Jaundice Disease Saam Tv
लाईफस्टाईल

Jaundice Disease : रक्ताच्या एका थेंबातून होणार कावीळचे झटपट निदान, कसे ते जाणून घ्या

IIT Kanpur Reserach : आयटीआय कानपूर याच्या नवीन संशोधनातून असे समोर आले आहे की, रक्ताच्या एका थेंबातच कावीळचे निदान करणारे तंत्रज्ञान शोधून काढले आहे.

कोमल दामुद्रे

Jaundice Strip Detects :

कावीळ हा आजार संक्रमणामुळे होतो. खरेतर दूषित पाणी आणि खराब अन्नपदार्थ खाल्ल्याने कावीळ आजार होण्याची शक्यता दाट असते. जर वेळीच या आजाराकडे लक्ष दिले नाही तर गंभीर समस्यांना समोरे जावे लागते.

या आजारात लिव्हर व्यवस्थितपणे काम करत नाही. भूक कमी लागणे, पोट दुखणे, हात-पाय दुखणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. परंतु, आता या आजाराचे लवकरच निदान होणार आहे.

आयटीआय कानपूर याच्या नवीन संशोधनातून असे समोर आले आहे की, रक्ताच्या (Blood) एका थेंबातच कावीळचे निदान करणारे तंत्रज्ञान शोधून काढले आहे. तसेच हे तंत्रज्ञान २०२४ पर्यंत बाजारात (Market) येणार आहे.

त्यांनी अशी एक स्ट्रीप विकसित केली आहे. त्यावर रक्ताचा एक थेंब जरी टाकला तरी अवघ्या काही वेळात (Time) कावीळचे निदान होऊ शकते. साधारण कावीळची तपासणी करण्यासाठी ३ एमएल रक्ताची गरज असते. परंतु, या नव्या तंत्रज्ञानामुळे रक्ताचा केवळ एक थेंब पुरेसा आहे. त्यामुळे कावीळचे निदान झटपट होईल.

आयआयटी कानपूरचे संचालक प्रो. अभय करंदीकर यांनी सांगितले की, कानपूरच्या संशोधकांनी खास स्ट्रीप तयार केली आहे. जे आरोग्य क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी करेल. नॅशनल सेंटर फॉर फ्लॅक्सिबल इलेक्ट्रॉनिक्समधील केमिकल इंजिनिअरिंग विभागातील ज्येष्ठ वैज्ञानिक प्रोफेसर सिद्धार्थ पांडे आणि निशांत वर्मा या दोघांनी संशोधन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! लोकलची वाहतूक ठप्प; अनेक गाड्या रेल्वे स्थानकावर उभ्या

NCP Merger: राजकीय घडामोडींना वेग! आमदारांसोबत सुनेत्रा पवारांची बैठक; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर घेणार मोठा निर्णय?

Maharashtra Live News Update: सीएसटीला जाणाऱ्या लांब पाल्याच्या गाड्या विविध स्थानकावर थांबवल्या

मुंबईचा प्रवास शेवटचा ठरला; मुलुंड दुर्घटनेत उत्तर प्रदेशच्या सरपंचाचा मृत्यू

Vasai Tourism : शहराच्या गोंधळापासून दूर वसलंय 'हे' ठिकाण, येथील सौंदर्य पाहताच मन होईल फ्रेश

SCROLL FOR NEXT