Parenting Tips  Saam TV
लाईफस्टाईल

Parenting Tips : पाहुण्यांसमोर तुम्हीही मुलांना ओरडता? थांबा अन्यथा पश्चाताप करायलाही वेळ मिळणार नाही

Parenting Tips : घरी आलेल्या पाहुण्यांसमोर लहान मुलांना ओरडल्याने त्यांच्या मनावर याचा काय परिणाम होतो? याची माहिती जाणून घेणार आहोत. तसेच न ओरडता मुलांना कसे समजवावे हे जाणून घेऊ.

Ruchika Jadhav

लहान मुलांना सांभाळणे प्रत्येक पालकांसाठी एक मोठा टास्क असतो. आपली मुलं लहान वयापासून ते त्यांचे लग्न होईपर्यंत कधी काय रिअॅक्शन देतील सांगता येत नाही. आपली मुलं नेहमी परफेक्ट असावीत असं प्रत्येक आई बाबांना वाटतं. त्यासाठी पालक आपल्या मुलांना काहीवेळा ओरडतात आणि रागवतात. मात्र मुलांना सतत असं ओरडणे किंवा त्यांच्यावर रागवणे मुलांना तुमच्यापासून जास्त दूर घेऊन जातं. काही पालक आपल्या घरी पाहुणे आल्यावर त्यांच्यासमोर मुलांनी काही चुका केल्यास मुलांवर राग काढतात. मात्र असे केल्याने तुम्ही तुमच्या मुलांमध्ये आणि स्वत:मध्ये मोठी दरी निर्माण करता. त्यामुळे मुलांना ओरडू नये, तसेच अशावेळी मुलांना दुसर्‍या कोणत्या पद्धतीने समजवावे याची माहिती जाणून घेणार आहोत.

हट्टीपणा वाढणे

लहान मुलं म्हणजे मातीचा एक साधा गोळा. त्यातवर तुम्ही जे काही रेखाटाल तेच कोरले जाते. लहान मुलांना आपले आई बाबा सर्वात जवळचे वाटतात. त्यांना देखील मन असतं आणि सर्वांसमोर त्यांचा अपमान झाल्यास लहान मुलांना प्रचंड वाईट वाटतं. तुम्ही सार्वजनिक ठिकाणी सर्वांसमोर मुलांना ओरडत असाल तर हे चूक आहे. असे केल्याने मुलं आणखी जास्त हट्टी होतात आणि त्यांच्या मनात राग निर्माण होतो.

आरोग्यावर परिणाम

सर्वासमोर ओरडल्याने मुलांच्या मनावर याचा परिणाम होतो. त्यामुळे मुलं दु:खी होतात. आपले आई बाबा शत्रू आहेत असं त्यांना वाटू लागतं. तसेच मुलांचा मानसिक ताण सुद्धा वाढतो. मानसिक ताण वाढल्यावर मुलांना थकवा जाणवतो, त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे मुलं विविध आजारांचे बळी सुद्धा ठरू शकतात.

अभ्यासात लक्ष नसणे

मुलांना सतत आपल्या आजुबाजूला हेल्दी वातावरण पाहिजे असते. काही मुलांना शाळेत किंवा क्लासमध्ये तसेच मित्र परिवारात त्रास दिला जातो. घरी आई वडिल सुद्धा समजून घेणारे नसल्याने लहान मुलांना याचा त्रास होतो. सर्व गोष्टी कायम त्यांच्या मनात साठत राहतात. त्यामुळे त्यांचं अभ्यासातही लक्ष लागत नाही.

मुलं वाया जातील

काहीवेळा पालकांची जास्त सक्ती असल्याने मुलं टोकाचा निर्णय घेतात. मानसिक त्रास सहन न झाल्याने लहान वयात मुलं आपलं आयुष्य संपवतात. तसेच मुलांना सर्वांसमोर सतत ओरडल्याने ते बाहेर पडतात आणि त्यांना वाईट संगत चांगली वाटते. अशा पद्धतीने चांगल्या घरातील मुलं देखील आई वडिलांच्या चुकांमूळे वाईट मार्गाला लागतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha-OBC Quota Row: ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंविरोधात पोलिसात तक्रार दाखल; काय आहे कारण?

Chandra Grahan Tips : ग्रहणाच्या वेळी अन्न दूषित होऊ नये यासाठी सोपा उपाय

Anant Chaturdashi 2025 live updates : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मिरवणूक रथात विराजमान

Viral Video: शाळा आहे की मसाज पार्लर! शिक्षकाने विद्यार्थिनींकडून करून घेतली बॉडी मसाज, VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

Aayush Komkar: शेवटी सूड घेतलाच! वनराजच्या अंत्यविधीला शस्त्रपूजन करत बदला घेण्याची शपथ, अन् १ वर्षाने आयुष कोमकरची हत्या

SCROLL FOR NEXT