Chanakya Niti Quotes  Saam Tv
लाईफस्टाईल

आयुष्यभर हे तीन लोक राहतात दुखी, जाणून घ्या Chanakya Niti

Chanakya Niti Quotes : आचार्य चाणक्य हे मौर्य काळातील अतिशय ज्ञानी आणि विद्वान होते. त्यांनी निती शास्त्राची रचना केली जी आजच्या काळातही लोकांना उपयोगी आहे. निती शास्त्रामध्ये आचार्य चाणक्य यांनी जीवनाशी संबंधित अनेक गोष्टींचे वर्णन केले आहे जे आजही लोकांना अनुकूल आहे.

Shraddha Thik

Acharya Chanakya :

आचार्य चाणक्य हे मौर्य काळातील अतिशय ज्ञानी आणि विद्वान होते. त्यांनी निती शास्त्राची रचना केली जी आजच्या काळातही अतिशय लोकांना उपयोगी आहे. निती शास्त्रामध्ये आचार्य चाणक्य यांनी जीवनाशी संबंधित अनेक गोष्टींचे वर्णन केले आहे जे आजही लोकांना अनुकूल आहे.

आचार्यांचे हे शब्द तुम्ही तुमच्या जीवनात अंगीकारले तर तुम्हाला यशस्वी (Success) होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. यामुळे तुमच्या जीवनातील दु:ख आणि समस्या दूर होतात. चाणक्यनीतीनुसार ही लोक आयुष्यात नेहमी दुःखी आणि त्रस्त असतात.

अयशस्वी आणि संस्कारहीन मुले

चाणक्य नीतीनुसार, ज्या लोकांची मुले अयशस्वी आणि संस्कारहीन असतात ते नेहमीच दुःखी आणि त्रस्त राहतात. अशा मुलांच्या पालकांना समाजात मान खाली घालून वावरावे लागते. यासोबतच त्यांचे संपूर्ण आयुष्य मुलांच्या चिंतेत जात असते.

आचार्य चाणक्य यांच्या मते,

ज्या घरावर कोणाचे ऋण असते. ते लोक नेहमी दुःखी आणि त्रासलेले राहतात. अशा लोकांचे संपूर्ण आयुष्य एखाद्याचे ऋण फेडण्यातच जाते. अशी माणसे जीवनात कधीच प्रगती करू शकत नाहीत कारण ते नेहमी कोणाच्या तरी ऋणाच्या ओझ्याखाली दबलेले असतात.

वाईट आचरण असलेल्या स्त्रिया

चाणक्य नीतीनुसार, ज्या घरामध्ये महिलांना चांगल्या सवयी नसतात त्या घरात नेहमीच दुःख आणि त्रासलेले वातावरण असते. अशा कुटुंबातील लोकांना समाजात नेहमीच मान खाली घालून जगावे लागते. यासोबतच असे लोक जीवनात पुन्हा-पुन्हा बदनामीला सामोरे जावे लागते, त्यामुळे अशा घरातील लोकांना नेहमीच त्रास सहन करावा लागतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT