67 villages gets water from 71 tanker in buldhana  Saam Tv
महाराष्ट्र

Buldhana Water Crisis : 300 गावांत पाण्याचे दुर्भिक्ष,साडेतीन लाख ग्रामस्थांचे हाल; धरणांतील पाणीसाठ्याने बुलढाणाकरांची चिंता वाढवली

Water Scaricty In Buldhana : पेन टाकळी, खडकपूर्णा आणि नळगंगा या तीन मोठ्या धरणात मिळून सरासरी 11.18 टक्केच जलसाठा शिल्लक आहे. यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांची चिंता वाढली आहे.

संजय जाधव

बुलढाणा जिल्ह्यात पाणीटंचाईची दाहकता वाढली आहे. तब्बल साडेतीन लाख ग्रामस्थांची पाण्याच्या थेंबासाठी होरपळ होत आहे. यामुळे लाखो जिल्हावासीयांना दमदार पावसाच्या प्रतिक्षा लागली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत पाणीटंचाईने जिल्हावासी व जिल्हा प्रशासन यांची कठोर परीक्षा घेतली. मे अखेरीस पाणी टंचाईची दाहकता वाढली आहे. जिल्ह्यातील 290 गावांत पाण्याचे दुर्भिक्ष आहे. 67 गावांतील तब्बल 2 लाख 18 हजार 252 ग्रामस्थांना, शेतक-यांना आपली तहान व दैनंदिन गरजा भागविण्यासाठी केवळ टँकरचाच आधार राहिला आहे.

या गावांना 71 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील 223 गांवातील 259 विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. याबराेबरच 51 धरणांनी तळ गाठला आहे. तसेच जिल्ह्यातील 51 लहान मोठया सिंचन प्रकल्पात आता नाममात्र जलसाठा उपलब्ध आहे Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Grah Gochar 2025: चंद्र, मंगळ आणि केतूच्या भेटीनं ३ राशींचे भाग्य उजळणार, नात्यात गोडवा अन् घरात पैसा येणार

Palak Curry Recipe : पालक करी अन् गरमागरम चपाती, रविवारचा हेल्दी बेत

Court Attack : कोर्टावर दहशतवादी हल्ला; 8 जणांचा मृत्यू, परिसरात खळबळ

Maharashtra Live News Update: मुंबई-पुणे रस्त्यावर भीषण अपघात; कंटेनरची २० वाहनांना धडक

Ind vs Eng : आधीच ३११ धावांची पिछाडी, त्यात शून्यावर साई-यशस्वी बाद, मँचेस्टरमध्ये टीम इंडियावर पराभवाचं सावट

SCROLL FOR NEXT