Beed News विनोद जिरे
महाराष्ट्र

धक्कादायक! 2 सख्ख्या बहिणींची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

सकाळी वडीलांनी त्यांना मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी मोरेवाडीला सोडून आले होते. मात्र त्यांचा सायंकाळी विहिरीतील पाण्यात बुडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता

विनोद जिरे

बीड - अंबाजोगाई (Ambajogai) शहरात अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील 2 सख्या बहिणींनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना सायंकाळी 5 ते 6 च्या दरम्यान अंबाजोगाई शहरातील स्वाराती रुग्णालयाच्या (Hospital) परिसरात घडली आहे. निदा अल्ताफ शेख वय 16 आणि सानिया अल्ताफ शेख वय 18 अशी मृत बहिणींची नावे आहेत.

हे देखील पहा -

अंबाजोगाई शहरातील स्वाराती रुग्णालयाच्या रोडवर असणाऱ्या, कंपनी बागेतील विहिरीत, काल सायंकाळी 5 ते 6 च्या दरम्यान, निदा आणि सानिया या दोन सख्ख्या बहिणींचा मृतदेह आढळून आला होता. तर त्या दोघींनी आत्महत्या केल्याचे रात्री उशीरा पोलीस तपासात समोर आले आहे. निदा आणि सानिया या अंबाजोगाई शहरातील फॉलोअर्स क्वार्टर भागात राहत होत्या.

सकाळी वडीलांनी त्यांना मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी मोरेवाडीला सोडून आले होते. मात्र त्यांचा सायंकाळी विहिरीतील पाण्यात बुडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. स्थानिकांच्या मदतीने त्यांचे मृतदेह विहिरीच्या बाहेर काढून शवविच्छेदनासाठी स्वाराती रूग्णालयात पाठविण्यात आले आहे. दरम्यान, त्या दोघींनी आत्महत्या केल्याचे अंबाजोगाई शहर पोलीसांच्या तपासात रात्री स्पष्ट झाले आहे. मात्र त्यांनी आत्महत्या का केली? हे अद्याप अस्पष्ट असून अंबाजोगाई पोलीस तपास करत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अपघातात मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांच्या मुलाचे शिंदेसेनेच्या नेत्यांनी घेतले शैक्षणिक पालकत्वं

Maharashtra Politics: विलिनीकरणावरून वाद पेटला; अजित पवार गटाच्या आमदाराचा शरद पवार गटावर हल्लाबोल

मोठी बातमी! भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार नाही, कारण आलं समोर

राज्यात मोठी घडामोड! भाजपच्या 102 नगरसेवकांचे राजीनामे; पत्रावर घेतली स्वाक्षरी? नेमकं काय घडलं?

राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्षपदाचा निर्णय झाला का? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं, VIDEO

SCROLL FOR NEXT