Chanakya Niti Quotes  Saam Tv
लाईफस्टाईल

आयुष्यभर हे तीन लोक राहतात दुखी, जाणून घ्या Chanakya Niti

Shraddha Thik

Acharya Chanakya :

आचार्य चाणक्य हे मौर्य काळातील अतिशय ज्ञानी आणि विद्वान होते. त्यांनी निती शास्त्राची रचना केली जी आजच्या काळातही अतिशय लोकांना उपयोगी आहे. निती शास्त्रामध्ये आचार्य चाणक्य यांनी जीवनाशी संबंधित अनेक गोष्टींचे वर्णन केले आहे जे आजही लोकांना अनुकूल आहे.

आचार्यांचे हे शब्द तुम्ही तुमच्या जीवनात अंगीकारले तर तुम्हाला यशस्वी (Success) होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. यामुळे तुमच्या जीवनातील दु:ख आणि समस्या दूर होतात. चाणक्यनीतीनुसार ही लोक आयुष्यात नेहमी दुःखी आणि त्रस्त असतात.

अयशस्वी आणि संस्कारहीन मुले

चाणक्य नीतीनुसार, ज्या लोकांची मुले अयशस्वी आणि संस्कारहीन असतात ते नेहमीच दुःखी आणि त्रस्त राहतात. अशा मुलांच्या पालकांना समाजात मान खाली घालून वावरावे लागते. यासोबतच त्यांचे संपूर्ण आयुष्य मुलांच्या चिंतेत जात असते.

आचार्य चाणक्य यांच्या मते,

ज्या घरावर कोणाचे ऋण असते. ते लोक नेहमी दुःखी आणि त्रासलेले राहतात. अशा लोकांचे संपूर्ण आयुष्य एखाद्याचे ऋण फेडण्यातच जाते. अशी माणसे जीवनात कधीच प्रगती करू शकत नाहीत कारण ते नेहमी कोणाच्या तरी ऋणाच्या ओझ्याखाली दबलेले असतात.

वाईट आचरण असलेल्या स्त्रिया

चाणक्य नीतीनुसार, ज्या घरामध्ये महिलांना चांगल्या सवयी नसतात त्या घरात नेहमीच दुःख आणि त्रासलेले वातावरण असते. अशा कुटुंबातील लोकांना समाजात नेहमीच मान खाली घालून जगावे लागते. यासोबतच असे लोक जीवनात पुन्हा-पुन्हा बदनामीला सामोरे जावे लागते, त्यामुळे अशा घरातील लोकांना नेहमीच त्रास सहन करावा लागतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

SCROLL FOR NEXT