Aaditya Thackeray - Devendra Fadnavis saam tv
महाराष्ट्र

Aaditya Thackeray On Devendra Fadnavis: कोकणी माणसाला देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न का करताय?; बारसूवरुन आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना खोचक सवाल

कोकणावर आणि कोकणी माणसावर एवढा राग कशा साठी? असा प्रश्न विचारत आदित्य ठाकरेंनी फडणवीसावर टीकास्त्र सोडलं आहे.

Ruchika Jadhav

Maharashtra Political News: काल विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बारसू आंदोलनाबाबतचं निवेदन सादर केलं. यावेळी फडणवीसांनी बारसू येथील आंदोलनासाठी बंगळुरूतून फंडिंग झालं आहे, असे गंभीर आरोप आंदोलकांवर केले आहेत. त्यावरुन कोकणावर आणि कोकणी माणसावर एवढा राग कशासाठी? असा प्रश्न विचारत आदित्य ठाकरेंनी फडणवीसावर टीकास्त्र सोडलं आहे. (Latest Marathi News)

आपल्या ट्वीटर अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत आदित्य ठाकरेंनी फडणवीसांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर देखील निशाणा साधला आहे. "नाणार असो की बारसू असो भाजपा महाराष्ट्रद्वेषी आहे हे वारंवार दिसतंच आणि त्याबरोबरच दिसतं ते शिंदेच्या सत्तेच्या लोभापायी कोकणी माणसाला दगा देणं, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी शिंदेंवर निशाणा साधलाय.

आपल्या ट्वीटमध्ये आदित्य ठाकरेंनी पुढे लिहिलं आहे की, "कोकणावर आणि कोकणी माणसावर या लोकांचा एवढा राग कशासाठी? पाकिस्तानशी संबंध, बंदिस्त संघटना, परदेशी फंडिंग” अशा गोष्टी कोकणाशी जोडून हे महाराष्ट्रद्वेष्टे कोकणी माणसाला देशद्रोही का ठरवू पाहताहेत?"

"उद्या हे कोकणी माणसाला नक्षलवादी म्हणतील, त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करतील. स्वतःचं खोटं रेटायला कोकणी माणसाचा बळी देतील. याचं कारण एकच- यांच्या महाराष्ट्र द्वेषा विरुद्ध उभ्या राहणाऱ्या कोकणी माणसावरचा राग, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: पुरूष लाभार्थी घुसलेच कसे? लाडकी बहीण योजनेत ४८०० कोटींचा घोटाळा

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

मुंबई-आग्रा महामार्गावर बसचा भीषण अपघात, ८ वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू, १५ जखमी, ४ जणांची प्रकृती गंभीर

KDMC : केडीएमसीतील कंत्राटी कामगारांचे काम बंद; सुमित कंपनीत सामावून घेण्याची मागणी

Mumbai-Goa Highway : LPG गॅस टॅंकरला अपघात, ९ तासांपासून वाहतूक ठप्प | VIDEO

SCROLL FOR NEXT