अंघोळ करणे प्रत्येक व्यक्तीसाठी महत्त्वाचे आहे. अंघोळ केल्याने आपल्या शरीरातील मळ दूर निघून जातो. मळ साफ झाल्याने शरीराची दुर्गंधी कमी होते. अंघोळ केल्याने आपला ताण कमी होतो. शिवाय झोप देखील छान लागते. मात्र तुम्हाला माहितीये का? अनेक व्यक्ती चुकीच्या पद्धतीने अंघोळ करतात.
इशा फाउंडेशनचे संस्थापक आणि प्रमुख सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी यावर भाष्य केलं आहे. त्यांनी अंघोळ करण्याची योग्य पद्धत काय आहे ते सांगितले आहे. तसेच व्यक्ती अंघोळ करताना काय चुका करतात आणि त्याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतो त्याची माहिती सांगितली आहे.
अनेक व्यक्ती अंघोळ करताना सर्वता आधी आपलं अंग ओलं करतात. मात्र अंघोळ ही डोक्यापासून करावी लागते. कारण आपल्या शरीरावर आपण जेव्हा थंड पाणी घेतो तेव्हा शरीराची उष्णता थेट डोक्यात जाते. त्यामुळे अंघोळ करताना सर्वात आधी डोकं भिजवा. त्यानंतर संपूर्ण अंघोळीला सुरुवात करा.
अंघोळ करताना अनेक व्यक्ती रोज केस धुवत नाहीत. थंडीच्या दिवसात तर अनेक व्यक्ती आठवड्यात फक्त एकदा केस धुतात. केस ओले झाले की लगेच सुकत नाहीत. त्यामुळे व्यक्ती असे करतात.
मात्र तुम्हाला केस धुवायचे नसतील तेव्हा असे करू नये. अंघोळ करताना सर्वात आधी केसांवर अगदी काही थेंब पाणी घ्यावे. त्यासाठी आधी मग मध्ये काही थेंब पाणी घ्या. हे पाणी बरोबर डोक्याच्या मध्यभागी ओता. म्हणजे तुमच्या दोन्ही कानाची रेश मधोमध जोडा आणि केस ओले करा.
अंघोळ करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण याने आपल्या त्वचेवरील मळ निघून जातो. काही व्यक्ती व्यायाम करतात. त्यामुळे त्वचेवर घाम आणि मळ साठतो. यामुळे त्वचा श्वास घेऊ शकत नाही. त्यामुळे अंघोळ करावी. अंघोळ केल्याने त्वचेवरील मास पेशी खुल्या होतात.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.