महाराष्ट्र निवडणुकीत ज्येष्ठ नागरिकांना विशेष सुविधा दिली जाणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आलेल्या मतदारांन बसण्यासाठी खुर्च्यांची सुविधा पुरवली जाणार आहे.
ज्येष्ठ नागरिकांना घरून मतदान करण्याची सुविधा पुरवली जाणार आहे. ज्या मतदारांचे वय ८५ पेक्षा जास्त आहे, त्यांना घरून मतदान करता येणार आहे.
महाराष्ट्रात 1 लाख 186 निवडणूक केंद्र आहेत
ग्रामीण आणि शहरी भागात मतदार केंद्र आहेत.
महाराष्ट्रातील आदिवासी भागातील जनतेशी आयोगाने चर्चा केली आहे.
त्यांचा टक्का जास्तीत जास्त असावा यासाठी आमचा प्रयत्न आहे.
आज विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली जात आहे. महाराष्ट्रासह झारखंडमधील निवडणुकांची देखील घोषणा होणार आहे.
काही क्षणात विधानसभेच्या निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे. तर काही क्षणात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे.
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेआधी मनोज जरांगे पाटील यांनी मोठी मागणी केली आहे. 'काही वेळात आचारसंहिता लागू शकते, सरकारला शेवटचा इशारा आहे. फडवणीस साहेब अंमलबजावणी करा, आचारसंहिता पुढे ढकला. मराठ्यांच्या पोरांचं वाटोळ करू नका. मराठा जात संपवण्याचा विडा उचलू नका. तुम्ही स्वप्नपूर्ती करू नका की, मी मराठ्यांचं वाटोळं केलं. मराठ्यांचं वाटोळे केलं म्हणून कलंक लावून घेऊ नका,मराठ्यांना आरक्षण द्या,असे जरांगे म्हणाले.
दोन फेजमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत मुख्य लढत आहे. हरियाणात आम्हाला चांगले यश मिळाले. तिथे काँग्रेस येईल असे रिपोर्ट होते मात्र आम्ही आलो. महाराष्ट्रात मविआ येणार असल्याचे बोलले जाते मात्र वातावरण बदलले आहे. महाराष्ट्रात आम्हाला यश मिळेल, असे रामदास आठवले म्हणाले.
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेच्या पार्श्वभूमीवर आज होणारी महायुतीची पत्रकार परिषद पुढे ढकलण्यात आली आहे.
आचारसंहिता जाहीर होत आहे, निवडणुका देखील जाहीर होईल अशी अपेक्षा आहे. याआधीच निवडणूक होईल असे वाटत होतं पण तसं झालं नाही. आमच्या पक्षाची तयारी पूर्ण झाली आहे, असे अमोल कोल्हे म्हणाले.
आज साडेतीन वाजता निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन आचारसंहिता घोषित करेल. बरोबर त्याच्या आधी बारा वाजता राज्यपाल नियुक्त आमदारांच्या शपथविधीला सुरुवात होत आहे. आचारसंहिता लागणार हे भाजपच्या कानात कोण सांगत असेल बरे ? स्वायत्त संस्था यांना तर भाजपाने आधीच आपल्या दिमतीला ठेवले आहे. महामहीम राज्यपालानाही आपल्या स्वविवेकाधीन अधिकारांचा विसर पडावा हे गंभीर आहे..!!सुषमा अंधारे, शिवसेना UBT
राज्यात आज आचारसंहिता घोषित होण्याची शक्यता असल्याने मंत्र्यांची उद्घाटने आणि भूमीपूजनसाठी धावपळ सुरू आहे. महाराष्ट्र सरकार तर्फे मुंबईत पुण्य श्लोक अहिल्यादेवी भवन बांधण्यात येत आहे. मुंबईच्या मानखुर्द परिसरात हे भवन उभे राहणार आहे. आज यचा गडबडीने भूमीपूजन सोहळा करण्यात आला. या सोहळ्यासाठी पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित होते. मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समिती मार्फत ४७ कोटी रुपये खर्च करून मानखुर्द येथे बाल कल्याण विभागाच्या जागेवर हे भवन उभारले जाणार आहे. या भवनात अहिल्या देवींचा पूर्णकृती पुतळा, महिला आणि बाल कल्याण विभागाची विविध कार्यालय, सभागृह , महिलांना मार्गदर्शन केंद्र, विश्राम गृह अश्या विविध सुखसुविधा असणार आहेत.या भवनासाठी आमचे सरकार आल्यावर १०० कोटी ही देवू, हे भवन मतांचा नाही भावनेचा विषय असल्याचे लोढा म्हणाले.
विधानसभेच्या एकूण जागा २८८
महायुतीकडे सध्या १८७ जागा
भाजप - १०५
शिवसेना (एकनाथ शिंदे) - शिंदे ४०
राष्ट्रवादी (अजित पवार) -४२
महाविकास आघाडी ७२ जागा -
काँग्रेस - ४४
शिवसेना ठाकरे गट - १६
राष्ट्रवादी शरद पवार - १२
निवडणूक लागण्यापूर्वी सगळे मैदान सर्व पक्षांनी साफ करून ठेवले आहेत. आम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहोत. २८८ मतदारसंघ बाबत आमची दिल्लीत चर्चा झाली. प्रत्येक मतदासंघात ४-५ नावे आहेत. शॉर्ट लिस्टिंग होईल. त्यानंतर बैठका होऊन याद्या जाहीर होईल.रावसाहेब दानवे
EC Assembly Elections Poll Date Annoucemnt Live: महाराष्ट्र झारखंडमध्ये आजपासूनच लागणार विधानसभेची आचारसंहिता ..दुपारी केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकारपरिषद .
Election date announcement live: नशीब निवडणूक लागली, ही चांगली गोष्ट आहे. कारण की आम्हाला वाटलं की निवडणूक लांबणीवर टाकली जाते की काय?
जशी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लांबवली गेली तशी ही निवडणूक पुढे ढकली जाते की काय? असा संशय होता, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.