Rishi Panchami 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Rishi Panchami 2023 : ऋषि पंचमीला करतात या सप्तऋषींची पुजा, महिलांसाठी आहे खास; जाणून घ्या

Importance For Women : ऋषी पंचमीच्या व्रताला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. हे व्रत स्त्रिया पाळतात असे मानले जाते.

Shraddha Thik

Rishi Panchami Puja Vidhi Muhurta :

हिंदू पंचागानुसार, ऋषी पंचमीच्या व्रताला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. हे व्रत स्त्रिया पाळतात असे मानले जाते. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी म्हणजेच ऋषी पंचमी बुधवार, 20 सप्टेंबर 2023 रोजी साजरी केली जाईल.

धार्मिक ग्रंथांनुसार, या दिवशी उपवास (Fast) आणि उपासना करणाऱ्या महिलांना शाश्वत सौभाग्य प्राप्त होते. जाणूनबुजून किंवा नकळत केलेली पापे नष्ट होतात. धार्मिक मान्यतेनुसार ऋषी पंचमीला भाई पंचमी असेही म्हणतात. या व्रतावर सप्तऋषींची पूजा विधीपूर्वक केली जाते.

भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी 19 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 01:43 वाजता सुरू होईल आणि 20 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 02:16 वाजता समाप्त होईल. उदयतिथीच्या निमित्ताने 20 सप्टेंबर रोजी ऋषीपंचमी व्रत पाळण्यात येणार आहे.

ऋषीपंचमी व्रत आणि पूजा पद्धत :

या दिवशी महिलांनी सकाळी उठून स्नान करून स्वच्छ (Clean) वस्त्र परिधान करावे. त्यानंतर स्वच्छ ठिकाणी हळद, कुंकू आणि रोळी घालून चकोर मंडळ बनवा आणि सात ऋषींची प्रतिष्ठापना करा. त्यानंतर सुगंध, फुले, धूप, दिवा, नैवेद्य इत्यादी अर्पण करावे. त्यानंतर सप्तऋषींची पूजा करून सप्तऋषींना अर्घ्य द्यावे.

ऋषीपंचमी आणि गंगास्नानाचे महत्त्व:
गणेश चतुर्थीच्या एका दिवसानंतर हा सण साजरा केला जातो. या दिवशी वशिष्ठ, कश्यप, विश्वामित्र, जमदग्नी, अत्री, गौतम आणि भारद्वाज ऋषींची पूजा केली जाते. नदीत स्नान केल्यानंतर ऋषींची पूजा करावी. 

नदीवर जाऊन स्नान करणे शक्य नसेल तर स्नानाच्या पाण्यात (Water) गंगाजल टाकून स्नान करावे. या तिथीचे व्रत केल्याने मनुष्य जन्म-मृत्यूच्या बंधनातून मुक्त होतो. हे व्रत पाळल्याने धन-समृद्धी मिळते, असे धार्मिक शास्त्रांमध्ये सांगण्यात आले आहे. एखाद्याला समृद्धी आणि संतती प्राप्त होते. या व्रतामध्ये विशेषत: मासिक पाळीच्या वेळी झालेल्या चुकांची क्षमा मागितली जाते. पौराणिक मान्यतेनुसार प्रत्येक वर्गातील महिला करू शकतात.

सप्तऋषींच्या उपासनेची पद्धत :
सप्तऋषींचे महत्त्व सांगणारे अनेक श्लोक आहेत. 'कस्यपोत्रीर्भारद्वाजो विश्वामित्रोथ गौतम । जमदग्निर्वसिष्ठश्च सप्तैते ऋषयः स्मृताः । दहंतु पाप सर्व गृहानन्तवर्ध्यं नमो नमः।' कश्यप, अत्रि, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वसिष्ठ या सात ऋषींच्या नावांचा जप केल्याने सर्व प्रकारची पापे नष्ट होतात, असा या श्लोकाचा अर्थ आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सरकारकडून विद्यार्थ्यांना लॅपटॉप-सायकल फ्री? केंद्र सरकारची विद्यार्थ्यांसाठी नवी योजना?

Maharashtra Live News Update: वाशिमध्ये मतदानाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रचाराचे बॅनर,पोस्टर आणि फ्लेक्स काढले

बिबट्याच्या दहशतीतही रणरागिणी पुढे; चंद्रपुरात महिलांचा धाडसी निर्णय

मतदानाच्या आदल्यादिवशी EVMमध्ये छेडछाड? शिंदे सेनेच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ

Eyebrow Shaping Tips: घरच्या घरी करा परफेक्ट आयब्रो! पार्लरशिवाय सुंदर शेप मिळवण्यासाठी 2 सोप्या ट्रिक्स

SCROLL FOR NEXT