Vegetables Rate Hike Saam TV
लाईफस्टाईल

Vegetables Rate Hike : पितृपक्ष सुरु होताच भाज्या महागल्या; सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री

Vegetables Price Double Increase : पितृपक्ष सुरु होताच भाजीपाल्यांचे भाव दुपटीने वाढले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागलीये. आवक घटली असताना मागणी वाढल्याने हा परिणाम झाला आहे.

Ruchika Jadhav

पितृपक्ष सुरु होताच भाजीपाल्यांच्या मागणीत वाढ झाली आहे. तर दुसरीकडे पावसामुळे पालेभाज्या खराब होऊन उत्पादनात कमालीची घट झालीये. त्यामुळे आवक घटली असताना आठवडेबाजारात तरकारी मालासह भाजीपाल्याचा भाव चांगलाच वाढला आहे.

गणेशोत्सव संपताच पितृपक्षाला सुरुवात झाली. पितृपक्षात पितरांना भोजन घालण्याची परंपरा आहे. यासाठी आख्यायीकेनुसार विविध प्रकारच्या भाज्यांना मागणी असते. त्यात एक मिश्र भाजी ही अगत्याने असतेच. मात्र यंदा पावसाच्या अतिवृष्टीने भाजीपाला पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झालेय.

विविध भाज्यांची बाजारात आवक घटली आणि मागणी वाढल्याने भाजीपाल्याचे दर दुपट्टीने आणि तिप्पटीने वाढून गगणालाच भिडले आहेत. यात भाज्यांची चव वाढविणारी कोथींबीर आणि मेथीही महागली आहे.

किलोमध्ये भाव

वांगी - ८० ते १०० रुपये

टोमॅटो - ८० ते १०० रुपये

भेंडी - ८० ते १०० रुपये

बटाटा - ८० ते १०० रुपये

कांदा - ८० ते १०० रुपये

फरसबी - ८० ते १०० रुपये

टोमॅटो - ८० ते १०० रुपये

भाजीपाल्याच्या दरात दुपट्टीने वाढ झाली आहे. आता पितृपक्षात तर भाववाढीचा आलेख चढतच राहील. त्यामुळे नागरिकांना चढ्या दरानेच भाजीपाला खरेदी करावा लागत आहे. आधीच राज्यात महागाईचा भडका उडाला आहे. महागाई जास्त वाढल्याने सामान्य नागरिकांना विविध गोष्टी खरेदी करताना दररोज जास्तीचा खर्च करावा लागतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT