील वाळकी येथे भाजप पदाधिकारी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी खासदार अशोक चव्हाण यांनी विरोधकांवर हल्ला चढवला. दरम्यान यावेळी खासदार अशोक चव्हाण यांनी जिल्ह्यातील राजकारणावर स्पष्टपणे भाष्य केले असून, ते म्हणाले, "इथले जे क्षुल्लक राजकारण चालते, त्याला सोडून द्या. जिल्ह्यात 'खऱ्याला खोटं आणि खोट्याला खरं' ठरवण्याचा कार्यक्रम सुरू आहे.जिथे चांगले चालले त्याला वाईट म्हणायचे आणि वाईट गोष्टींना चांगले म्हणायचे अशी स्थिती आहे.नकारात्मक कामांमध्ये आपल्याला कोणताही रस नसल्याचे सांगत, "सकारात्मक गोष्टीला आपण प्रतिसाद दिला पाहिजे," अशी भूमिका चव्हाण यांनी मांडली. "माझा जिल्हा महाराष्ट्रातील टॉप टेन मध्ये राहिला पाहिजे ही माझी भावना आहे." यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला."काही लोकांना माझे नाव घेतल्याशिवाय जेवण जात नाही, ही त्यांची अडचण आहे." मात्र, आपण त्याची कधीही फिकीर करत नाही. "ज्याला काय बोलायच ते बोलू द्या, बोबलून बोबलून किती बोलतील," अशा शब्दांत त्यांनी विरोधकांच्या टीकेला दुर्लक्षित केले.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने बंद केला पब
बॉम्बे प्रोहिबीशन अॅक्ट मधील कलम ११.३ नुसार व शासन धोरणानुसार रात्री १:३० वाजल्यानंतर कुठल्याही लायसेन्स धारक आस्थापनांमध्ये मद्य विक्री करण्यास मनाई आल्याचा मनसे चा दावा
रात्री दीड नंतर " टॅायरुम " या पब मध्ये पहाटे ३ पर्यंत उघडपणे मद्य विक्री होत असल्याचा आरोप मनसे ने केला आहे
गेमींग अॅपच्या माध्यमातून आठ कोटी 63 लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या करळगाव येथे उघडकीस आलाय या प्रकरणात यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी आंतरराज्यीय टोळीतील सहा आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल केले असून घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी याबाबतचा तपास एलसीबीकडे सोपविला आहे.
विधानसभा निवडणुकीत युतीचा धर्म न पाळता शिवसेनेचे सांगोल्याचे उमेदवार शहाजी पाटील यांच्या विरोधात काम करून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार बाबासाहेब देशमुख यांना निवडून आणल्याची जाहीर कबुली पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
सांगोल्यात शेकापच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी मी पालकमंत्री नव्हतो तरी तुम्हाला निवडून आणण्यासाठी मदत केली,अशी टिप्पणी शेकापचे आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांना उद्देशून केली होती. त्यावर शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी ही पलटवार केला आहे. भाजपने माझा पराभव केला नाही. परंतु
पालकमंत्री जयकुमार गोरे हे भावनेच्या भरात बोलून गेले असतील असा टोलाही त्यांनी लगावला. आगामी 2029 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा सांगोल्यात आमदार निवडून येईल असा दावा ही पाटील यांनी केला आहे.
जालना जिल्ह्यातील 724 रिक्त पोलीस पाटील पदांसाठी आज पोलीस पाटील भरती परीक्षा पार पडणार आहे.24 परीक्षा केंद्रावर हि परीक्षा पार पडणार असून 8 हजार 161 परीक्षार्थीं पोलीस पाटील भरती परीक्षा देणार आहेत.परीक्षेतील गैरप्रकाराला आळा बसण्यासाठी प्रत्येक परीक्षार्थींची व्हिडिओग्राफी केली जाणार आहे.पोलिस पाटील भरती परीक्षा शहर आणि परिसरातील 24 परीक्षा केंद्रांवर पार पडणार असून परीक्षेसाठी पात्र उमेदवाराची मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी केली जाणार आहे. तर प्रत्येक परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवली जाणार आहे..
यवतमाळ जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानातून दिली जाणारी साखर गत सहा महिन्यांपासून गायब झाली असून किमान दिवाळीला तरी साखर मिळेल अशी ग्राहकांना अपेक्षा होती. प्रत्यक्षात ग्राहकांच्या अपेक्षा वर पाणी फेरण्याचे काम शासनाच्या धोरणाने झाले आहे.यामुळे दिवाळीला साखर मिळण्याची अपेक्षा पूर्णता मावळली आहे.
पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये दुपारी महत्त्वाची बैठक
बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार एकत्र असणार
बैठकीमध्ये साखर कारखान्या संदर्भात महत्त्वाची चर्चा होणार
गुन्हेगारीला अंकुश बसावा या उद्देशाने यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या संकल्पनेतून विशेष मोहीम हाती घेत विविध गुन्हे शिरावर असलेल्या 279 गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली,यामध्ये यवतमाळ, पुसद, दारव्हा,वणी,पांढरकवडा,उमरखेड उपविभागातील 43 हिस्ट्रिशिटर गुन्हेगारांचा समावेश असून गुन्हे न करण्याची प्रतिज्ञा गुन्हेगारांना देण्यात आली.
नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टी मुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ 50 हजार रुपये हेक्टरी आर्थिक मदत द्यावी, सरसकट कर्जमाफी करावी यास इतर मागण्यांसाठी नांदेडच्या हदगाव तालुक्यातील आष्टी या गावात शेतकऱ्याने आमरण उपोषण सुरू केल आहे. मागील दोन दिवसापासून आष्टी येथील दिगंबर शिंदे हे शेतकरी उपोषणास बसले आहेत.त्यांच्या उपोषणाची दखल अद्याप कोणीही घेतली नाहीये. शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात,मागण्या मान्य नाही केल्यास माझी या ठिकाणाहून अंत्ययात्रा निघेल असा इशारा शेतकरी दिगंबर शिंदे यांनी दिला आहे.
आक्षेपार्ह पत्रके भिरकावल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी शिवशक्ती- भीमशक्तीचा जनआक्रोश मोर्चा उद्या, रविवारी शहरात काढण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार संग्राम जगताप, ॲड. वाल्मीक निकाळजे व इतर हिंदुत्ववादी या मोर्चात सहभागी होणार आहेत.
अफगाणिस्तानने आपल्या सीमेवर पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर दिले आहे. अफगाणी आणि पाकिस्तानी सैन्यामध्ये सीमेवर जोरदार गोळीबार सुरू आहे. समोरासमोरच्या लढाईत पाकिस्तानी सैन्याचे मोठे नुकसान झाले आहे.
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील(एसआरए) प्रकल्पात एकूण जागेच्या ३५ टक्के जागा खुली ठेवणे विकासकांवर बंधनकारक करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही योजनेला मंजूरी देऊ नये तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.