वाशीम जिल्ह्यात वाशिम,मालेगाव आणि रिसोड तालुक्यात काल सायंकाळी झालेल्या वादळी वारा आणि पावसामुळे बिजवाई कांद्याच नुकसान झाल्याच समोर आल आहे, रिसोड तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे बीजवाई कांद्याच नुकसान झाल असून, कांदा पूर्णपणे आडवा पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने पुन्हा हिरावून घेतला आहे, त्यामुळं शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे...
जालन्यातील समृद्धी महामार्ग अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल
पोलीसांच्या फिर्यादीवरून तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
प्रकाश रमेश राजभर असं या ट्रक चालकाचे नाव असून त्या विरोधात तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
ट्रक चालकाच्या तोंडातून दारूचा उग्र वास आणि असंबंध बोलत असल्याचं एफ आय आर मध्ये नमूद
सध्या या ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अटक करण्यात आली आहे.
काल सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास समृद्धी महामार्गावरील कडवंची शिवारात एका ट्रक चालकाने समृद्धी महामार्गावर काम करणाऱ्या महिला मजुराच्या वाहनाला धडक दिली होती या अपघातात 8 महिलांचा मृत्यू झालाय..
जळगावच्या जामनेर तालुक्यातील रोटवद हनुमान मंदिर भाविकांची पहाटेपासून दर्शनासाठी मोठे गर्दी
नवसाला पावणारा मारुती, महाराष्ट्रातील सर्वात उंच मूर्ती आहे कशी आहे या हनुमानाच्या तीर्थक्षेत्राची ओळख..
दरवर्षी हनुमान जयंतीला मध्यरात्रीपर्यंत लोणी मिश्रित शेंदूर तयार करून मूर्तीला लेपन केले जाते.
मूर्ती सजावटीसाठी कागदाने हुबेहू ब मनुष्याप्रमाणे मूर्तीला डोळे व इतर अवयव कागद कटिंग करून मूर्तीवर लावले जातात.
सकाळी हनुमान जन्माच्या वेळेस सूर्योदयाला महा आरती साठी भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी झाली
नवसाला पावणारा मारुती अशी ओळख असल्याने मनोकामना पूर्ण झाल्यानंतर राज्यभरातून भाविक नवस फेडण्यासाठी येतात.
ऐतिहासिक संदर्भ असल्याने या मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा, व राज्यभर हे मंदिर प्रसिद्ध व्हावे अशी भाविकांची मागणी आहे.
भंगार विक्रीतून मध्य रेल्वे मालामाल; ४६० कोटींची कमाई
मध्य रेल्वे २०२५-२६ या आर्थिक वर्षात भंगार विक्रीतून अक्षरशः मालामाल झाली.
भंगार विक्रीद्वारे रेल्वेच्या तिजोरीत ४५९.५२ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला.
रेल्वे बोर्डाने निश्चित केलेल्या ४५० कोटींचे लक्ष पूर्ण करत गेल्या दोन वर्षातील सर्वाधिक कमाई केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या उपक्रमांतर्गत रेल्वेच्या कार्यशाळा, यार्ड आणि विभागांमध्ये साठलेले अनुपयोगी साहित्य शोधून त्याची विल्हेवाट लावण्यावर भर देण्यात आला.
या मोहिमेत कुर्ला कटिंग यार्ड, ट्रॅक्शन मशीन वर्कशॉप, परळ वर्कशॉप आणि मनमाड वर्कशॉप यांसह सर्व पाच विभागांमध्ये विशेष मोहीम राबवण्यात आली.
पुणे शहरासह जिल्ह्याला आजही यलो अलर्ट
शहरासह जिल्ह्यात आज संध्याकाळी पुन्हा वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता
हवामान विभागाचा इशारा
शहरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेला अवकाळी पावसाचा मुक्काम आजही कायम राहणार
पुणे शहरासह जिल्ह्यासाठी पुणे वेधशाळेने नेमका काय अंदाज वर्तवला आहे?
पुढील २४ तासासाठी पुणे वेधशाळेने पावसाचा यलो अलर्ट दिला असून, पुढील दोन दिवस दुपारनंतर किंवा सायंकाळी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
दुपारी उन्हाचा चटका जाणवेल.त्यानंतर अवकाळी पावसाचा जोर ओसरेल आणि घटलेल्या कमाल तापमानात पुन्हा वाढ होण्यास सुरवात होईल, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे
गॅस सिलेंडर मिळावा म्हणून मागचे काही दिवस गॅस एजन्सी बाहेर रांगा लागल्या होत्या. आता गॅस सिलेंडरचे इतकं महत्त्व वाढले की त्याची चोरी होऊ लागलीय. छत्रपती संभाजीनगर लाडगाव येथे घरगुती गॅसची मागणी अधिक वाढल्यानं सध्या गॅस एजन्सी कडून सिलेंडर लवकर दिले जात नाही. दुसरीकडे सातत्याने सोशल मीडियावरच्या अफवांमुळे गॅस मिळेल की नाही याची लोकांना भीती वाटतेय. घराच्या बाहेर कंपाऊंडमध्ये ठेवलेल्या भरलेल्या गॅस सिलेंडरची चोरी झाल्याची घटना घडली. फोन वर बोलत चोरटा थेट आत घुसून गॅस सिलेंडर उचलून नेताना सीसीटीव्हीत कैद झाला आहे. रात्री साधारण आठ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.
रत्नागिरी नगर परिषदेनं प्लास्टिक विरोधी मोहीम सुरु केलीय. शहरातील मारुती मंदिर परिसरात ज्या दुकानदारांकडे प्लास्टिक पिशव्या आहेत अशा दुकानदाराकडून प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच सर्व दुकानदारकांना नगरपरिषदेमार्फत प्लास्टिक पिशव्या वापरू नये असे आवाहन देखील करण्यात आलय. य. याव्यतिरिक्त जर कोणी प्लॅस्टिक पिशवी वापरली जात असेल असे निदर्शनास आले तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात केली जाणार आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 56 वर असलेली 105 फूट उंच अशी विशाल काय हनुमानाच्या मूर्तीला आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने सूर्योदया वेळी जलाभिषेक करण्यात आला आज दिवसभर नांदुरा येथील तिरुपती बालाजी संस्थान येथील 105 फूट उंच अशा विशाल काय मूर्तीच्या बाजूला विविध धार्मिक कार्यक्रमांनी हनुमान जन्मोत्सव साजरा होणार आहे सकाळपासूनच भाविकांनी येथे गर्दी केली आहे.
हवामानात झालेल्या अचानक बदलाने कमी दाबाचा पट्टा तयार झालाय बाष्प घेऊन जिल्ह्यात गोंगावणारे बारावी सर्वत्र बरसात आहे आज आणि उद्या पाऊस बरसण्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे यामुळे काढणीला आलेला पिकांना जपावे लागणार आहे एक दोन ठिकाणी विजांच्या कडकडांस गारपीट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये ढगाळी वातावरण आहे.
तुळजाभवानी मातेची धाकटी बहीण म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या येरमाळा येथील येडेश्वरी देवीच्या चैञ पोर्णिमा याञा महोत्सवाला सुरूवात झाली आहे.येरमाळा नगरी भाविकांनी फुलुन गेली असुन डोंगर परीसरात खेळणी व साहीत्याची दुकाने सजली आहेत.याञा काळात वाहतुक कोंडी टाळण्यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाने अवजड वाहनांची बाह्य़वळण २ ते ५ एप्रिल पर्यंत निश्चित केले आहेत.तसेच मुख्य ठिकाणी सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत तर तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.उद्या याञेतील मुख्य चुनखडी वेचण्याच्या कार्यक्रम असुन यासाठी राज्यभरातुन १५ लाख भाविक उपस्थित राहतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे कांद्याची निर्यात ठप्प झाल्याने बाजार समितीत मोठ्या प्रमाणावर कांदा आणि बटाटा साठून राहिला आहे. त्यातच अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावल्याने उघड्यावर ठेवलेला कांदा आणि बटाटा पूर्णपणे भिजून खराब झाला आहे. बाजार समितीत कांदा साठवणुकीसाठी पुरेशी जागा नसल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. आधीच घसरलेले बाजारभाव आणि वाढलेला उत्पादन खर्च यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शासनाने तातडीने मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
नुकसानग्रस्त शेती, फळबागा आणि घरांच्या पडझडीचे महसूल आणि कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात येत आहेत पंचनामे
यावेळी पुणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी भोर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीला भेट देऊन शेतीची पाहणीही केलीय
रविवारी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह विज्यांच्या कडकडाटात गारांचा मुसळधार पाऊस झाला.या गारांच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेल्या आंबा, कांदा,गहू, ज्वारी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे..
मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.. त्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाकडून नुकसानीच्या पाहणीला सुरुवात करण्यात आलीय..
रात्री झालेल्या वादळीवारा आणि अवकाळी पावसामुळे लातूरच्या ग्रामीण भागात शेती पिकांचे मोठं नुकसान झाल आहे, गारपीट आणि अवकाळी पावसामुळे गहू, ज्वारी, हरभरा, यासह आंबा फळबागेचे मोठे नुकसान झाल आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडे आडवी पडली आहेत,तर रेनापुर तालुक्यातील काही भागातील विद्युत पुरवठा देखील रात्रीपासून खंडित आहे. दरम्यान लातूर शहरात देखील मध्यरात्री तुफान पाऊस झाला आहे, अवकाळी मुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठ नुकसान झाल आहे.
मावळ तालुक्यातील देहूगाव देहूरोड येळवाडी या मेघगर्जनेसह मोठ्या प्रमाणात गारांसह अवकाळी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका कांदा पिकाला बसला आहे. येलवाडीच्या शशिकांत काळोखे यांना तर फारच मोठा उसाचा फटका बसला आहे. यांच्या दोन एकरांतील कांदा पूर्णतः खराब झाला आहे. काळोखे यांनी आंतरपीक म्हणून पपईचे पीक घेतले होते मात्र गारांच्या मारामुळे तेही पूर्ण जमीनदस्त झाले आहे. कांदा पूर्ण तयार होऊन काढणीस आलेला होता मात्र अवकाळी पावसाने तोंडाचा घास फिरवून घेतला त्यामुळे अक्षरशा रडण्याची वेळ शेतकऱ्यावर आलेली आहे. शेतीसाठी लागणारी खतं, कामगारांची मजुरी तसेच तीन महिने शेतात राबून कांद्यासाठी केलेले शेतकऱ्याचे कष्ट वाया गेले आहेत. आंतर पिकासाठी त्यांनी पपईचे एक रोप वीस रुपयांना घेतले होते, अशा सुमारे दोन हजार रोपांचे गारपिटीमुळे नुकसान झाले आहे.
राजापूर तालुक्यातील जुवाठी शिर्केवाडीतील रामचंद्र नारायण भारती यांच्या विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाने जीवनदान दिलेय. जुवाठी शिर्केवाडीतील रामचंद्र नारायण भारती यांच्या विहिरीत बिबट्या पडला असल्याची माहिती वनविभागाला मिळाली तात्काळ वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली.जवळपास 40 फूट खोल विहीरीत हा बिबट्या पडला होता. या बिबट्याला सुखरूप पिंजऱ्यात जेरबंद करून बाहेर काढण्यात आले. बिबट्या हा मादी जातीचा असून वय सुमारे दीड ते दोन वर्ष आहे.वैद्यकीय तपासणीनंतर या बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
जुन्नर तालुक्यातील बेळेआळी रोडवरील कुकडी नदीच्या पुलावर बिबट्याचा मुक्त संचार पुन्हा एकदा समोर आला आहे. रात्रीच्या वेळी हा बिबट्या पुलावरून निवांत फिरताना कॅमेरात कैद झाला असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, या भागात बिबट्यांचा वावर वाढत असल्याने स्थानिकांनी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रावर अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पुणे, सोलापूर, अहिल्यानगरसह राज्यात गारपिठासह पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे शेतकरी राजा संकटात आला आहे. हातातोंडाशी आलेलं पिक गेल्यामुळे शेतकरी राजा हताश झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.