Holika Dahan 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Holika Dahan 2023 : होलिका दहनात का जाळल्या जातात गोवऱ्या ? जाणून घ्या कारण

Holi 2023 Upay : होलिकेच्या अग्नीत अशा काही वस्तू जाळल्या जातात, ज्यांचे ज्योतिषशास्त्रातही विशेष महत्त्व आहे.

कोमल दामुद्रे

Holi Festival 2023 : होळी हा हिंदूं धर्मात सर्वात खास सण मानला जातो. यामध्ये मुख्यतः होलिका दहनाने सर्व वाईट गोष्टींचा नाश होतो. होलिकेच्या अग्नीत अशा काही वस्तू जाळल्या जातात, ज्यांचे ज्योतिषशास्त्रातही विशेष महत्त्व आहे. त्यात गोवऱ्यांना अधिक महत्त्व आहे.

होलिका दहन हे फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला केले जाते आणि मान्यतेनुसार या दिवशी सर्व नकारात्मक शक्तींचा अग्नीमध्ये नाश होतो. गोवरी शुभतेचे प्रतिक मानले जाते आणि त्यांना जाळल्याने आजूबाजूची नकारात्मक (Negative) ऊर्जाही दूर होते.

यज्ञ आणि हवनातही गायीच्या शेणाचा वापर केला जातो आणि त्यांना खूप आध्यात्मिक महत्त्व आहे, परंतु जेव्हा आपण होलिका दहन सणाबद्दल बोलतो तेव्हा शेण जाळण्याचे ज्योतिषशास्त्रीय महत्त्व देखील आहे. चला त्याबद्दल जाणून घेऊया.

1. शेणाचे महत्त्व

हिंदू धर्मात गाय पूजनीय मानली जाते आणि गायीमध्ये 33 कोटी देवी-देवतांचा वास असल्याचे सांगितले जाते. या कारणास्तव गायीची पूजा केल्याने विशेष ज्योतिषीय लाभ मिळतात. त्याचबरोबर गायीचे शेणही पवित्रतेचे प्रतीक मानले जाते. या कारणास्तव, आजही ग्रामीण भागातील घरांमध्ये याचा वापर केला जातो. शेणाच्या पोळीचा वापर करून घरात (Home) समृद्धी राहते.

2. गोवरीचे धार्मिक महत्त्व

ज्योतिष शास्त्रामध्ये असे मानले जाते की, जेव्हा आपण कोणत्याही रूपात शेण जाळतो तेव्हा त्यातून निघणारा धूर सर्व नकारात्मक शक्ती दूर करण्यास मदत करतो. गाईचे शेण अतिशय पवित्र मानले जाते आणि त्यामुळे अनेक धार्मिक विधींमध्ये त्याचा वापर केला जातो. होलिका दहनात बडकुल्ला प्रामुख्याने गाईच्या शेणापासून बनवले जातात. यासाठी शेणाचे छोटे गोळे बनवून मध्यभागी छिद्र करून उन्हात वाळवले जातात आणि त्याची माळ होलिकेच्या अग्नीत जाळली जाते. असे मानले जाते की त्यांना जाळल्याने घरातील सर्व संकटे दूर होतात.

3. होलिका दहनात गोवऱ्या जाळण्याचे धार्मिक महत्त्व

गाईचा मागचा भाग म्हणजे यमाचे स्थान मानला जातो आणि या ठिकाणाहून शेण सापडते असे मानले जाते. होलिका दहनात याचा वापर केल्याने अकाली मृत्यू किंवा कुंडलीतील कोणत्याही रोगाशी संबंधित दोष दूर होतात. या कारणास्तव पूजेत शेणाच्या पोळीचाही वापर केला जातो. शेणाची पोळी कोठेही जाळल्यास घरात लक्ष्मी देवी वास करते आणि होलिकेच्या अग्नीतही जाळल्यास रोगांपासून मुक्ती मिळते आणि आर्थिक स्थिती बरी होते.

4. होलिकाला शेणाची पोळी अर्पण करण्याची शास्त्रीय कारणे कोणती?

जर आपण विज्ञानावर विश्वास ठेवला तर केवळ शेणच असे आहे की ते अनेक औषधांच्या रूपात वापरले जाऊ शकते. यामध्ये अनेक घटक असतात जे हानिकारक जंतू नष्ट करण्यास मदत करतात.

दुसरीकडे, शेण जाळल्याने निघणाऱ्या धुराबद्दल बोलायचे झाले तर हा एकमेव धूर आहे जो पर्यावरण प्रदूषित (Pollution) करत नाही तर हानिकारक जीवाणू नष्ट करतो. शेणाच्या धुरामुळे वातावरण शुद्ध होते.

5. शेणाची पोळी कधी बनवतात ?

होलिका दहनाच्या १५ दिवस आधी होळीसाठी बडकुल्ला किंवा शेणाची पोळी बनवली जाते. सोमवार किंवा शुक्रवार सारखा बनवण्यासाठी एक शुभ दिवस निवडला जातो. हे बडकुल्ला प्रथम 7 किंवा 11 च्या संख्येत बनवले जातात. असे मानले जाते की जर कुटुंबात नवीन वधू आली असेल किंवा मुलाचा जन्म झाला असेल तर होलिकेच्या अग्निमध्ये गोवरी जाळली पाहिजे, ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Disease Diet : चाळीशीनंतरही होणार नाहीत ह्रदयविकाराच्या समस्या, आहारात करा या ४ पदार्थांचा समावेश; डॉक्टरांनी दिला सल्ला

Designer Blouse: लग्नसराईत प्लेन साडीत पण दिसाल उठून, ट्राय करा हे ७ ट्रेंडी युनिक स्वस्त डिझायनर ब्लाऊज

Maharashtra Live News Update : बदलापूर नगरपरिषदेची 85 टक्के मालमत्ता करवसुली

Chocolate Dry fruit Shake: उन्हाळ्यात प्या चॉकलेट ड्राय फ्रुट शेक; राहाल दिवसभर फ्रेश

लक्ष्मण हाकेंना गावाबाहेर काढा; शिवरायांच्या पुतळ्यावरून माढ्यात राडा|VIDEO

SCROLL FOR NEXT