Maharashtra Politics 2024  Saam Digital
लोकसभा २०२४

Maharashtra Politics 2024 : नाशिकनंतर आता पालघरवरही दावा; लोकसभेच्या जागावाटपावरून शिंदे गट पुन्हा आक्रमक

Lok Sabha Election 2024 : शनिवारी झालेल्या बैठकीत ठाणे, रत्नागिरी-सिंधुदुर्ग आण नाशिक लोकसभेची जागा कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही असा दावा करण्यात आला. दरम्यान संजय शिरसाठ यांनीही आज नाशिकसह पालघरच्या जागेवरही दावा केला आहे.

Sandeep Gawade

Maharashtra Politics 2024

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या आमदाराची काल वर्षावर बैठक झाली. या बैठकीत ठाणे, रत्नागिरी-सिंधुदुर्ग आण नाशिक लोकसभेची जागा कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही असा दावा करण्यात आला. दरम्यान संजय शिरसाठ यांनीही आज नाशिकसह पालघरच्या जागेवरही दावा केला आहे. त्यामुळे महायुतीत पुन्हा तिढा वाढण्याची शक्यता आहे. निवडणुंकांची रणधुमाळी सुरू शिंदे गट जागावाटपावरून आक्रमक झाल्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढणार आहे.

काल आशिष शेलार, रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे की आमची जबाबदारी आहे की कल्याणची जागा निवडून आणायची आहे आणि आमची जबाबदारी आहे की भिवंडीची जागा निवडून आणायची. रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक आणि पालघर या जागांसाठी आमचा आग्रह आहे. नाशिकमध्ये गोडसे यांनी फॉर्म भरल्यास विजय निश्चित, मग ती जागा आम्ही का सोडावी, असा सवाल शिरसाठ यांनी केला. काल झालेल्या बैठकीत ज्यांना तिकीट देण्यात आलेलं नाही, त्यांना बाजूला केलं जाणार नाही, खासदार असो किंवा पदाधिकारी सर्वांना सामावून घेतलं जाईल, याबाबत एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिल्याचं त्यांनी सांगितलं.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एकनाथ खडसे यांचं भाजमधल्या नेत्यांशी एकमत

एकनाथ खडसे यांनी गेली 30-40 वर्षे भाजपमध्ये काम केलं आहे. काही वादविवाद होते म्हणून त्यांनी पक्ष सोडला होता. पण आता काही नेत्यांशी त्यांची मतं जुळतायेत, त्यामुळे ते घरवापसी करत आहेत. वंचित बहुजन आघाडीला आणि प्रकाश आंबेडकरांना वेळ देणारे नाना पटोले कोण आहेत. त्यांनी स्वत:चा पक्ष सांभाळावा असा टोला त्यांनी लगावला. तसंच महाविकास आघाडीत जे काही सुरू आहे, त्यावरून आघाडीत बिघाडी झाली आहे, हे त्यांनी सांगितलं नाही, असंही ते म्हणाले.

देशात आणि राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अनेक ठिकाणी उमेदवारांची उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी लगबग सुरू आहे. एकीकडे नेते तयारीला लागले आहेत. मात्र महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. दरम्यान काल एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेचे आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत ठाणे, रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि नाशिकची जागा कोणत्याही परिस्थितीत सोडायची नाही, असा निर्धार करण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Narnala Fort History: ट्रेकिंगसाठी उत्तम ठिकाण, अकोला जिल्ह्यातील नरनाळा किल्ला माहितेय का? जाणून घ्या खास वैशिष्ट्ये

Maharashtra Live News Update: वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना विक्रीच्या चर्चेने सहकार क्षेत्रात मोठी खळबळ

Heart disease symptoms: 'ही' ५ लक्षणं दिसली तर समजा एंजियोप्लास्टी करण्याची आहे गरज; वेळीच टाळा हार्ट अटॅकचा धोका

Nanded : विशेष पॅकेजमधून नांदेड जिल्हा वगळला; शेतकरी आक्रमक, गांजा लागवड परवानगीची केली मागणी

जबरदस्त! जयस्वालनं वेस्ट इंडीजची केली धुलाई, शतक ठोकलं; जे फक्त सचिन तेंडुलकरला जमलं, ते यशस्वीलाच करता आलं

SCROLL FOR NEXT