सध्याच्या जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदलली आहे. आता फिटनेसलाही महत्व दिलं जातंय. कारण म्हातारपणात जाणवणाऱ्या समस्या या तरुणांमध्ये वाढताना दिसत आहेत. तिशीतच अनेकांना बसता उठताना त्रास, कमी झोप, सांधे दुखी अशा प्रकारच्या अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय.
तरुणच नाही तर ६० ते ७० वयोगटातले लोकही फिट राहण्यासाठी व्यायाम करण्याचा पर्याय निवडतायेत. पण याची सुरुवात थेट जीममध्ये जाऊन करत नाहीत. यासाठी चालण्याच्या माध्यमातून करतात. चालल्याने तुमच्या शरीरातली शुगर नियंत्रणात येते, तुमचं ह्रदय सुरळीत काम करतं, पचनक्रिया सुधारते, तुमची चिडचिड कमी होते. पण जेवल्यानंतर चालणं योग्य की जेवणाआधी? हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. पुढील माहितीत आपण याबद्दल जाणून घेऊयात.
सकाळी रिकाम्या पोटी चालल्यावर शरीराला एनर्जी मिळवण्यासाठी साठवलेल्या चरबीचा वापर करावा लागतो. त्यामुळे रोज हे रुटीन फॉलो केलं तर वजन कमी होतं. तसेच जेवणाआधी चालल्यावर भूक नियंत्रित राहत नाही आणि अनेकजण जास्त हेल्दी अन्नपदार्थांची निवड करतात. चालण्यामुळे मन शांत राहतं, ताण कमी होतो आणि जास्त भूक लागत नाही.
जेवणानंतर चालल्यावरही फायदे होतात. तज्ज्ञांच्या मते, जेवल्यानंतर १० ते १२ मिनिटांच्या आत कमी वेगात चालल्यावर रक्तातल्या साखरेची पातळी नियंत्रणात राहतं. तसेच डायबेटीज किंवा प्रीडायबेटीजच्या रुग्णांना याचा जास्त फायदा होऊ शकतो. चालण्यामुळे स्नायू तुमच्या आहारातून मिळालेल्या ग्लुकोजचा वापर करतात. त्याने ब्लड शुगर नियंत्रणात राहतं. तुम्ही तुमच्या सोयीनुसार चालण्याचा पर्याय निवडू शकता. फक्त चालण्याची सवय ही थांबवू नका.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.