Mahatma Buddha Anmol Vichar  google
लाईफस्टाईल

Gautam Buddha Quotes: विचार न करता झटकन बोलता? थोडं थांबा..; गौतम बुद्धांचा सल्ला तुमचं आयुष्य बदलेल

Mahatma Buddha Anmol Vichar : वैशाख पौर्णिमेला बुद्धांच्या शिकवणींचं स्मरण करत, लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी विचार करुन निर्णय घेण्याचं महत्व जाणून घ्या.

Sakshi Sunil Jadhav

वैशाख पौर्णिमेला खूप महत्वपूर्ण मानलं जातं. १ मे २०२६ रोजी वैशाख पौर्णिमा महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा करतात. या दिवशी भगवान गौतम बुद्धांनी दिलेले संदेश आपण समजून घेतले पाहिजे. कारण बुद्धांनी विश्वाला शांतीचा मार्ग दाखवला. सध्याच्या धावपळीच्या जगात शांतता हरवत चालली आहे. जग खूप वेगाने पुढे जातयं. पण यासगळ्यात तुमच्या वागण्यावर तुमच्या मनावर आणि विचारांवर परिणाम होताना दिसत आहे.

कधी-कधी आयुष्यात असा टप्पा येतो की, आपल्याला आपला मार्ग सापडत नाही. जे काम पूर्वी आपण खूप सहजपणे करायचो तेच काम करायला आता खूप कठीण झालंय. पण जर तुम्ही धैर्याने त्या गोष्टीवर विचार करता, तेव्हा सगळ्यात कठीण प्रश्नही सोपे व्हायला लागतात. आपण एक चूक करतो ते म्हणजे एखाद्या गोष्टीवर विचार न करणे.

बुद्धांच्या मते, फक्त परिस्थिती बदलल्याने आयुष्यात यश मिळत नाहीतर, तुमच्या मनावर ताबा असेल तर तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळवता येतात आणि त्यावर नियंत्रणही मिळवता येतं. त्यामुळे कधीही आयुष्यात कोणतीही वाईट-चांगली समस्या आली की, त्यावर लगेचच प्रतिक्रिया देणं टाळा. त्यावर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने विचार करा. तोडगा काढा आणि परिस्थितीला सामोरे जा. ही एक शिकवण आयुष्यभर तुमच्या कामी येईल.

आयुष्यात संयम हा गुण महत्वाचा आहे. पण हा गुण येण्यासाठी तुम्ही त्यावर काम करणं गरजेचं आहे. जसं की, वादाच्या वेळेस शांत राहा किंवा लगेच प्रतिक्रिया देणं टाळा. याचा तुम्ही सराव करा. याने तुमचा संयम वाढेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप खासदाराच्या कारचा घोडबंदर रोडवर भीषण अपघात, भरधाव डंपरने दिली धडक

Maharashtra News Live Update : उत्तर पुणे जिल्ह्यात तापमान ४२° पार; उष्माघाताचा धोका वाढला

Sattu Drink Benefits For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी दररोज प्या 'सत्तू ड्रिंक', कसं बनवायचं? आणि फायदे काय? जाणून घ्या

How Painkillers Work: पेनकिलर घेतल्यानंतर लगेच कशा गायब होतात वेदना? वाचा औषधं पोटात गेल्यावर कसं काम करतं?

जालन्यातील माजी आमदाराचे निधन, अजित पवारांचे विश्वासू म्हणून ओळख, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हळहळ

SCROLL FOR NEXT