Toxic Relationship Saam Tv
लाईफस्टाईल

Toxic Relationship : टॉक्सिक आणि अनहेल्दी रिलेशनशिप म्हणजे काय? हे नाते कसे ओळखावे?जाणून घ्या

Relationship Tips : कधी कधी आयुष्यात संशय ,न्यूनगंड, मत्सर अशा गोष्टी ठेवल्याने चांगले नातेसंबंध खराब होतात. अशा परिस्थितीत हे नाते कसे ओळखायचे हे आपण शिकू .

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नातेसंबंध कसे असावे ज्यात एकमेकांचा आदर ठेवता येईल ; दोघांची वैयक्तिक वाढ होईल ; मदत मिळेल आणि समजून घेता येईल . पण आजच अद्ययावत घेता पती -पत्नी असो कि गर्लफ्रेंड -बॉयफ्रेंड , त्यांचे नाते वासणारहित असो वा कौटुंबिक काही कारणांमुळे नात्यात दुरावा निर्माण होतो. अशा वेळेत व्यक्तीचे मानसिक आणि भावनिक आरोग्य बिघडते . जर तुमच्यासोबत ही असा घडत असेल तर त्या नात्याला तुम्ही विषारी नाते म्हणू शकता .

हे नातं (relationship)व्यवस्थित करणं खूप गरजेचं आहे ,अन्यथा ते आपल्या जीवनशैलीस हानी पोहचवू शकते आणि त्यामुळे असे वातावरण निर्माण होते कि लोकांच्या स्वाभिमानाला ठेच पोहचते आणि सकारात्मक गोष्टींच ईर्ष्यामध्ये रुपांतर होतं यामुळे शंका आणि निराश्यासारख्या देखील गोष्टी घडू शकता. म्हणूनच , ॉआज तुम्हाला काही गोष्टी सांगत आहे ज्या या नात्याशी संबंधित आहे त्या तुम्ही लवकरात लवकर सोडाव्या किंवा जर ते नसेल सोडवले जात तर चांगला मार्ग शोधून त्या नात्यातून बाहेर पडावे .

भावना समजत नाहीत

अनेक वेळा स्त्री असो कि पुरुष(male), नात्यातील काही गोष्टी जोडीदाराला सांगता येत नाहीत . परंतु जर कोणी काही बोलले आणि समोरच्या व्यक्तीला ते समजले नाही किंवा भावनांची फसवणूक झाली तर हे नाते देखील विषारी नातेसंबंधाचे लक्षण असू शकते .

नकरात्मकता

अनेक वेळा नात्यात दोघेही एकमेकांना समजून घेण्यास असमर्थ असतात . पण अशा परीस्थितीत ते स्पष्टीकरण कधी वादाचे स्वरुप घेईल हे सांगता येत नाही . यानंतर तुमच्या मनात सतत ते विचार(thought) येत राहणार आणि त्यामुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल , त्यामुळे हे नाते विषारी नातेसंबंधाचे एक पाऊल असू शकते , म्हणून हे टाळा.

नियंत्रित करण्यासाठी

ह्या गोष्टी स्त्रिया आणि पुरुष दोघांनाही लागू होत आहे . जर तुम्ही तुमच्या जोडीदारावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही समोरच्याला हवे तसे करायाला लावले तर हे नाते तुटणे निश्चित आहे .दीर्घकाळासाठी एखाद्याला नियंत्रित करणे चुकीचे सिद्ध होऊ शकते .

मत्सर वाटणे

एखाद्याविषयी मालकीण राहणं साहजिक आहे ; पण जास्त मत्सर असणं चुकीचं आहे . तुमच्या जोडीदाराला कोणसोबत ही पाहून तुम्हाला मत्सर वाटत असेल किंवा तुम्ही अतिसंवेदनशीलता दाखवली तर तुमचे नाते भविष्यात विषारी बनू शकते .

टीका करणे

हे मान्य आहे की , निरोगी नातेसंबंध मजबूत(strong) करण्यासाठी थोडी रचनात्मक टिका वापरली जाऊ शकते , परंतु सतत एखाद्यावर टीका केल्याने तुमचे नाते विषारी बनते .

एक गोष्ट धरून बसणे

समजा तुमचे तुमच्या जोडीदराशी एखाद्या मुद्या वरुन भांडण झाले आहे . आणि अशा परिस्थितीत तुम्ही जर बोलणे थांबवले ,किंवा तुम्ही ती बाब स्पष्ट केली नाही तर दोघांमधील अंतर वाढेल आणि जेव्हा तुम्ही बोलण्याचा प्रयत्न कराल तेव्हा तो विषय नक्कीच निघेल . आणि अश्या वेळेस भांडणं होऊ शकता ; म्हणून गोष्टी नेहमी स्पष्ट ठेवायला हव्यात .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला पुणे सत्र न्यायालयात केलं हजर

Gold Rate Today: वटपौर्णिमेच्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण, 10 तोळा 9300 रुपयांनी स्वस्त; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

Sleep health: नाईट शिफ्ट आणि रात्री जागरणामुळे शरीरात नेमकं काय घडतंय? डॉक्टरांनी सांगितलं धक्कादायक सत्य

डायबिटीजचे रूग्ण फणस खाऊ शकतात का?| Jackfruit Eat In Diabetes?

Pakistan Airstrike: पाकिस्तानकडून मध्यरात्री अफगाणिस्तानवर एअर स्ट्राईक, ३७ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT