Vegetables Rate Hike Saam TV
लाईफस्टाईल

Vegetables Rate Hike : पितृपक्ष सुरु होताच भाज्या महागल्या; सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री

Vegetables Price Double Increase : पितृपक्ष सुरु होताच भाजीपाल्यांचे भाव दुपटीने वाढले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागलीये. आवक घटली असताना मागणी वाढल्याने हा परिणाम झाला आहे.

Ruchika Jadhav

पितृपक्ष सुरु होताच भाजीपाल्यांच्या मागणीत वाढ झाली आहे. तर दुसरीकडे पावसामुळे पालेभाज्या खराब होऊन उत्पादनात कमालीची घट झालीये. त्यामुळे आवक घटली असताना आठवडेबाजारात तरकारी मालासह भाजीपाल्याचा भाव चांगलाच वाढला आहे.

गणेशोत्सव संपताच पितृपक्षाला सुरुवात झाली. पितृपक्षात पितरांना भोजन घालण्याची परंपरा आहे. यासाठी आख्यायीकेनुसार विविध प्रकारच्या भाज्यांना मागणी असते. त्यात एक मिश्र भाजी ही अगत्याने असतेच. मात्र यंदा पावसाच्या अतिवृष्टीने भाजीपाला पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झालेय.

विविध भाज्यांची बाजारात आवक घटली आणि मागणी वाढल्याने भाजीपाल्याचे दर दुपट्टीने आणि तिप्पटीने वाढून गगणालाच भिडले आहेत. यात भाज्यांची चव वाढविणारी कोथींबीर आणि मेथीही महागली आहे.

किलोमध्ये भाव

वांगी - ८० ते १०० रुपये

टोमॅटो - ८० ते १०० रुपये

भेंडी - ८० ते १०० रुपये

बटाटा - ८० ते १०० रुपये

कांदा - ८० ते १०० रुपये

फरसबी - ८० ते १०० रुपये

टोमॅटो - ८० ते १०० रुपये

भाजीपाल्याच्या दरात दुपट्टीने वाढ झाली आहे. आता पितृपक्षात तर भाववाढीचा आलेख चढतच राहील. त्यामुळे नागरिकांना चढ्या दरानेच भाजीपाला खरेदी करावा लागत आहे. आधीच राज्यात महागाईचा भडका उडाला आहे. महागाई जास्त वाढल्याने सामान्य नागरिकांना विविध गोष्टी खरेदी करताना दररोज जास्तीचा खर्च करावा लागतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra: वर्षभर शाळेतच नाहीत,७ शिक्षकांनी फुकटाचा पगार घेतला, महाराष्ट्रातील धक्कादायक वात्सव

Maharashtra Live News Update: लातूरमध्ये काँग्रेसला उतरती कळा, माजी महापौर, माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

Mobile WiFi: घराबाहेर पडताच मोबाइलचा वायफाय बंद करा, अन्यथा डोकं झोडून घ्यावं लागेल! कारण काय?

Mulshi Crime: मुळशीत पाय ठेवायचा नाही, नाहीतर तुझा मुळशी पॅटर्न करेन; पुण्यातील व्यावसायिकाला धमकी

Akshaye Khanna : 'धुरंधर'च्या यशानंतर अक्षय खन्ना पोहचला अलिबागला; घराची केली वास्तुशांती, VIDEO होताय व्हायरल

SCROLL FOR NEXT