लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरामध्ये उज्जैन आणि काशीच्या धर्तीवर कॉरिडॉर तयार केला जाणार आहे या कॉरिडरला काल राज्य सरकारने अंतिम प्रशासकीय मान्यता दिली आहे या कामासाठी 3997 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.
नंदुरबार जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेने म्हसावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुगनी गावात मोठी कारवाई केली आहे. बनावट देशी दारू तयार करणाऱ्या एका कारखान्यावर छापा टाकून पोलिसांनी एकूण 10 लाख 17 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, लक्ष्मण पाडवी या आरोपीला ताब्यात घेतले आहे
* इतर खासदार पक्ष सोडून गेले तरी वाजे मात्र ठाकरेंसोबत कायम असल्याने ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांकडून स्वागत
* ढोल ताशांच्या गजरात घोषणाबाजी देत राजाभाऊ वाजे यांचे स्वागत
बेस्ट कर्मचाऱ्यांनी आज संपाची घोषणा केली आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर रिक्षां चालकांनी प्रवाशांची लूट चालवली आहे. शेअर रिक्षा चालकांनी अचानक भाडे वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम डाबचा राऊतपाडा गावात सातपुडा भागातील पहिल्या साकव पुलाचे लोकार्पण आमदार आमश्या पाडवी आणि जिल्हाधिकारी मिताली सेठी यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. हा जिल्ह्यातील अशा प्रकारचा पहिलाच पूल ठरला आहे.
पावसाळ्यात येथील स्थानिक नदीला पूर आल्यावर आदिवासी बांधवांचा जवळच्या गावांनी संपर्क तुटायचा. ग्रामस्थांना आणि शाळकरी मुलांना जीवघेणा प्रवास करत नदी ओलांडावी लागत असे. या समस्येची दखल घेत आमदार पाडवी यांच्या पाठपुराव्यातून हा पूल उभारण्यात आला आहे.
या साकव पुलामुळे सातपुड्यातील दुर्गम भागातील आदिवासी बांधवांचा पावसाळ्यातील धोकादायक प्रवास थांबणार असून, त्यांचा दळणवळणाचा प्रश्न कायमचा मिटला आहे.
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शेलूगाव ठाकरवस्ती येथे धक्कादायक घटना उघडकीस आली. कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची हत्या केल्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज असून परिसरात खळबळ उडाली.
अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उद्या करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन चार तास बंद राहणार
उद्या सकाळी आठ ते दुपारी साडेबारा या वेळेत देवीचे दर्शन बंद राहणार
अमित शहा मंदिरातील विकास आराखड्यांतर्गत प्रदक्षिणामार्ग आणि राम मंदिर जतन व संवर्धनाच्या कामाचा घेणारा आढावा
या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात कडक व्यवस्था
सुरक्षेच्या कारणास्तव देवीचे दर्शन भाविकांसाठी राहणार बंद
- आरटीआय कार्यकर्त्यांचा नियमांना विरोध, तर कर्मचारी संघटनांचे स्वागत
- माहिती अधिकारासाठी पहिल्या अर्जाचे शुल्क आता ३० रुपये, प्रथम अपील शुल्क ५० रुपये, तर द्वितीय अपीलसाठी १०० रुपये आकारले जाणार
- कागदपत्रांच्या प्रत्येक प्रतीसाठी आता ५ रुपये शुल्क
- अभिलेख पाहणीदरम्यान केवळ पेन्सिल वापरण्याचा नियम लागू
- माहितीचा अधिकार हा लोकशाहीतील मूलभूत अधिकार असल्याचे आरटीआय कार्यकर्त्यांचे मत
- शुल्कवाढ आणि शब्दमर्यादेमुळे सामान्य नागरिकांच्या माहितीच्या अधिकारावर मर्यादा येण्याची भीती
- केवळ सार्वजनिक हिताशी संबंधित माहितीच उपलब्ध करून देण्यावर भर
- नागरिकांच्या गोपनीयतेचे संरक्षण होणार, असा कर्मचारी संघटनांचा दावा
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.