Parenting Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Parenting Tips : मुलांची परीक्षा संपली, घरात बसून कंटाळले? अशाप्रकारे ठेवा व्यस्त

Keep Children Busy After Exam : बारावीच्या मुलांच्या परीक्षा संपल्या असून लवकरच दहावीच्या संपतील. परीक्षा संपल्यानंतर मुलांच्या मनावरील ताण कमी होतो. त्यामुळे त्यांच्याकडे अधिक वेळ असतो.

कोमल दामुद्रे

How To Busy Your Child After Exam :

बारावीच्या मुलांच्या परीक्षा संपल्या असून लवकरच दहावीच्या संपतील. परीक्षा संपल्यानंतर मुलांच्या मनावरील ताण कमी होतो. त्यामुळे त्यांच्याकडे अधिक वेळ असतो.

शाळा आणि अभ्यासातून सुटका मिळाल्यामुळे त्यांना काही प्रमाणात बरे वाटते. पुढे काय करायचे हा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहातो. दिवसभर काय करायचे? सतत बसून राहाणे किंवा काहीच न करणे त्यांना जमत नाही. त्यामुळे त्यांची अधिक चिडचिड होते. घरात बसून राहाणे किंवा दिवसभर बाहेर खेळून त्यांना वैताग येतो. काही मुले (Child) तासनतास टीव्ही, मोबाईल फोन पाहात बसतात.

पालकांनी (Parents) या संधीचा फायदा घेऊन मुलांना घरातील कामे करायला सांगू शकतात. तसेच तुमच्या नात्याला (Relation) समजून घेण्यासाठी हा वेळ देखील चांगला असतो. पालकांनी अशावेळी काय करायला हवे जाणून घेऊया.

1. छंद जोपासायला सांगा

प्रत्येक मुलाला काही ना काही करण्याची आवड असते. काहींना चित्र काढायला आवडते तर काहींना डान्स करायला. अशावेळी मुलांना त्यांना त्यांचे छंद जोपासण्यास प्रोत्साहन करा.

2. नवीन कौशल्य

मुलांना आवडणाऱ्या गोष्टी शिकवा. त्यांच्या असणाऱ्या कलागुणांना वाव द्या. ज्यामुळे सुट्टीच्या काळात नवीन कौशल्य विकसित करता येतील. यासाठी तुम्ही त्यांना क्लासला लावू शकता.

3. बाहेर फिरायला घेऊन जा

मुलांना स्क्रीन टाइमपासून लांब ठेवायचे असेल तर त्यांना निसर्गाशी संपर्क साधायला सांगा. झाडे लावणे, त्यांची काळजी घेणे. नवीन ठिकाणे फिरणे, त्या ठिकाणी काय पाहायला मिळाले. ट्रेकिंगला घेऊन जा ज्यामुळे त्यांना बाहेरच्या वातावरणाची गोडी लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Sri Krishna Janmbhoomi Mathura: ईदगाह 'वादग्रस्त वास्तू' नाहीये; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Shocking : शेतात गेले ते परत आलेच नाहीत; आधी वडिलांनी स्वतःला संपवलं, त्यांना बघून मुलानंही मृत्यूला कवटाळलं

Sushil Kedia: मराठी शिकणार नाही, काय करायचं बोल सुशील केडियांचं राज ठाकरेंना थेट आव्हान|VIDEO

Crime News : घरगुती वाद टोकाला गेला, निवृत अधिकाऱ्याने कुटुंबीयावर गोळ्या झाडल्या; मुलाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT